शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Budget 2020 :अर्थसंकल्पात केवळ आकड्यांची चलाखी : अतुल लोंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:11 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेली आकडेवारी वास्तविकतेशी मेळ खात नाही. आयकरप्रणाली अधिक गुंतागुंतीची करून सामान्यांना संभ्रमात टाकले आहे. मंदीतील अर्थव्यवस्था झाकोळण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केल्याची टीका अर्थतज्ज्ञ अतुल लोंढे यांनी येथे केली.

ठळक मुद्देअर्थसंकल्पीय विश्लेषण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लांबलचक अर्थसंकल्प मांडून अर्थव्यवस्था सक्षम असल्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणातून सामान्य नागरिकांना काहीच बोध झाला नाही. आकड्यांची चलाखी करून वास्तविक अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडलाच नाही. त्यांनी मांडलेली आकडेवारी वास्तविकतेशी मेळ खात नाही. आयकरप्रणाली अधिक गुंतागुंतीची करून सामान्यांना संभ्रमात टाकले आहे. मंदीतील अर्थव्यवस्था झाकोळण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केल्याची टीका अर्थतज्ज्ञ अतुल लोंढे यांनी येथे केली.धनवटे नॅशनल महाविद्यालय अल्युमिनी असोसिएशन आणि युवा जागर यांच्यावतीने विमलाताई देशमुख हॉल, धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेसनगर येथे आयोजित अर्थसंकल्पीय विश्लेषणात्मक भाषणात लोंढे यांनी अर्थसंकल्पातील उणिवा आणि काही चांगल्या योजनांची फोड केली. यावेळी धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार आणि धनवटे नॅशनल महाविद्यालय अल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे आणि कॉलेजचे प्राध्यापक उपस्थित होते.अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पपूर्व पाहणीत मोठा विसंवादलोंढे म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पपूर्व पाहणी अहवालातील तरतुदींमध्ये मोठा विसंवाद दिसून येत आहे. आयातीवर मोठ्या प्रमाणावर कर व निर्बंध लादून एकप्रकारे जागतिक बाजारपेठेसाठी भारताचे दरवाजे आपण बंद करीत आहोत. आपल्याला जगाशी स्पर्धा करायची आहे की केवळ आपली स्पर्धा पाकिस्तानशी राहणार आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून देशाच्या संरक्षण खर्चावरील तरतूद कमी कमी होत आहे. यावर्षीही कमी करण्यात आली. संरक्षण व्यवस्थेत राज्यांनीही खर्च उचलावा, असे सांगण्यात आले आहे. देशात शैक्षणिक खर्च सात लाख कोटी असायला हवा होता. पण यावर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ ९९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रावरही फारशी तरतूद केली नाही. त्यामुळे गरीब व सामान्यांच्या अपेक्षा अशा तरतुदींमुळे कशा पूर्ण होणार, हा मोठा प्रश्न आहे. तोट्यात गेलेल्या वित्तीय संस्था वाचविण्यासाठी सरकारचे प्रयत्न दिसून येत असल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले.निर्गुंतवणुकीचा विषय गुंतागुंतीचासरकारने अनेक निर्णय अर्थसंकल्पबाह्य घेतलेले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे. कराच्या सुलभीकरणाऐवजी ती गुंतागुंतीची झाली आहे. निर्गुंतवणुकीचा विषयही अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. एलआयसी, एअर इंडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची निर्गुंतवणूक सरकार करीत आहे. त्यातून काहीही साध्य होणार नाही, असे लोंढे म्हणाले. लोंढे यांनी विद्यार्थ्यांना समाधानकारक उत्तरे दिली.

टॅग्स :budget 2020बजेटEconomyअर्थव्यवस्था