शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

राज्यातील बुद्ध विहारांना एकसूत्रात बांधणार

By admin | Updated: April 2, 2016 03:28 IST

बौद्ध समाजाला एकासूत्रात बांधण्यासाठी राज्यभरातील बुद्ध विहारांना, सामाजिक संस्थांना व कार्यकर्त्यांना एकासूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बौद्धांची शिखर संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न : बुद्ध विहार समन्वय समितीचा पुढाकारनागपूर : बौद्ध समाजाला एकासूत्रात बांधण्यासाठी राज्यभरातील बुद्ध विहारांना, सामाजिक संस्थांना व कार्यकर्त्यांना एकासूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी बुद्ध विहार समन्वय समितीने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत नागपुरातून याची सुरुवात झाली असून आतापर्यंत नागपुरातील २०० विहारांना परिषदेच्या माध्यमातून जोडण्यात यश आले आहे. या माध्यमातून बौद्ध समाजाची एक शिखर संस्था स्थापन करण्याचा उद्देश आहे. बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती यांनी सांगितले की, धम्म क्रांतीनंतर जमेल तसे आपण बुद्ध विहार बांधलेत. प्रशिक्षणाच्या व निर्देशनाच्या अभावामुळे त्यात अनवधानाने अनेक त्रुटी राहून गेल्या. त्यात कुणाचाच दोष नव्हता. त्याला कालमानाच्या मर्यादा होत्या. त्या त्रुटींना दुरुस्त करण्याची गरज सर्वांनाच जाणवत आहे. परंतु सर्वसामान्य नेतृत्वाच्या अभावामुळे कुणी कुणाला सांगावे आणि कुणी कुणाचे ऐकावे हा गहन प्रश्न निर्माण झाल्याने समाजात गोंधळ, भ्रम, कलह निर्माण झाला. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या बुद्ध विहारांचा समन्वय करून त्याची नियंत्रण करणारी केंद्रीय यंत्रणा असलेली शिखर संस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने बुद्ध विहार समन्वय समिती स्थापन करण्यात आली. २०२० पर्यंत राज्यातील सर्व विहारांची व धम्म प्रचारकांचा समन्वय स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. २०१४ पासून कामाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी नागपूर शहरातील ७० विहारांचा समन्वय स्थापन करण्यात आला. दुसऱ्या वर्षी १२५ आणि यावर्षी २०० विहारांचा समन्वय स्थापन झालेला आहे. २०१७ पर्यंत संपूर्ण नागपूर शहर, २०१८ पर्यंत संपूर्ण जिल्हा, २०१९ पर्यंत विदर्भ आणि २०२० पर्यंत संपूर्ण राज्यातील विहिरांचा समन्वय केला जाईल. यासाठी जनजागृती म्हणून दरवर्षी बुद्ध विहारांची समन्वय परिषद स्थापन केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बुद्ध विहार समन्वय परिषद आजपासून रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह हिंदी मोरभवन झाशी राणी चौक सीताबर्डी येथे दोन दिवसीय बुद्ध विहार समन्वय परिषद आयोजित करण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता परिषदेला सुरुवात होईल. सकाळी ११.३० वाजता माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. भदंत विमलकिर्ती गुणसिरी अध्यक्षस्थानी राहतील. डॉ. कृष्णा कांबळे, अशोक शंभरकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध विषयावर चर्चा होईल.