शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध नास्तिक आहे

By admin | Updated: February 19, 2017 02:30 IST

भगवान बुद्ध हे मोक्षदाता नाहीत, मार्गदाता आहेत. बुद्धाने सांगितलेला धम्म हा भावनेवर नव्हे तर्कावर उभा आहे.

लक्ष्मण माने : डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला नागपूर : भगवान बुद्ध हे मोक्षदाता नाहीत, मार्गदाता आहेत. बुद्धाने सांगितलेला धम्म हा भावनेवर नव्हे तर्कावर उभा आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी जो बुद्ध अभ्यासला तो पूर्णत: नास्तिक आणि विज्ञानवादी आहे. परंतु दुर्दैवाने आज बाबासाहेबांनी सांगितलेला वैचारिक बुद्ध मागे पडत असून त्या जागी कर्मकांडात गुरफटलेला बुद्ध उभा केला जात आहे, अशी खंत साहित्यात भटक्या समाजाचे दु:ख शब्दबद्ध करून त्यांचे जीवनमान जगासमोर आणणारे विचारवंत पद्मश्री लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातर्फे आयोजित डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे तर प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम व आयोजक डॉ. प्रदीप आगलावे मंचावर उपस्थित होते. ‘२१ व्या शतकातील भारतातील बुद्ध धम्माची चळवळ’ या विषयावर बोलताना माने पुढे म्हणाले, कितीही धर्मांतर करा, परंतु जात काही जात नाही, हा अनुभव मी सातत्याने घेत आहे. मला धम्म स्वीकारून १० वर्षे झालीत. परंतु अद्याप धम्माच्या अनुयायांनीच मला स्वीकारलेले नाही. दलाईलामा तर जणू बुद्धाला बदनाम करायलाच बसले आहेत. तिकडे ओशोचे विचारही त्याला वाटते त्या पद्धतीने बुद्धाच्या आवरणात गुंडाळून समाजात पोहोचवले जात आहेत. चीन, जपान, तिबेट या राष्ट्रांमध्ये तर बुद्धाला चमत्कारिक देवत्व प्रदान केले जात आहे, असे माने म्हणाले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे, संचालन डॉ. रमेश शंभरकर यांनी केले.(प्रतिनिधी) संघ आमचा जगजाहीर शत्रू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचा जगजाहीर शत्रू आहे. परंतु नुसते संघाच्या नावाने बोटे मोडून उपयोग नाही. त्यांच्या अतिरेकी हिंदुत्वाला तार्किक विरोध करायचा असेल तर आधी संघासारखी शिस्तबद्ध आणि समर्पित चळवळ उभारावी लागेल. परंतु येथे चित्र उलटे आहे. बाबासाहेबांचे नाव घेणारी काही माणसे कमळावर निवडणूक लढवित आहेत. स्वार्थासाठीचे हे वैचारिक धु्रवीकरण आम्हाला कुठे नेईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.