शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘तथागत’ने जिवंत केला ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:49 IST

‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला आणि स्वत:सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष, उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. म्हणूनच भगवान गौतमाची सर्वश्रेष्ठ बुद्ध आणि १० हजार वर्षाच्या मानवी इतिहासातील सर्वश्रेष्ठ महामानव म्हणून गणना केली जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली लाखो अनुयांयासह बौद्धधम्माची दीक्षा ग्रहण केली. ज्या महापुरुषाचे आपण अनुयायी आहोत त्या बुद्धांचा, त्यांच्या चारित्र्याचा, ज्ञानाचा व तत्त्वज्ञानाचा परिचय व्हावा, यासाठी त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा श्रेष्ठ ग्रंथ बहाल केला. बाबासाहेबांच्या या बुद्ध चरित्राचा नाट्यमय आविष्कार म्हणजे ‘तथागत’ हे महानाट्य होय. खुद्द बाबासाहेबच हे बुद्धचरित्र सांगत आहेत, ही पार्श्वभूमी असलेल्या या महानाट्यातून नागपूरकरांनी शुक्रवारी बुद्ध व त्यांचा धम्म जाणला.

ठळक मुद्देबाबासाहेबांच्या शब्दरुपातील नाट्याविष्कार : नागपुरातील खासदार महोत्सवात प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला आणि स्वत:सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष, उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. म्हणूनच भगवान गौतमाची सर्वश्रेष्ठ बुद्ध आणि १० हजार वर्षाच्या मानवी इतिहासातील सर्वश्रेष्ठ महामानव म्हणून गणना केली जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली लाखो अनुयांयासह बौद्धधम्माची दीक्षा ग्रहण केली. ज्या महापुरुषाचे आपण अनुयायी आहोत त्या बुद्धांचा, त्यांच्या चारित्र्याचा, ज्ञानाचा व तत्त्वज्ञानाचा परिचय व्हावा, यासाठी त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा श्रेष्ठ ग्रंथ बहाल केला. बाबासाहेबांच्या या बुद्ध चरित्राचा नाट्यमय आविष्कार म्हणजे ‘तथागत’ हे महानाट्य होय. खुद्द बाबासाहेबच हे बुद्धचरित्र सांगत आहेत, ही पार्श्वभूमी असलेल्या या महानाट्यातून नागपूरकरांनी शुक्रवारी बुद्ध व त्यांचा धम्म जाणला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारीत खासदार महोत्सवात शुक्रवारी मंथनची निर्मिती, मोहन मदान यांची प्रस्तुती आणि शैलेंद्र कृष्णा बागडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या महानाट्याचा प्रयोग रंगमंचावर झाला. तथागताचा जन्म म्हणजे विश्वाच्या मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील अलौकिक घडामोडच होय. एका राजघराण्यात जन्माला आलेला, जगातल्या श्रेष्ठ अशा सुखसुविधा, भोगविलास मिळूनही अस्वस्थ असणारा राजपूत्र, या अस्वस्थतेतून सुखाच्या शोधात राजपाठाचा त्याग करून वनाश्रमात गेलेला गौतमीपूत्र, कठोर, परिश्रमपूर्ण तपश्चर्या करूनही हाती काही न लागल्याने निराश झालेला मुनी आणि शेवटी अथांग, अनंत अशा विचारातून सत्याचा, दु:खांचा, त्यांच्या कारणांचा शोध लागलेला संमासंबोधी बुद्ध. बुद्धत्व प्राप्तीनंतर समाजात पसरलेली अराजकता, असमानता, अमानवीयता, भेदभाव, हिंसा संपविण्यासाठी झटणारा शाक्यमुनी आणि मानवतेची, अहिंसेची, ज्ञानाची, विज्ञानवादाची शिकवण देणाऱ्या बौद्ध धम्माचा संस्थापक बुद्ध, असा हा प्रवास उलगडणारे हे महानाट्य.राजा शुद्धोधन नेतृत्व करीत असलेल्या शाक्यांचे गणतंत्र, सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापूर्वीची पार्श्वभूमी, राजमाता महामाया यांच्या प्रसववेदनेतून लुंबिनी वनात जन्माला आलेले सिद्धार्थ, असितमुनीच्या भविष्यवाणीने अस्वस्थ झालेले व आपला पुत्र वानप्रस्थास न जाता गृहस्थाश्रमात राहून चक्रवर्ती सम्राट व्हावा म्हणून सर्व भोगविलासात गुंतविण्यासाठी शुद्धोधनाचे प्रयत्न हे सर्व ओघानेच येते. अक्षरविद्या व शस्त्रविद्येत सर्वश्रेष्ठ असूनही रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य व कोलिय वंशात रंगलेल्या राजकीय सारीपाटाच्या कारणाने सर्वस्वाचा त्याग करून सिद्धार्थ वानप्रस्थास जातो व सत्याच्या शोधासाठी तपश्चर्या करतो.पुढे बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिला धम्मसंदेश देईपर्यंत विविध घटनांचा धावता उल्लेख महानाट्यात येतो. प्रभावी आणि वेगवान मांडणी, कलावंतांचा अभिनय आणि घटनाक्रमानुसार गीतसंगीताची बहारदार सोबत यामुळे हे महानाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले. 

महानाट्याचे लेखन किरण बागडे, संगीत भूपेश सवाई, प्रकाश व्यवस्था मंगेश विजयकर, नेपथ्य सुरेश मेश्राम व नृत्य अमोल मोतेवार, अदल बोजावार व चिन्मयी यांनी साकार केले. चरित्र मांडणारे बाबासाहेबांची भूमिका देवा बोरकर यांनी केली तर पार्श्वस्वर दिवंगत अभिनेता ओम पुरी व ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांचे होते. कलावंतांमध्ये तथागत बुद्ध राकेश खाडे यांनी साकारला तर यशराज यांनी राजपुत्र सिद्धार्थ व राजा शुद्धोधन सुधीर पाटील यांनी उभा केला. 
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री व राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे, भाजपचे संघटन महामंत्री विजय पुराणिक, आमदार अनिल सोले, आमदार डॉ. मिलिंद माने, भूपेश थुलकर, नाना शामकुळे, सुभाष पारधी, धरमपाल मेश्राम, अंबादास उके, अरविंद गजभिये, प्राचार्य केशव भगत, संदीप जाधव, संदीप गवई, जयप्रकाश गुप्ता, अशोक मेंढे आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले.कलावंत व शेतकऱ्यांचा सत्कारयावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक वामनराव गाणार, चित्रकार प्रमोदबाबू रामटेके व न्यूरासर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सावनेर तालुक्यातील आजनी गावचे राजेश भगल, गुमथाळा गावचे संदीप व सचिन उमाटे, वर्धा जिल्ह्यातील महांकाळ गावचे राजू विश्वनाथ पाहुणे, गोंदियाचे दीनदयाल नागपुरे या शेतकऱ्यांचा व आनंदराव राऊत यांनाही गौरविण्यात आले.

 

टॅग्स :Member of parliamentखासदारcultureसांस्कृतिक