शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत लाथाड्यांमुळेच बसपा कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 10:17 IST

नेत्यांचा स्वार्थ आणि त्यातून निर्माण झालेल्या अंतर्गत लाथाड्यांमुळेच बसपा कमकुवत झाल्याचे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देवरिष्ठ नेते काही शिकतील का?सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास हिरावला

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टी ही एक महत्त्वाची राजकीय शक्ती मानली जाते. आजवर बसपाचा एकही उमेदवार विधानसभा किंवा लोकसभेत निवडून आला नसला तरी, भाजप-काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाची गणिते ठरवण्याइतपत ताकद बसपाने निर्माण केली होती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ही ताकद नाहीशी झाल्याचे दिसून आले. लाखावर मत घेणारी बसपा आता केवळ ३१ हजारावर आली ? असे का झाले? नेत्यांचा स्वार्थ आणि त्यातून निर्माण झालेल्या अंतर्गत लाथाड्यांमुळेच बसपा कमकुवत झाल्याचे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. हा असंतोष आता चव्हाट्यावर आला आहे. सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास हिरावला जात आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा वरिष्ठ नेते यातून काही शिकणार की नाही, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.कॅडरबेस कार्यकर्त्यांच्या भरवशावर बसपाने राज्यात आपली एक शक्ती निर्माण केली. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून दोन लाखाची व्होट बँक तयार झाली. प्रत्येक निवडणुकीत बसपाच्या हत्तीची गती ही वाढलेली दिसून येते. २००९ मध्ये माणिकराव वैद्य यांना बसपाने उमेदवारी दिली. तेव्हा बसपाने पहिल्यांदा १ लाखावर मतांचा पल्ला गाठला. वैद्य यांनी तब्बल १ लाख १८ हजार ७४१ मते घेतली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. मोहन गायकवाड यांना बसपाने उमेदवारी दिली. त्यांनीही ९६,४३३ मते घेत बसपाची ताकद कायम ठेवली. विधानसभानिवडणुकीतही उत्तर नागपूरसारख्या महत्त्वाच्या विधानसभा मतदार संघात बसपाकडून लढलेले किशोर गजभिये हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. बसपाच्या या वाढत असलेल्या ताकदीमुळे सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वासही दुणावला.या निवडणुकीत बसपा निश्चितच कमाल करेल, असा विश्वास सामान्य कार्यकर्त्यांना होता. परंतु तसे झाले नाही. उलट अंतर्गत लाथाड्या अधिक वाढल्या. पक्षातील वाद कधी नव्हे इतका चव्हाट्यावर आला. पक्षाचे लोकसभा उमेदवार मो. जमाल यांच्यावरच पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले. जमाल यांनीही वरिष्ठ नेत्यांनीच पक्षविरोधी काम केल्याचे आरोप केले.निवडणुकीतील हा असंतोष नागपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. अमरावतीमध्ये याचा स्फोट झाला. संदीप ताजने व चेतन पवार या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना मारही बसला. या नेत्यांनी पक्षविरोधी कार्य केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ताजने, पवार यांची पक्षातून हकालपट्टी केली. काहींना पदमुक्त केले. परंतु कार्यकर्त्यांमधील असंतोष अजूनही शमलेला नाही. नेत्यांनी कार्यकर्त्यांचा विश्वास गमावलेला आहे. विधानसभा निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत. अशापरिस्थितीत सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा संपादित करणे, हे प्रदेशस्तरावरील नेत्यांसमोर मुख्य आव्हान राहणार आहे.नागपूर झोनची बैठक वादळी ठरण्याची शक्यतायेत्या ३० जून रोजी नागपूर झोनची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. अमरावती येथील घटनेची गंभीर दखल घेऊन मायावती यांनी ताजने व पवार यांची पक्षातून हकालपट्टी करून सामान्य कार्यकर्त्यांचा रोष काही प्रमाणात कमी केला असला तरी, नागपुरातील कार्यकर्त्यांमध्येही असंतोष पसरलेला आहे. तो नागपूरच्या बैठकीत उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी