शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

दलालांची धरपकड

By admin | Updated: June 13, 2014 01:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने आकस्मिक भेट देऊन तेथील दलालांची धरपकड केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे केंद्रातील दलालांची पळापळ झाली.

सेतू केंद्रात विशेष पथकाची कारवाई : वकिलांचाही समावेशनागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने आकस्मिक भेट देऊन तेथील दलालांची धरपकड केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे केंद्रातील दलालांची पळापळ झाली. त्यात काही वकिलांचाही समावेश होता. पथकाने तिघांना पकडले असून, त्यांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सेतू केंद्रात गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेऊन बाहेरचे दलालही सक्रिय झाले आहेत. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या सूचनेनुसार आकस्मिक कारवाईसाठी चार विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्याकडे सेतू केंद्रातील वाईट प्रकारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गुरुवारी अधीक्षक राजेश पोहनकर यांच्या नेतृत्वाखालील चार जणांच्या पथकाने दुपारी सेतू केंद्राला भेट दिली. या पथकाला केंद्रात सात जणांकडे आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली. त्यांची तपासणी केली असता ते सेतू केंद्रातील कागदपत्रे असल्याची आढळून आली. तपासणी सुरू होताच केंद्रात पळापळ सुरू झाली. सातपैकी तीन जण पथकाच्या हाती लागले. त्यात पुरुषोत्तम हटवार, आशिष हांडे आणि सतीश माळी यांचा समावेश आहे. त्यांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. उर्वरितांनी कागदपत्रे टाकून पळ काढला. पथकाची कारवाई पुढच्या काळात रोज होणार असल्याचे पोहनकर यांनी सांगितले.सेतू केंद्रात वकिलांचे काम काय?सेतू केंद्रात वकिलांचे काम काय, असा सवाल प्रशासनाने केला आहे. वकिलांनी न्यायालयात जावे. मात्र ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सायकल स्टॅन्डवर बसतात. आकस्मिक तपासणीच्या वेळी त्यांच्याजवळ केंद्रातील कागदपत्रेही सापडली आहेत. हा प्रकार गंभीर आहे. सायकल स्टॅन्डवर गेल्यावर तेथील दलाल नागरिकांना घेरून घेतात. विशेष म्हणजे केंद्रात आणि बाहेरही पोलीस तैनात असताना दलाल येथे सक्रिय आहेत.(प्रतिनिधी)