शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

दलाल पोहोचवित आहेत दुकानांमध्ये ग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST

नागपूर : आता लॉकडाऊनमुळे शटर बंद असलेल्या दुकानांमध्ये दलालांच्या माध्यमातून ग्राहक पोहोचत असल्याची माहिती आहे. याकरिता दलालाला १० टक्के ...

नागपूर : आता लॉकडाऊनमुळे शटर बंद असलेल्या दुकानांमध्ये दलालांच्या माध्यमातून ग्राहक पोहोचत असल्याची माहिती आहे. याकरिता दलालाला १० टक्के कमिशन मिळत आहे. हा प्रकार मुख्यत्त्वे इतवारी आणि गांधीबाग येथील कपड्यांच्या दुकानात सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी इतवारी आणि गांधीबाग भागातील कपड्यांच्या दुकानात मनपाच्या एनडीएस पथकाने धाड टाकून दुकानदाराकडून दंड वसूल केला होता. जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त उर्वरित सर्वच दुकानांना व्यवसाय बंद ठेवण्याचे कठोर निर्बंध आहेत. त्यानंतरही अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय शटरआड सुरूच आहे. आता दुकानात ग्राहक आणण्याची जबाबदारी दलालांवर दिली आहे. दलाल बाजारात बसतात आणि ग्राहक हेरून त्यांना खरेदीसाठी ठरावीक दुकानात नेतात. खरेदी किमतीच्या १० टक्के कमिशन दलालाला मिळते. त्यामुळे काही दिवसात दलालांची संख्या वाढली आहे.

लॉकडाऊनमध्ये व्यापारी आणि दलाल आपापल्या कमाईत जुंपले आहेत. सूत्रांनी सांगितले, इतवारी आणि गांधीबाग येथील कपडा बाजारात जवळपास २५ ते ३० दलाल सक्रिय आहेत. गांधीबाग क्लॉथ मार्केटमधील दलाल रस्त्यावरून जाणाऱ्या ग्राहकांची विचारपूस करून त्यांना दुकानापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. हा प्रकार चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येते. ग्राहक हेरल्यानंतर दलाल दुकानदाराशी मोबाइलवरून संपर्क साधतो. शटर उघडून ग्राहकाला आत नेले जाते. पोलीस आणि एनडीएस पथक आल्यानंतर सर्व दलाल गायब होतात. सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत या दलालांची सक्रियता दिसून येते. हा प्रकार कोरोना संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. अनेक होलसेल कापड व्यापारी विभागाशी सेटिंग करून व्यवसाय करीत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

होलसेल क्लॉथ मार्केट परिसरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानंतर हा परिसर हॉटस्पॉट घोषित केला होता. या ठिकाणी टिनाचे कठडे लावून मार्ग बंद करण्यात आला होता. पण कठडे हटल्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू झाला असून त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची भीती पुन्हा वाढली आहे. पोलीस आणि मनपाने चोरून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.