शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

वर्धा व जाम नदीवरील पूल कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST

जलालखेडा : काटाेल-जलालखेडा-वरुड मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्गावर नरखेड तालुक्यात जाम व वर्धा नदीवर ...

जलालखेडा : काटाेल-जलालखेडा-वरुड मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्गावर नरखेड तालुक्यात जाम व वर्धा नदीवर माेठे पूल असून, त्यांचे बांधकाम अनुक्रमे ४५ व ६० वर्षांपूर्वी करण्यात आल्याने ते दाेन्ही पूल कालबाह्य झाले असल्याने त्यावरून हाेणारी जड वाहतूक धाेकादायक ठरत आहे. या नद्यांवरील पुलांचे बांधकाम तीन वर्षांपासून अर्धवट असल्याने ते कधी पूर्ण केले जाणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

हा मार्ग अमरावती, वर्धा तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याला जाेडणारा असल्याने त्यावर सतत रहदारी असते. मध्यंतरी या मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाला सुरुवात करण्यात आली. काटाेल ते वरुड दरम्यानच्या राेडचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्याचवेळी या दाेन्ही नद्यांवर पुलांचे बांधकाम करावयाचे हाेते. त्याअनुषंगाने दाेन्ही पुलांच्या बांधकामास तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली.

यात जाम नदीच्या पात्रात १२ ते १५ फूट तर वर्धा नदीच्या पात्रात २ ते ४ फूट उंचीचे काॅलम तयार करण्यात आले. त्यानंतर या पुलांचे काेणतेही काम करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, दाेन्ही पूल वळणावर असून, थाेडे सखल आहेत. त्यांचे सुरक्षा कठडेही तुटलेले आहेत. त्यामुळे येथे हाेणारे अपघात टाळण्यासाठी दाेन्ही पुलांचे वळण शक्यताे कमी करणे आणि ते राेडला समांतर करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे केले जात असलेले दुर्लक्ष अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

---

४५ ते ६० वर्षांपूर्वीचे बांधकाम

जाम नदीवरील पुलाचे बांधकाम ४५ वर्षांपूर्वी अर्थात सन १९७५ मध्ये आणि वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम ६० वर्षांपूर्वी म्हणजेच १९६० साली करण्यात आले. या दाेन्ही नद्यांना दरवर्षी पूर येताे. सन १९९१ साली आलेल्या पुरामुळे भारसिंगी नजीकच्या जाम नदीवरील पुलासाेबतच जलालखेडा नजीकच्या वर्धा नदीवरील पुलाला तडे गेले हाेते. या पुलांचा काही भाग वाहूनही गेला हाेता. दरवेळी जुजबी दुरुस्ती करून काळ काढला जात आहे.