शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा व जाम नदीवरील पूल कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST

जलालखेडा : काटाेल-जलालखेडा-वरुड मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्गावर नरखेड तालुक्यात जाम व वर्धा नदीवर ...

जलालखेडा : काटाेल-जलालखेडा-वरुड मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्गावर नरखेड तालुक्यात जाम व वर्धा नदीवर माेठे पूल असून, त्यांचे बांधकाम अनुक्रमे ४५ व ६० वर्षांपूर्वी करण्यात आल्याने ते दाेन्ही पूल कालबाह्य झाले असल्याने त्यावरून हाेणारी जड वाहतूक धाेकादायक ठरत आहे. या नद्यांवरील पुलांचे बांधकाम तीन वर्षांपासून अर्धवट असल्याने ते कधी पूर्ण केले जाणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

हा मार्ग अमरावती, वर्धा तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याला जाेडणारा असल्याने त्यावर सतत रहदारी असते. मध्यंतरी या मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाला सुरुवात करण्यात आली. काटाेल ते वरुड दरम्यानच्या राेडचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्याचवेळी या दाेन्ही नद्यांवर पुलांचे बांधकाम करावयाचे हाेते. त्याअनुषंगाने दाेन्ही पुलांच्या बांधकामास तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली.

यात जाम नदीच्या पात्रात १२ ते १५ फूट तर वर्धा नदीच्या पात्रात २ ते ४ फूट उंचीचे काॅलम तयार करण्यात आले. त्यानंतर या पुलांचे काेणतेही काम करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, दाेन्ही पूल वळणावर असून, थाेडे सखल आहेत. त्यांचे सुरक्षा कठडेही तुटलेले आहेत. त्यामुळे येथे हाेणारे अपघात टाळण्यासाठी दाेन्ही पुलांचे वळण शक्यताे कमी करणे आणि ते राेडला समांतर करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे केले जात असलेले दुर्लक्ष अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

---

४५ ते ६० वर्षांपूर्वीचे बांधकाम

जाम नदीवरील पुलाचे बांधकाम ४५ वर्षांपूर्वी अर्थात सन १९७५ मध्ये आणि वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम ६० वर्षांपूर्वी म्हणजेच १९६० साली करण्यात आले. या दाेन्ही नद्यांना दरवर्षी पूर येताे. सन १९९१ साली आलेल्या पुरामुळे भारसिंगी नजीकच्या जाम नदीवरील पुलासाेबतच जलालखेडा नजीकच्या वर्धा नदीवरील पुलाला तडे गेले हाेते. या पुलांचा काही भाग वाहूनही गेला हाेता. दरवेळी जुजबी दुरुस्ती करून काळ काढला जात आहे.