शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

वर्धा व जाम नदीवरील पूल कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST

जलालखेडा : काटाेल-जलालखेडा-वरुड मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्गावर नरखेड तालुक्यात जाम व वर्धा नदीवर ...

जलालखेडा : काटाेल-जलालखेडा-वरुड मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्गावर नरखेड तालुक्यात जाम व वर्धा नदीवर माेठे पूल असून, त्यांचे बांधकाम अनुक्रमे ४५ व ६० वर्षांपूर्वी करण्यात आल्याने ते दाेन्ही पूल कालबाह्य झाले असल्याने त्यावरून हाेणारी जड वाहतूक धाेकादायक ठरत आहे. या नद्यांवरील पुलांचे बांधकाम तीन वर्षांपासून अर्धवट असल्याने ते कधी पूर्ण केले जाणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

हा मार्ग अमरावती, वर्धा तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याला जाेडणारा असल्याने त्यावर सतत रहदारी असते. मध्यंतरी या मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाला सुरुवात करण्यात आली. काटाेल ते वरुड दरम्यानच्या राेडचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्याचवेळी या दाेन्ही नद्यांवर पुलांचे बांधकाम करावयाचे हाेते. त्याअनुषंगाने दाेन्ही पुलांच्या बांधकामास तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली.

यात जाम नदीच्या पात्रात १२ ते १५ फूट तर वर्धा नदीच्या पात्रात २ ते ४ फूट उंचीचे काॅलम तयार करण्यात आले. त्यानंतर या पुलांचे काेणतेही काम करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, दाेन्ही पूल वळणावर असून, थाेडे सखल आहेत. त्यांचे सुरक्षा कठडेही तुटलेले आहेत. त्यामुळे येथे हाेणारे अपघात टाळण्यासाठी दाेन्ही पुलांचे वळण शक्यताे कमी करणे आणि ते राेडला समांतर करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे केले जात असलेले दुर्लक्ष अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

---

४५ ते ६० वर्षांपूर्वीचे बांधकाम

जाम नदीवरील पुलाचे बांधकाम ४५ वर्षांपूर्वी अर्थात सन १९७५ मध्ये आणि वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम ६० वर्षांपूर्वी म्हणजेच १९६० साली करण्यात आले. या दाेन्ही नद्यांना दरवर्षी पूर येताे. सन १९९१ साली आलेल्या पुरामुळे भारसिंगी नजीकच्या जाम नदीवरील पुलासाेबतच जलालखेडा नजीकच्या वर्धा नदीवरील पुलाला तडे गेले हाेते. या पुलांचा काही भाग वाहूनही गेला हाेता. दरवेळी जुजबी दुरुस्ती करून काळ काढला जात आहे.