शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

लाचखोरांना बाप्पाचीही भीती नाही

By admin | Updated: September 23, 2015 06:28 IST

विघ्नहर्ता श्री गणेशाच्या उत्सवात सारे भाविक दंगले आहेत. आपल्या पापाची, वाईट कर्माची क्षमा मागून भविष्यात

नागपूर : विघ्नहर्ता श्री गणेशाच्या उत्सवात सारे भाविक दंगले आहेत. आपल्या पापाची, वाईट कर्माची क्षमा मागून भविष्यात कोणतेही वाईट काम हातून घडू नये, अशी याचना सर्वसाधारण भाविक बाप्पाकडे करीत आहेत. मात्र, लाचखोर त्याला अपवाद आहेत. त्यांना बाप्पांचीही भीती नाही. काम घेऊन आलेल्यांकडून चिरीमिरी उकळण्यात ते व्यस्त असतात. अशातीलच एक स्वास्थ्य निरीक्षक आणि एका तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. मंगळवारी नागपूर आणि रामटेकमध्ये ही कारवाई करण्यात आली.महापालिकेच्या हनुमाननगर झोनमध्ये स्वास्थ निरीक्षक असलेला संजय लक्ष्मणराव नगराळे (वय ५३) हा सफाई कामगारांना गैरहजरी लावण्याची धमकी देऊन लाच उकळतो, अशी ओरड होती. सूरज तुरकेल याला २ हजार तर सिध्दार्थ नारनवरे या सफाई कर्मचाऱ्याला नगराळेने धाक दाखवून ४ हजारांची लाच मागितली होती. या दोघांनीही सरळ एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नगराळेची तक्रार केली. त्यावरून जैन यांनी कारवाईचे आदेश दिले.(प्रतिनिधी)पहिल्यांदा दोन तक्रारदारएका लाचखोराविरुद्ध एकाच वेळी दोन जणांनी तक्रार करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. अधीक्षक जैन यांच्या आदेशानुसार सापळा रचण्यात आला. मंगळवारी हुडकेश्वर परिसरात पहाटे ५ च्या सुमारास तुरकेल आणिं नारनवरेने नगराळेला अनुक्रमे २ आणि ४ हजारांची लाच दिली. ती स्वीकारताच पोलीस निरीक्षक आसाराम शेटे,हवालदार विलास खनके, नायक संतोष पुंडकर, चंद्रनाग ताकसांडे यांनी नगराळेच्या मुसक्या बांधल्या.दुसरी कारवाई खुमारीतरामटेक : अतिवृष्टीमुळे घर आणि शेतीचे नुकसान झाल्याने त्याची भरपाई देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई मंगळवारी खुमारी (ता. रामटेक) येथे करण्यात आली. दत्तू कामडे (४२, रा. पालोरा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. धनराज शंकर ठाकूर (४७, रा. सत्रापूर) असे फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. बोरडा (सराखा) ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या सत्रापूर येथे त्याचे घर आहे. ७ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ते घर पूर्णत: जमीनदोस्त झाले. तसेच त्याच्याकडील शेत पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची भरपाई म्हणून शासनाकडून दोन धनादेश आले आल्याचे धनराजला सांगण्यात आले. यासाठी त्याने बँकेचे खातेक्रमांक तलाठ्याला दिले. सदर धनादेश मिळावे म्हणून धनराजने तलाठ्याकडे पाठपुरावा केला. दरम्यान तलाठी कामडे याने पाच हजार रुपये दिल्याशिवाय तुझे काम होणार नाही, असे सांगितले. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले होते.