शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

श्वास कोंडतोय !

By admin | Updated: September 19, 2016 02:35 IST

गणरायाचे विसर्जन आटोपले आणि आपण निश्चिंत झालो. मात्र विसर्जनानंतर पाण्यात मिसळलेल्या रसायनामुळे आम्लाचे प्रमाण वाढले

निशांत वानखेडे नागपूरगणरायाचे विसर्जन आटोपले आणि आपण निश्चिंत झालो. मात्र विसर्जनानंतर पाण्यात मिसळलेल्या रसायनामुळे आम्लाचे प्रमाण वाढले असून आॅक्सिजनचे प्रमाण चिंताजनकरीत्या कमी झाले आहे. आॅक्सिजनचे प्रमाण घटणे तलावातील सजीव सृष्टीसाठी हानीकारक ठरणारे आहे. शिवाय तलावात साठलेल्या निर्माल्यामुळे तलावच नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रीन व्हिजील या संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.आॅक्सिजन हा जसा मनुष्य प्राण्यासाठी प्राणवायू आहे तसा तो पाण्यातील जीवसृष्टीसाठीही महत्त्वाचा घटक आहे. जलचर पाण्यातील आॅक्सिजन शोषून घेतात. तलावातील मासे किंवा इतर प्राण्यांच्या मरण्याच्या घटना कानावर पडत असतात. जैवीक घटकांवर बाह्य आक्रमण झाल्यास असा प्रकार घडतो हे संशोधनावरून समोर आले आहे. गेले दहा दिवस संपूर्ण शहर गणरायाच्या भक्तीत रंगले होते. मात्र ही आस्था इतर घटकांसाठी हानीकारक ठरू नये म्हणून प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र लोकांच्या भावनांसमोर हे प्रयत्न तोकडे पडले. कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन करूनही हजारो मूर्ती तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. त्यात केवळ मातीच्याच नाही तर पीओपीच्या मूर्तीही होत्या. त्यावर लावलेले रसायन आणि निर्माल्यामुळे होणारे विपरीत परिणाम आता समोर येत आहेत.