शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता डावलणे समानतेच्या हक्काचा भंगच

By admin | Updated: July 16, 2016 02:56 IST

प्रादेशिक कोट्यामुळे गुणवत्ता डावलून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात असतील तर, अशी कृती भारतीय नागरिकांना समानतेचा हक्क बहाल....

हायकोर्टाचे मत : वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रादेशिक कोट्याविरुद्धची याचिका नागपूर : प्रादेशिक कोट्यामुळे गुणवत्ता डावलून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात असतील तर, अशी कृती भारतीय नागरिकांना समानतेचा हक्क बहाल करणाऱ्या राज्यघटनेतील चौदाव्या अनुच्छेदाचा भंग ठरते असे मौखिक मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी व्यक्त केले. विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी ठेवण्यात येणारा प्रादेशिक कोटा रद्द करण्यात यावा, अशा विनंतीसह उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, त्यांनी २०१५ मधील प्रवेशाची स्थिती लक्षात घेता वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. २०१५ मध्ये प्रादेशिक कोट्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात गुणवत्ता यादीतील ४१३० व्या क्रमांकावरील विद्यार्थ्याला शेवटचा प्रवेश मिळाला होता. विदर्भातील शेवटचा प्रवेश २४७४ व्या क्रमांकावरील तर, मराठवाड्यातील शेवटचा प्रवेश २६७३ व्या क्रमांकावरील विद्यार्थ्याला मिळाला होता. प्रादेशिक कोट्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील असंख्य गुणवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. उर्वरित महाराष्ट्रात त्यांच्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. न्यायालयाने आता २०१४ मध्येही अशीच स्थिती होती काय हे पाहण्यासाठी याचिकाकर्त्यांना माहिती सादर करण्यास सांगितले आहे. याचिकेवर २२ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. तेजस्विनी गाडे व इतर चार पालकांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. त्यांची मुले वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी तयारी करीत आहेत. सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा चार गटात विभागण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राष्ट्रीयस्तरावर १५ टक्के तर, अपंगांसाठी ३ टक्के जागा राखीव असतात. उर्वरित जागांमध्ये ७० टक्के प्रादेशिक तर, ३० टक्के राज्यस्तरीय कोटा असतो. शासकीय व शासनाद्वारे अनुदानित महाविद्यालयांतील ७५० जागा विदर्भात, ५०० जागा मराठवाड्यात तर, १६१० जागा उर्वरित महाराष्ट्रात आहेत. आता राज्यभरात एकच ‘सीईटी’ होत असल्यामुळे प्रादेशिक कोट्याची गरज नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)