शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

शिक्षक नियुक्ती घोळाला लागणार ‘ब्रेक’

By admin | Updated: January 26, 2015 00:52 IST

शासनाने २ मे २०१२ रोजी जीआर जारी करून अतिरिक्त ठरलेले शिक्षक १०० टक्के समायोजित झाल्याशिवाय नवीन शिक्षकांची भरती करण्यास मनाई केली आहे. या नियमाचे पालन

हायकोर्ट : जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देशनागपूर : शासनाने २ मे २०१२ रोजी जीआर जारी करून अतिरिक्त ठरलेले शिक्षक १०० टक्के समायोजित झाल्याशिवाय नवीन शिक्षकांची भरती करण्यास मनाई केली आहे. या नियमाचे पालन करताना घोळ होत आहे. ही बाब निदर्शनास आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा विषय जनहित याचिका म्हणून स्वीकारण्याचे निर्देश प्रबंधन कार्यालयाला दिले आहेत. गैरव्यवहार व जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ नये यासाठी नवीन शिक्षक नियुक्तीची परवानगी देणे व अतिरिक्त शिक्षकांची उपलब्धता यात पारदर्शकता असायला हवी, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. हिंगणघाट येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांनी घोळ घातला होता. वर्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी १२ एप्रिल २०१२ रोजी शिक्षकांच्या ५ रिक्त जागा भरण्याची संस्थेला परवानगी दिली होती. त्यानुसार संस्थेने २ मे २०१२ रोजी मुलाखती घेऊन शिक्षक नियुक्त केले. यानंतर त्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला. शिक्षणाधिकाऱ्यांनी २ मे रोजीच्या जीआरचे उदाहरण देऊन प्रस्तावाला मान्यता नाकारली. यामुळे संस्था व पीडित शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणात शिक्षणाधिकाऱ्याची भूमिका अवैध असल्याची बाब लक्षात घेता न्यायालयाने वरीलप्रमाणे निर्देश दिलेत. तसेच, संस्थेचा प्रस्ताव विचारात घेण्याचे व याप्रकरणाची ६ आठवड्यांत चौकशी पूर्ण करून शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणत्या परिस्थितीत नवीन नियुक्तीला परवानगी दिली याचा अहवाल सादर करण्यास सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)काय म्हणाले न्यायालयनवीन शिक्षक भरतीची परवानगी देण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षक उपलब्ध आहेत काय हे पाहण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्याची आहे. नवीन शिक्षक भरतीची परवानगी देणे याचा अर्थ अतिरिक्त शिक्षक उपलब्ध नाहीत असा होतो. यामुळे नवीन नियुक्ती झाल्यानंतर त्याला मान्यता नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देताना अतिरिक्त शिक्षक पाठविल्यास त्यांना समायोजित करण्याची व नवीन शिक्षकांची सेवासमाप्त करण्याची जबाबदारी संस्थेची राहील, अशी अट ठेवली होती. ही अट असयुक्तिक असून शिक्षणाधिकारी अशाप्रकारचा आदेश कसा जारी करू शकतात, असा सवाल न्यायालयाने केला आहे. ही कर्तव्यातील हयगय आहे किंवा यामागे दुसरा हेतू असावा असे ताशेरेही न्यायालयाने ओढले आहेत.