शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

राष्ट्रीय पेयजल योजनेला ब्रेक

By admin | Updated: January 31, 2016 02:55 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, तसेच नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे,

गणेश हूड नागपूरग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, तसेच नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने युपीए सरकारच्या काळात राष्ट्रीय पेयजल योजना हाती घेण्यात आली होती. गत काळात या योजनेच्या माध्यमातनू हजारो गावांतील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला. परंतु गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने या योजनेचा निधी थांबविल्याने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील २१८ पाणीपुरवठा योजनांना ब्रेक लागले आहेत. हा कार्यक्रम मागणी आधारित असल्याने ज्या गावात पाणीटंचाई आहे, तसेच जी ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल करु न देखभाल व दुरुस्तीसाठी सक्षम आहे, अशाच गावांची निवड या योजनेसाठी केली जाते. त्यानुसार २०१५-१६ या वर्षासाठी सहा जिल्ह्यातील ३४५ गावांतील योजनांचा समावेश करून यासाठी २५०.९७ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता.यात नागपूर जिल्ह्यातील १०२, वर्धा ५८, भंडारा ३६, गोंदिया ४८, चंद्रपूर ५० व गडचिरोली जिल्ह्यातील ५१ योजना प्रस्तावित होत्या. यासाठी केंद्र व राज्य सरकारचा प्रत्येकी ५० टक्के निधी अपेक्षित होता. मात्र केंद्र सरकारकडून १२६ कोटींचा निधी अपेक्षित असताना जेमतेम ४५.८६ कोटी तर राज्य सरकारकडून ८२.२३ कोटी मिळाले. पुरेसा निधी न मिळाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आराखड्यातील ११० योजनांचीच कामे पूर्ण करता आली. दरम्यान १२ जुलै २०१५ च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने योजनासंदर्भात आदेश निर्गमित केले. त्यानुसार २९ जून २०१५ पूर्वी कार्यादेश दिलेल्या योजनांवरच उपलब्ध निधी खर्च करावयाचा आहे. तसेच ज्या योजना निविदा प्रक्रियेत आहेत, अशा योजनांची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत नसतानाच या आदेशामुळे नागपूर विभागातील राष्ट्रीय पेयजल योजनांच्या कामांना ब्रेक लागले आहेत.