शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

राष्ट्रीय पेयजल योजनेला ब्रेक

By admin | Updated: January 31, 2016 02:55 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, तसेच नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे,

गणेश हूड नागपूरग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, तसेच नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने युपीए सरकारच्या काळात राष्ट्रीय पेयजल योजना हाती घेण्यात आली होती. गत काळात या योजनेच्या माध्यमातनू हजारो गावांतील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला. परंतु गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने या योजनेचा निधी थांबविल्याने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील २१८ पाणीपुरवठा योजनांना ब्रेक लागले आहेत. हा कार्यक्रम मागणी आधारित असल्याने ज्या गावात पाणीटंचाई आहे, तसेच जी ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल करु न देखभाल व दुरुस्तीसाठी सक्षम आहे, अशाच गावांची निवड या योजनेसाठी केली जाते. त्यानुसार २०१५-१६ या वर्षासाठी सहा जिल्ह्यातील ३४५ गावांतील योजनांचा समावेश करून यासाठी २५०.९७ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता.यात नागपूर जिल्ह्यातील १०२, वर्धा ५८, भंडारा ३६, गोंदिया ४८, चंद्रपूर ५० व गडचिरोली जिल्ह्यातील ५१ योजना प्रस्तावित होत्या. यासाठी केंद्र व राज्य सरकारचा प्रत्येकी ५० टक्के निधी अपेक्षित होता. मात्र केंद्र सरकारकडून १२६ कोटींचा निधी अपेक्षित असताना जेमतेम ४५.८६ कोटी तर राज्य सरकारकडून ८२.२३ कोटी मिळाले. पुरेसा निधी न मिळाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आराखड्यातील ११० योजनांचीच कामे पूर्ण करता आली. दरम्यान १२ जुलै २०१५ च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने योजनासंदर्भात आदेश निर्गमित केले. त्यानुसार २९ जून २०१५ पूर्वी कार्यादेश दिलेल्या योजनांवरच उपलब्ध निधी खर्च करावयाचा आहे. तसेच ज्या योजना निविदा प्रक्रियेत आहेत, अशा योजनांची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत नसतानाच या आदेशामुळे नागपूर विभागातील राष्ट्रीय पेयजल योजनांच्या कामांना ब्रेक लागले आहेत.