शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

उखडलेले सिमेंट रस्ते तोडा

By admin | Updated: May 19, 2017 02:47 IST

दोन मीटरपेक्षा जास्त उखडलेला सिमेंट रस्ता तोडा, अन्यथा तो जीवासाठी धोकादायक ठरू शकतो, अशा सूचना तज्ज्ञांच्या समितीने बांधकाम विभागाला दिल्याची माहिती आहे.

तज्ज्ञांची बांधकाम विभागाला सूचना : खामला ते त्रिमूर्तीनगर मार्गावर क्रॅक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन मीटरपेक्षा जास्त उखडलेला सिमेंट रस्ता तोडा, अन्यथा तो जीवासाठी धोकादायक ठरू शकतो, अशा सूचना तज्ज्ञांच्या समितीने बांधकाम विभागाला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बांधण्यात येत असलेला खामला ते त्रिमूर्तीनगर सिमेंट रस्ता जवळपास १५ ठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकाला त्यातून मार्ग काढताना समस्या उद्भवत आहे. तज्ज्ञांच्या सूचनेनुसार खामला ते त्रिमूर्तीनगर या दरम्यानचे उखडलेले सिमेंट रस्ते नव्याने बांधावे लागणार आहेत. नागपुरात बांधण्यात येणारे सिमेंटचे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याची वृत्तमालिका लोकमतने छायाचित्रांसह प्रकाशित केली होती. त्याची दखल तज्ज्ञांच्या समितीने घेऊन बांधकाम विभागाला उपरोक्त आदेश दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रिंगरोड सिमेंट क्राँक्रिटने बांधण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास ४० कि़मी. लांबीच्या मार्गावर २०५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील रस्त्यांचाही समावेश करण्यात आला. रिंगरोडचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी बांधकाम सुरू झाल्यानंतर दर्जा निकृष्ट असल्याचा अहवाल पुढे येऊ लागला. याशिवाय मनपातर्फे बांधण्यात येणाऱ्या शहरातील सिमेंट रस्त्याचाही दर्जा निकृष्ट आहे. लोकमतच्या वृत्तानंतर प्रशासनाने बांधकामाची दखल घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आशिष सिंग यांनी रस्त्याच्या पाहणीसाठी दोन तज्ज्ञांना पाठविले. त्यांनी रस्त्याच्या दर्जाची स्थिती जाणून घेतली. अनेक सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्याचे त्यांना दिसून आले. रस्त्याचे उखडलेले पॅचेस तोडण्यास सांगितले आहे. बांधकाम विभागाने निर्देशाची दखल घेत उखडलेले रस्ते नव्याने बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. रिंगरोडवर आतापर्यंत जवळपास १० कि़मी. रस्त्याचे बांधकाम झाले आहे. पण अनेक ठिकाणी दोन रस्त्याला न जोडल्याने वाहनचालकाला वाहन चालविताना समस्या उद्भवत आहे. नागपुरातील तापमान वाढल्याने रस्त्याला भेगा पडल्याचा संबंधित अधिकाऱ्यांचा दावा आहे. पण नागपुरात दरवर्षी एवढेच तापमान असते, हे त्यांना माहीत असतानाही अधिकाऱ्यांचे वक्तव्य आश्चर्य व्यक्त करणारे आहे. रिंगरोड सिमेंट क्राँक्रिटचा बांधण्यासाठी केंद्राकडून दिवाळीपासून निधी आलेला नाही. आतापर्यंत केवळ ४० कोटी रुपये आले आहेत. जवळपास ४० कि़मी.चे बांधकाम सप्टेंबर २०१५ पर्यंत होणे अपेक्षित होते. पण निधीअभावी काम थांबले आहे. कामाचा वेग असाच राहिल्यास रिंगरोडचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्ष लागतील, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली.