शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ब्राझील स्वीट ऑरेंजची पाच ‘व्हेरायटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:30 IST

‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये प्रथमच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने ब्राझील ‘स्वीट ऑरेंज’चा पाच ‘व्हेरायटी’ सादर केल्या आहेत. कंपनीने या ‘व्हेरायटी’मधून ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट ऑरेंज’ तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. याची माहिती घेण्यासाठी कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देजैन इरिगेशन सिस्टीमच्या स्टॉलमधून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये प्रथमच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने ब्राझील ‘स्वीट ऑरेंज’चा पाच ‘व्हेरायटी’ सादर केल्या आहेत. कंपनीने या ‘व्हेरायटी’मधून ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट ऑरेंज’ तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. याची माहिती घेण्यासाठी कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अशोक अग्रवाल यांनी सांगितले, जैन स्वीट ऑरेंजच्या पाच जाती उपलब्ध आहेत. या नवीन जाती जास्त उत्पन्न देणाऱ्या लवकर व उशिरा काढणीस योग्य अशा आहेत. जमीन व पाण्याची सुपीकता व प्रत यानुसार या नवीन जातीपांसून शेतकरी सरासरीपेक्षा दुप्पट उत्पादने घेऊ शकतात, असेही ते म्हणाले. ‘स्टॉल’वरून मोसंबी लागवडीसाठी जमिनीची माहिती, लागवडीसाठी हवामान, जातीची माहिती, अभिवृद्धी व लागवड कशी करावी याची माहिती दिली जात आहे.पारंपरिक व आधुनिक लागवडीची तुलनाजैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांना पारंपारिक व आधुनिक जैन स्वीट ऑरेंजची तुलनाची माहितीही दिली जात आहे. यात पारंपरिक पद्धतीत मोसंबी लागवड ही गादी वाफ्यावर जमिनीत केली जाते तर आधुनिक लागवडीमध्ये माती विरहित कपात ग्रीनहाऊसमध्ये केली जाते. पारंपरिक पद्धतीमध्ये खुंटापासून रोगांचा प्रसार होतो तर आधुनिक पद्धतीत खुंटापासून रोगाच्या प्रसाराला आळा बसतो. अशा अनेकबाबतीत तुलनात्मक माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.ठिंबकमधून ५० टक्के पाण्याची बचतअग्रवाल म्हणाले, ठिंबक सिंचनामधून ५० टक्के पाण्याची बचत होते. कारण पाणी हे जमिनीस न देता पिकांना दिले जाते. मुळांच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती आणि हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो. वाफसा स्थिती कायम राहत असल्यामुळे पिकाची सतत व जोमदार वाढ होते. पिकास पाणी दररोज अथवा गरजेप्रमाणे एक दिवसाआड देता येते. पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. परिणामी, उत्पादनात वाढ, फळे दर्जेदार व एकसारखी येतात.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर