शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ब्राझील स्वीट ऑरेंजची पाच ‘व्हेरायटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:30 IST

‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये प्रथमच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने ब्राझील ‘स्वीट ऑरेंज’चा पाच ‘व्हेरायटी’ सादर केल्या आहेत. कंपनीने या ‘व्हेरायटी’मधून ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट ऑरेंज’ तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. याची माहिती घेण्यासाठी कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देजैन इरिगेशन सिस्टीमच्या स्टॉलमधून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये प्रथमच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने ब्राझील ‘स्वीट ऑरेंज’चा पाच ‘व्हेरायटी’ सादर केल्या आहेत. कंपनीने या ‘व्हेरायटी’मधून ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट ऑरेंज’ तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. याची माहिती घेण्यासाठी कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अशोक अग्रवाल यांनी सांगितले, जैन स्वीट ऑरेंजच्या पाच जाती उपलब्ध आहेत. या नवीन जाती जास्त उत्पन्न देणाऱ्या लवकर व उशिरा काढणीस योग्य अशा आहेत. जमीन व पाण्याची सुपीकता व प्रत यानुसार या नवीन जातीपांसून शेतकरी सरासरीपेक्षा दुप्पट उत्पादने घेऊ शकतात, असेही ते म्हणाले. ‘स्टॉल’वरून मोसंबी लागवडीसाठी जमिनीची माहिती, लागवडीसाठी हवामान, जातीची माहिती, अभिवृद्धी व लागवड कशी करावी याची माहिती दिली जात आहे.पारंपरिक व आधुनिक लागवडीची तुलनाजैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांना पारंपारिक व आधुनिक जैन स्वीट ऑरेंजची तुलनाची माहितीही दिली जात आहे. यात पारंपरिक पद्धतीत मोसंबी लागवड ही गादी वाफ्यावर जमिनीत केली जाते तर आधुनिक लागवडीमध्ये माती विरहित कपात ग्रीनहाऊसमध्ये केली जाते. पारंपरिक पद्धतीमध्ये खुंटापासून रोगांचा प्रसार होतो तर आधुनिक पद्धतीत खुंटापासून रोगाच्या प्रसाराला आळा बसतो. अशा अनेकबाबतीत तुलनात्मक माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.ठिंबकमधून ५० टक्के पाण्याची बचतअग्रवाल म्हणाले, ठिंबक सिंचनामधून ५० टक्के पाण्याची बचत होते. कारण पाणी हे जमिनीस न देता पिकांना दिले जाते. मुळांच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती आणि हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो. वाफसा स्थिती कायम राहत असल्यामुळे पिकाची सतत व जोमदार वाढ होते. पिकास पाणी दररोज अथवा गरजेप्रमाणे एक दिवसाआड देता येते. पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. परिणामी, उत्पादनात वाढ, फळे दर्जेदार व एकसारखी येतात.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर