शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

‘बाऊन्सर’ प्रकरणात विद्यापीठ ‘बॅकफूट’वर

By admin | Updated: December 29, 2016 02:44 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘बाऊन्सर्स’ नेमल्याप्रकरणात प्रशासन ‘बॅकफूट’वर गेले आहे.

खासगी सुरक्षा रक्षक हटणार : मुख्य प्रवेशद्वारदेखील उघडण्यात येणार नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘बाऊन्सर्स’ नेमल्याप्रकरणात प्रशासन ‘बॅकफूट’वर गेले आहे. खासगी सुरक्षा संस्थेचे हे ‘बाऊन्सर्स’ हटविण्यात येणार असून विद्यापीठाच्या संरक्षणाची जबाबदारी ‘महाराष्ट्र पोलीस सिक्युरिटी फोर्स’ कडे देण्यात येणार आहे. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वारदेखील सर्वांसाठी खुले होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘बाऊन्सर्स’ प्रकरणात विद्यापीठावर जोरदार टीका झाली होती. विविध परीक्षा केंद्रांवरील पार्किंग शुल्काच्या मुद्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कुलगुरूंच्या कक्षात ‘सायकल चलावो’ आंदोलन केले होते. यानंतर तातडीने विद्यापीठाच्या सुरक्षेत वाढ केली. खासगी संस्थेचे सुरक्षारक्षक असतानाच आता कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या दालनापुढे ‘बाऊन्सर्स’ नेमण्यात आले. यानंतर विद्यापीठावर प्रचंड टीका करण्यात आली तसेच विद्यार्थी संघटनादेखील आक्रमक झाल्या. या मुद्यावर वातावरण तापल्यानंतर आता विद्यापीठातर्फे हे ‘बाऊन्सर्स’ नसल्याचाच दावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’कडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या वित्त समितीच्या बैठकीत या आशयाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर त्याला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात येईल. दरम्यान, विद्यापीठाचे स्थावर अधिकारी विनोद इलमे यांची चौकशी करण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले आहे.(प्रतिनिधी) कुलगुरूंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट विद्यापीठाच्या सुरक्षेच्या मुद्यावर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम् यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांनी कुलगुरूंना सुरक्षेसंदर्भात ‘एमएफएस’बाबत सुचविले. ही सुरक्षा एजन्सी पोलीस विभागाच्या अखत्यारित येत असून येथील सुरक्षा जवान पोलिसांच्या समकक्ष असतात. विशेष प्रशिक्षणातून हे जवान तयार झाले असतात. विशेष म्हणजे या सुरक्षा जवानांना अटक करण्याचेदेखील अधिकार असतात. शिवाय शस्त्रे बाळगण्याची या जवानांना मुभा असते. विद्यार्थी संघटनांनी केले स्वागत ‘बाऊन्सर्स’ हटविण्यासंदर्भातील निर्णयाचे विद्यार्थी संघटनांंनी स्वागत केले आहे. विद्यापीठ हे विद्येचे मंदिर असून तेथे अशा प्रकारे ‘बाऊन्सर्स’ नेमणे अयोग्यच होते, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे या मुद्यावर आंदोलन करण्यात आले होते.