शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

बोअरवेलचे ६०० प्रस्ताव !

By admin | Updated: June 28, 2014 02:38 IST

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारसंघात विकास कामे झाली नाही तर मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल..

नागपूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारसंघात विकास कामे झाली नाही तर मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, या भीतीने जिल्ह्यातील आमदार कामाला लागले आहेत. या घाईगडबडीत पावसाळ्यात शक्य नसलेल्या बोअरवेलच्या कामांसाठी त्यांनी आग्रह धरला आहे. ६०० हून अधिक बोअरवलेचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आले आहेत. परंतु पावसाळ्यात बोअरवेलची कामे कशी करायची असा प्रश्न विभागाला पडला आहे. आॅगस्टमध्ये निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा कौल कुणाच्या बाजूने राहील याचा अंदाज घेतला जात आहे. कौल कुणाच्याही बाजूने लागो, आमदार निधी आचारसंहितेपूर्वी खर्च करण्यावर आमदारांनी लक्ष केंद्रित केले आहे. वीज भारनियमनाचा ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत लोकांना बोअरवेलचा उपयोग होतो. त्यामुळे नळयोजना असलेल्या गावातही बोअरवेलची मागणी असते. लोकांची नाराजी नको म्हणून ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदारांनी मोठ्या प्रमाणात बोअरवेलचे प्रस्ताव दिलेले आहेत. परंतु आता याला उशीर झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दर वर्षीच्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाई निवारणाचा आराखडा तयार करून तो तीन टप्प्यात राबविला जातो. यात प्रामुख्याने बोअरवेल व नळयोजना दुरुस्तींच्या कामांचा समावेश असतो.पावसाळ्यात टंचाई निवारणाची कामे शक्य नसल्याने बंद ठेवली जातात. अर्थातच यात बोअरवेलच्या कामांचा समावेश असतो. तसेच पावसाळ्यात तीन-चार महिने रस्ते दुरुस्तीची कामे बंद ठेवली जातात. असे असूनही बोअरवेल व रस्ते दुरुस्तीच्या कामाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)