शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

बोअरवेलचे ६०० प्रस्ताव !

By admin | Updated: June 28, 2014 02:38 IST

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारसंघात विकास कामे झाली नाही तर मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल..

नागपूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदारसंघात विकास कामे झाली नाही तर मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, या भीतीने जिल्ह्यातील आमदार कामाला लागले आहेत. या घाईगडबडीत पावसाळ्यात शक्य नसलेल्या बोअरवेलच्या कामांसाठी त्यांनी आग्रह धरला आहे. ६०० हून अधिक बोअरवलेचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आले आहेत. परंतु पावसाळ्यात बोअरवेलची कामे कशी करायची असा प्रश्न विभागाला पडला आहे. आॅगस्टमध्ये निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा कौल कुणाच्या बाजूने राहील याचा अंदाज घेतला जात आहे. कौल कुणाच्याही बाजूने लागो, आमदार निधी आचारसंहितेपूर्वी खर्च करण्यावर आमदारांनी लक्ष केंद्रित केले आहे. वीज भारनियमनाचा ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत लोकांना बोअरवेलचा उपयोग होतो. त्यामुळे नळयोजना असलेल्या गावातही बोअरवेलची मागणी असते. लोकांची नाराजी नको म्हणून ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदारांनी मोठ्या प्रमाणात बोअरवेलचे प्रस्ताव दिलेले आहेत. परंतु आता याला उशीर झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दर वर्षीच्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाई निवारणाचा आराखडा तयार करून तो तीन टप्प्यात राबविला जातो. यात प्रामुख्याने बोअरवेल व नळयोजना दुरुस्तींच्या कामांचा समावेश असतो.पावसाळ्यात टंचाई निवारणाची कामे शक्य नसल्याने बंद ठेवली जातात. अर्थातच यात बोअरवेलच्या कामांचा समावेश असतो. तसेच पावसाळ्यात तीन-चार महिने रस्ते दुरुस्तीची कामे बंद ठेवली जातात. असे असूनही बोअरवेल व रस्ते दुरुस्तीच्या कामाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)