शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा पुस्तक बाजार संकटात

By admin | Updated: January 20, 2017 02:36 IST

शहरातील ८० वर्षे जुने आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा सीताबर्डी येथील जुन्या पुस्तकांचा बाजार संकटात सापडला आहे.

सीताबर्डीतील जुन्या पुस्तकांचा बाजार हटणार : पुस्तक विक्रेत्यांच्या रोजगारावर टांगती तलवारनागपूर : शहरातील ८० वर्षे जुने आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा सीताबर्डी येथील जुन्या पुस्तकांचा बाजार संकटात सापडला आहे. मेट्रो रेल्वेच्या स्टेशनमुळे हा बाजार हटविण्यात येणार असल्याने येथील पुस्तक विक्रेत्यांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सीताबर्डी येथील मॉरेस कॉलेज टी पॉर्इंट शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात असलेला जुना पुस्तक बाजार ही शहराची एक ओळख आहे.एनसीआरटीईच्या पुस्तकांपासून तर एमबीबीएस, इंजिनियरिंग, कॉम्प्युटर, पॉलिटेक्निक, एलएलबी आदी विविध अभ्यासक्रमांचे तसेच स्पर्धा परीक्षांची पुस्तके येथे हमखास उपलब्ध होतात. इतकेच नव्हे तर इंग्रजी, हिंदी आणि मराठी साहित्याची पुस्तके सुद्धा येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि साहित्य रसिकांसाठी हा पुस्तक बाजार कित्येक वर्षांपासून आशेचे केंद्र ठरला आहे. विशेषत: गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तर हा महत्त्वाचा बाजार राहिलेला आहे. कारण उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना येथे महागडे पुस्तक अर्ध्या किमतीत उपलब्ध होते. एखाद्या एडिशनचे पुस्तक सबंध शहरात मिळाले नाही तर ते या जुन्या पुस्तकाचा बाजारात हमखास मिळेल, याची खात्री विद्यार्थ्यांना देणारा हा पुस्तक बाजार आहे. अनेक वर्षांपासून येथील विक्रेते या ठिकाणी आपला रोजगार इमानेइतबारे करीत आलेले आहेत. अनेकांनी तर पुस्तक विक्रीचे काम करीत स्वत:ही उच्च शिक्षण घेतले आहे. आता येथे असलेल्या सर्वच विक्रेत्यांचा हा प्रमुख रोजगार आहे. या रोजगारावरच त्यांचे कुटुंबही अवलंबून आहेत. परंतु आता या रोजगारावरच टांगती तलवार आहे. शहरात मेट्रो रेल्वेचे काम जोरात सुरू आहे. झिरो माईल रेल्वे स्टेशनचेही काम जोरावर आहे. या परिसरातच हा बाजार येत असल्याने तो हटविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांमध्ये भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. हा बाजार केवळ येथील विक्रेत्यांसाठीच नव्हे तर विद्यार्थी व पुस्तकप्रेमींसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या बाजारासंदर्भात शासन व प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी) आमच्या रोजगाराचे काय? आम्ही गेल्या तीन पिढ्यांपासून सीताबर्डी परिसरातच व्यवसाय करीत आहोत. बर्डी हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक जवळ असल्याने दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा परिसर चांगले ठिकाण आहे. त्यामुळे आम्ही या परिसरातच व्यवसाय करीत आलो आहेत. सर्वप्रथम सीताबर्डीचा पूल बांधला गेला. तेव्हा आम्हाला हटविण्यात आले. आता मेट्रो स्टेशनसाठी हटविले जात आहे. आमचा विकासाला विरोध नाही. परंतु आमच्या रोजगाराचे काय? तत्कालीन पालकमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आम्ही संस्था रजिस्टर्ड केली. मनपा आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी पुस्तक विक्रेत्यांसाठी गाळे बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भातील आराखडा सुद्धा तयार केला होता. परंतु काहीच झाले नाही. आमच्या रोजगाराचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा आहे. - नरेश वाहाणेअध्यक्ष, नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था पुस्तक बाजार शहराची गरज जुना पुस्तक बाजार हा केवळ एक बाजार नसून विद्यार्थ्यांसाठी त्याचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. जे गरीब, मध्यमवर्गीय विद्यार्थी महागडे पुस्तक विकत घेऊ शकत नाही. त्यांना हा बाजार अर्ध्या किमतीत पुस्तक उपलब्ध करून देतो. इतकेच नव्हे तर संपूर्ण शहरात चांगल्या मोठ्या पुस्तकालयांमध्ये सुद्धा एखाद्या एडिशनचे बुक सापडले नाही, तर येथे ते हमखास मिळते. त्यामुळे हा पुस्तक बाजार विद्यार्थ्यांची व शहराची गरज आहे. - अंकुश जोशी, अभियांत्रिकी विद्याथी