शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बसपाच्या हत्तीने फोडला घाम

By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण

मताधिक्यात वाढ : विजयाचे समीकरण बदलण्यात यश आनंद डेकाटे - नागपूर महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण बदलण्यात बसपाला यश आले आहे. या निवडणुकीतही बसपाचा हत्ती जोरात चालला. विदर्भातील ६१ उमेदवारांनी तब्बल ६ लाख ८७ हजार ७८३ मते घेतली. यापैकी ४ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर तर १६ उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. उर्वरित उमेदवारांनीही समाधानकारक मते घेतली. परंतु तरीही बसपाला यंदा आमदारकीचे खाते उघडता आले नाही. बहुजन समाज पार्टी ही महाराष्ट्रात एक सशक्त राजकीय पार्टी असून विजयाचे समीकरण बदलणारा पक्ष अशी त्याची ओळख आहे. महाराष्ट्रात बसपाची मुख्य शक्ती ही विदर्भ आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून बसपाचा सफाया झाला. देशातील तिसरी राष्ट्रीय पार्टी असलेल्या बसपाच्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत बसपा सुप्रीमो मायावती यांना हरियाणा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपासून बरीच अपेक्षा होती. यातही महाराष्ट्रावरच अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यानुसार मायावती यांच्या महाराष्ट्रात आठ जाहीर सभा झाल्या. यापैकी नागपूर आणि भंडारा येथे प्रत्येकी एक सभा घेण्यात आली. या सभेचा फायदाही बसपाला झाला. विदर्भात बसपाचे एकूण ६१ उमेदवार रिंगणात होते. यापैकी उत्तर नागपूरमधून किशोर गजभिये, भंडारा येथून देवांगणा गाढवे-वालदे आणि उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना घाम फोडला. हे तिघेही दुसऱ्या क्रमांकावर राहिले. किशोर गजभिये यांनी तब्बल ५५,१८७ मते घेतली. महाराष्ट्रात बसपाच्या उमेदवारांमध्ये ही सर्वाधिक मते ठरली. त्यानंतर भंडारा येथून देवांगणा गाढवे-वालदे यांनी ४५,००० मते घेतली. उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी ३४,०७७ मते घेतली. याशिवाय राजेंद्र पडोळे १६,५४०, (दक्षिण-पश्चिम नागपूर), सत्यभामा लोखंडे २३,१५६ (नागपूर-दक्षिण), दिलीप रंगारी १२,१६४(पूर्व नागपूर), अहमद कादर १४,२२३ (पश्चिम नागपूर), सुरेश डोंगरे ११,०९७ (सावनेर), महेंद्र गणवीर, ३१,६४९ (साकोली), अ‍ॅड. राजेश सिंग १०,३४४ (बल्लारपूर), मो. शमी लोखंडवाला ३४,४९८ (यवतमाळ), अभिजित ढेपे २९,२२९ (धामणगाव रेल्वे), हाजी मो. रफीक शेख २०,६०२ (अचलपूर), उमेश म्हैसकर २४,९७३ (देवळी पुलगाव), प्रलय तेलंग २५,१०० (हिंगणघाट), नीरज गुजर २२,२८३ (वर्धा) अशी उमेदवारांनी भरघोस मते घेतली. अनेक उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर उर्वरित उमेदवारांनी भरघोस मते घेत विजयाचे समीकरण बदलविले. परंतु बसपाला या निवडणुकीमध्येसुद्धा खाते उघडता आले नाही.