शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

बसपाच्या हत्तीने फोडला घाम

By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण

मताधिक्यात वाढ : विजयाचे समीकरण बदलण्यात यश आनंद डेकाटे - नागपूर महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण बदलण्यात बसपाला यश आले आहे. या निवडणुकीतही बसपाचा हत्ती जोरात चालला. विदर्भातील ६१ उमेदवारांनी तब्बल ६ लाख ८७ हजार ७८३ मते घेतली. यापैकी ४ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर तर १६ उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. उर्वरित उमेदवारांनीही समाधानकारक मते घेतली. परंतु तरीही बसपाला यंदा आमदारकीचे खाते उघडता आले नाही. बहुजन समाज पार्टी ही महाराष्ट्रात एक सशक्त राजकीय पार्टी असून विजयाचे समीकरण बदलणारा पक्ष अशी त्याची ओळख आहे. महाराष्ट्रात बसपाची मुख्य शक्ती ही विदर्भ आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून बसपाचा सफाया झाला. देशातील तिसरी राष्ट्रीय पार्टी असलेल्या बसपाच्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत बसपा सुप्रीमो मायावती यांना हरियाणा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपासून बरीच अपेक्षा होती. यातही महाराष्ट्रावरच अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यानुसार मायावती यांच्या महाराष्ट्रात आठ जाहीर सभा झाल्या. यापैकी नागपूर आणि भंडारा येथे प्रत्येकी एक सभा घेण्यात आली. या सभेचा फायदाही बसपाला झाला. विदर्भात बसपाचे एकूण ६१ उमेदवार रिंगणात होते. यापैकी उत्तर नागपूरमधून किशोर गजभिये, भंडारा येथून देवांगणा गाढवे-वालदे आणि उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना घाम फोडला. हे तिघेही दुसऱ्या क्रमांकावर राहिले. किशोर गजभिये यांनी तब्बल ५५,१८७ मते घेतली. महाराष्ट्रात बसपाच्या उमेदवारांमध्ये ही सर्वाधिक मते ठरली. त्यानंतर भंडारा येथून देवांगणा गाढवे-वालदे यांनी ४५,००० मते घेतली. उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी ३४,०७७ मते घेतली. याशिवाय राजेंद्र पडोळे १६,५४०, (दक्षिण-पश्चिम नागपूर), सत्यभामा लोखंडे २३,१५६ (नागपूर-दक्षिण), दिलीप रंगारी १२,१६४(पूर्व नागपूर), अहमद कादर १४,२२३ (पश्चिम नागपूर), सुरेश डोंगरे ११,०९७ (सावनेर), महेंद्र गणवीर, ३१,६४९ (साकोली), अ‍ॅड. राजेश सिंग १०,३४४ (बल्लारपूर), मो. शमी लोखंडवाला ३४,४९८ (यवतमाळ), अभिजित ढेपे २९,२२९ (धामणगाव रेल्वे), हाजी मो. रफीक शेख २०,६०२ (अचलपूर), उमेश म्हैसकर २४,९७३ (देवळी पुलगाव), प्रलय तेलंग २५,१०० (हिंगणघाट), नीरज गुजर २२,२८३ (वर्धा) अशी उमेदवारांनी भरघोस मते घेतली. अनेक उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर उर्वरित उमेदवारांनी भरघोस मते घेत विजयाचे समीकरण बदलविले. परंतु बसपाला या निवडणुकीमध्येसुद्धा खाते उघडता आले नाही.