शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

बसपाच्या हत्तीने फोडला घाम

By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण

मताधिक्यात वाढ : विजयाचे समीकरण बदलण्यात यश आनंद डेकाटे - नागपूर महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण बदलण्यात बसपाला यश आले आहे. या निवडणुकीतही बसपाचा हत्ती जोरात चालला. विदर्भातील ६१ उमेदवारांनी तब्बल ६ लाख ८७ हजार ७८३ मते घेतली. यापैकी ४ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर तर १६ उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. उर्वरित उमेदवारांनीही समाधानकारक मते घेतली. परंतु तरीही बसपाला यंदा आमदारकीचे खाते उघडता आले नाही. बहुजन समाज पार्टी ही महाराष्ट्रात एक सशक्त राजकीय पार्टी असून विजयाचे समीकरण बदलणारा पक्ष अशी त्याची ओळख आहे. महाराष्ट्रात बसपाची मुख्य शक्ती ही विदर्भ आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून बसपाचा सफाया झाला. देशातील तिसरी राष्ट्रीय पार्टी असलेल्या बसपाच्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत बसपा सुप्रीमो मायावती यांना हरियाणा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपासून बरीच अपेक्षा होती. यातही महाराष्ट्रावरच अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यानुसार मायावती यांच्या महाराष्ट्रात आठ जाहीर सभा झाल्या. यापैकी नागपूर आणि भंडारा येथे प्रत्येकी एक सभा घेण्यात आली. या सभेचा फायदाही बसपाला झाला. विदर्भात बसपाचे एकूण ६१ उमेदवार रिंगणात होते. यापैकी उत्तर नागपूरमधून किशोर गजभिये, भंडारा येथून देवांगणा गाढवे-वालदे आणि उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना घाम फोडला. हे तिघेही दुसऱ्या क्रमांकावर राहिले. किशोर गजभिये यांनी तब्बल ५५,१८७ मते घेतली. महाराष्ट्रात बसपाच्या उमेदवारांमध्ये ही सर्वाधिक मते ठरली. त्यानंतर भंडारा येथून देवांगणा गाढवे-वालदे यांनी ४५,००० मते घेतली. उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी ३४,०७७ मते घेतली. याशिवाय राजेंद्र पडोळे १६,५४०, (दक्षिण-पश्चिम नागपूर), सत्यभामा लोखंडे २३,१५६ (नागपूर-दक्षिण), दिलीप रंगारी १२,१६४(पूर्व नागपूर), अहमद कादर १४,२२३ (पश्चिम नागपूर), सुरेश डोंगरे ११,०९७ (सावनेर), महेंद्र गणवीर, ३१,६४९ (साकोली), अ‍ॅड. राजेश सिंग १०,३४४ (बल्लारपूर), मो. शमी लोखंडवाला ३४,४९८ (यवतमाळ), अभिजित ढेपे २९,२२९ (धामणगाव रेल्वे), हाजी मो. रफीक शेख २०,६०२ (अचलपूर), उमेश म्हैसकर २४,९७३ (देवळी पुलगाव), प्रलय तेलंग २५,१०० (हिंगणघाट), नीरज गुजर २२,२८३ (वर्धा) अशी उमेदवारांनी भरघोस मते घेतली. अनेक उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर उर्वरित उमेदवारांनी भरघोस मते घेत विजयाचे समीकरण बदलविले. परंतु बसपाला या निवडणुकीमध्येसुद्धा खाते उघडता आले नाही.