शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

हायकोर्ट न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा मुद्दा तापतोय; नवीन नियुक्त्या होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 11:46 IST

यासंदर्भात मुंबई वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच नागपूर येथील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनाही हा मुद्दा उचलून धरणार आहे.

राकेश घानोडे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा मुद्दा तापायला लागला आहे. नवीन नियुक्त्या तातडीने होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात मुंबई वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच नागपूर येथील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनाही हा मुद्दा उचलून धरणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाला न्यायमूर्तींची ९४ (७१ कायम व २३ अतिरिक्त) पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या ५९ (५२ कायम व ७ अतिरिक्त) न्यायमूर्तीच कार्यरत आहेत. न्यायमूर्तींची ३५ (१९ कायम व १६ अतिरिक्त) पदे रिक्त आहेत. परिणामी, न्यायालयात पूर्ण क्षमतेने कामकाज होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजी आहे. न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरली जावी, अशी वकिलांची मागणी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने १ फेब्रुवारी रोजी न्यायिक अधिकारी उर्मिला जोशी व बी. पी. देशपांडे यांची, तर, १६ फेब्रुवारी रोजी ॲड. किशोर संत, ॲड. वाल्मिकी मेनेझेस एसए, ॲड. कमल खाटा, ॲड. शर्मिला देशमुख, ॲड. अरुण पेडनेकर, ॲड. संदीप मारने, ॲड. गौरी गोडसे, ॲड. राजेश पाटील, ॲड. आरीफ डॉक्टर व ॲड. सोमाशेखर सुंदरेसन यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. परंतु, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.

यावर्षी नऊ न्यायमूर्ती सेवानिवृत्त होणार

यावर्षी उच्च न्यायालयातील न्या. संभाजी शिंदे १ ऑगस्ट, न्या. साधना जाधव १३ जून, न्या. विनय देशपांडे १८ मे, न्या. अनिल मेनन ११ जुलै, न्या. चंद्रकांत भडंग ४ नोव्हेंबर, न्या. विश्वास जाधव १६ मे, न्या. मुकुंद शेवलिकर २० सप्टेंबर, न्या. वीरेंद्रसिंग बिष्ट १८ जुलै, तर न्या. श्रीकांत कुलकर्णी १ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, नवीन नियुक्त्या न झाल्यास रिक्त पदांची संख्या पुन्हा वाढेल.

५.८० लाख प्रकरणे प्रलंबित

मुंबई उच्च न्यायालयात सध्या ५ लाख ८० हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात ४ लाख ८१ हजार दिवाणी, तर ९९ हजार फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरली गेल्यास प्रलंबित प्रकरणे वेगात निकाली निघतील, असे बोलले जात आहे.

रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे

न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. यासाठी संघटना आवश्यक प्रयत्न करणार आहे. वकिलांना न्यायालयाच्या कामकाजात गती हवी आहे. न्यायालयाला नवीन न्यायमूर्ती मिळाल्यास प्रलंबित प्रकरणे वेगात निकाली निघतील.

- ॲड. अतुल पांडे, अध्यक्ष, उच्च न्यायालय विधिज्ञ संघटना, नागपूर.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय