शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हायकोर्ट न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा मुद्दा तापतोय; नवीन नियुक्त्या होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 11:46 IST

यासंदर्भात मुंबई वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच नागपूर येथील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनाही हा मुद्दा उचलून धरणार आहे.

राकेश घानोडे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा मुद्दा तापायला लागला आहे. नवीन नियुक्त्या तातडीने होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात मुंबई वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच नागपूर येथील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनाही हा मुद्दा उचलून धरणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाला न्यायमूर्तींची ९४ (७१ कायम व २३ अतिरिक्त) पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या ५९ (५२ कायम व ७ अतिरिक्त) न्यायमूर्तीच कार्यरत आहेत. न्यायमूर्तींची ३५ (१९ कायम व १६ अतिरिक्त) पदे रिक्त आहेत. परिणामी, न्यायालयात पूर्ण क्षमतेने कामकाज होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजी आहे. न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरली जावी, अशी वकिलांची मागणी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने १ फेब्रुवारी रोजी न्यायिक अधिकारी उर्मिला जोशी व बी. पी. देशपांडे यांची, तर, १६ फेब्रुवारी रोजी ॲड. किशोर संत, ॲड. वाल्मिकी मेनेझेस एसए, ॲड. कमल खाटा, ॲड. शर्मिला देशमुख, ॲड. अरुण पेडनेकर, ॲड. संदीप मारने, ॲड. गौरी गोडसे, ॲड. राजेश पाटील, ॲड. आरीफ डॉक्टर व ॲड. सोमाशेखर सुंदरेसन यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. परंतु, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.

यावर्षी नऊ न्यायमूर्ती सेवानिवृत्त होणार

यावर्षी उच्च न्यायालयातील न्या. संभाजी शिंदे १ ऑगस्ट, न्या. साधना जाधव १३ जून, न्या. विनय देशपांडे १८ मे, न्या. अनिल मेनन ११ जुलै, न्या. चंद्रकांत भडंग ४ नोव्हेंबर, न्या. विश्वास जाधव १६ मे, न्या. मुकुंद शेवलिकर २० सप्टेंबर, न्या. वीरेंद्रसिंग बिष्ट १८ जुलै, तर न्या. श्रीकांत कुलकर्णी १ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, नवीन नियुक्त्या न झाल्यास रिक्त पदांची संख्या पुन्हा वाढेल.

५.८० लाख प्रकरणे प्रलंबित

मुंबई उच्च न्यायालयात सध्या ५ लाख ८० हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात ४ लाख ८१ हजार दिवाणी, तर ९९ हजार फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरली गेल्यास प्रलंबित प्रकरणे वेगात निकाली निघतील, असे बोलले जात आहे.

रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे

न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. यासाठी संघटना आवश्यक प्रयत्न करणार आहे. वकिलांना न्यायालयाच्या कामकाजात गती हवी आहे. न्यायालयाला नवीन न्यायमूर्ती मिळाल्यास प्रलंबित प्रकरणे वेगात निकाली निघतील.

- ॲड. अतुल पांडे, अध्यक्ष, उच्च न्यायालय विधिज्ञ संघटना, नागपूर.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय