शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा मुद्दा तापतोय; नवीन नियुक्त्या होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 11:46 IST

यासंदर्भात मुंबई वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच नागपूर येथील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनाही हा मुद्दा उचलून धरणार आहे.

राकेश घानोडे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा मुद्दा तापायला लागला आहे. नवीन नियुक्त्या तातडीने होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात मुंबई वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच नागपूर येथील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनाही हा मुद्दा उचलून धरणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाला न्यायमूर्तींची ९४ (७१ कायम व २३ अतिरिक्त) पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या ५९ (५२ कायम व ७ अतिरिक्त) न्यायमूर्तीच कार्यरत आहेत. न्यायमूर्तींची ३५ (१९ कायम व १६ अतिरिक्त) पदे रिक्त आहेत. परिणामी, न्यायालयात पूर्ण क्षमतेने कामकाज होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजी आहे. न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरली जावी, अशी वकिलांची मागणी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने १ फेब्रुवारी रोजी न्यायिक अधिकारी उर्मिला जोशी व बी. पी. देशपांडे यांची, तर, १६ फेब्रुवारी रोजी ॲड. किशोर संत, ॲड. वाल्मिकी मेनेझेस एसए, ॲड. कमल खाटा, ॲड. शर्मिला देशमुख, ॲड. अरुण पेडनेकर, ॲड. संदीप मारने, ॲड. गौरी गोडसे, ॲड. राजेश पाटील, ॲड. आरीफ डॉक्टर व ॲड. सोमाशेखर सुंदरेसन यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. परंतु, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.

यावर्षी नऊ न्यायमूर्ती सेवानिवृत्त होणार

यावर्षी उच्च न्यायालयातील न्या. संभाजी शिंदे १ ऑगस्ट, न्या. साधना जाधव १३ जून, न्या. विनय देशपांडे १८ मे, न्या. अनिल मेनन ११ जुलै, न्या. चंद्रकांत भडंग ४ नोव्हेंबर, न्या. विश्वास जाधव १६ मे, न्या. मुकुंद शेवलिकर २० सप्टेंबर, न्या. वीरेंद्रसिंग बिष्ट १८ जुलै, तर न्या. श्रीकांत कुलकर्णी १ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, नवीन नियुक्त्या न झाल्यास रिक्त पदांची संख्या पुन्हा वाढेल.

५.८० लाख प्रकरणे प्रलंबित

मुंबई उच्च न्यायालयात सध्या ५ लाख ८० हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात ४ लाख ८१ हजार दिवाणी, तर ९९ हजार फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरली गेल्यास प्रलंबित प्रकरणे वेगात निकाली निघतील, असे बोलले जात आहे.

रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे

न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. यासाठी संघटना आवश्यक प्रयत्न करणार आहे. वकिलांना न्यायालयाच्या कामकाजात गती हवी आहे. न्यायालयाला नवीन न्यायमूर्ती मिळाल्यास प्रलंबित प्रकरणे वेगात निकाली निघतील.

- ॲड. अतुल पांडे, अध्यक्ष, उच्च न्यायालय विधिज्ञ संघटना, नागपूर.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय