शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

शरीराला केवळ ३० टक्केच आहाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

नागपूर : माणसाला शरीर सुदृढ ठेवण्यासाठी केवळ ३० टक्के आहाराची गरज असते. पण अनेक जण दिवसातून चार ते सहा ...

नागपूर : माणसाला शरीर सुदृढ ठेवण्यासाठी केवळ ३० टक्के आहाराची गरज असते. पण अनेक जण दिवसातून चार ते सहा वेळा खातात. या अतिरिक्त आहारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, कोलेस्टेरॉलसारख्या रोगांना आमंत्रण मिळत आहे, असे मत प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे ‘राष्ट्रीय मेंदू सप्ताह’ आयोजित

करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राच्या सहाव्या दिवशी मनोविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी डॉ. मेश्राम यांची मुलाखत घेतली. ‘डाएट फॉर डिसीज प्रिव्हेंशन अ‍ॅण्ड वेट कंट्रोल’ हा विषय होता. ‘आयएएन’चे प्रेसिडेंट इलेक्टडॉ. निर्मल सूर्या यावेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी चंदीगढचे डॉ. मनीष मोदी आणि जयपूरच्या डॉ. भावना शर्मा होत्या.

मेंदूशी संबंधित आजारांवर उपचार करताना डॉ. मेश्राम यांनी आहारशास्त्राचाही अभ्यास केला आणि त्याचा रुग्णांना लाभ करून दिला आहे. माणसाने शरीराला आवश्यक असेल तितकेच खाल्ले पाहिजे. एका जेवणानंतर दुसरे जेवण भूक लागल्यानंतरच केले पाहिजे. दोन जेवणांमध्ये किमान आठ तासांचे अंतर असले पाहिजे. मधल्या काळात पाण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही पदार्थ खाणे टाळले पाहिजे, अशी माहिती त्यांनी दिली.

-रात्रीचे जेवण व सकाळच्या नाश्त्यात १२ तासांचे अंतर

रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या पहिल्या न्याहारीपर्यंत किमान १२ ते १४ तासांचे अंतर असले पाहिजे. उपवासाची प्राचीन परंपरा दैनंदिन जीवनात स्वीकारली तर सुदृढ आरोग्य राखता येईल, असेही ते म्हणाले. तरुण पिढी पाश्चात्य आहाराला प्राधान्य देत आहे. त्यांच्यामध्ये मद्यपान, धूम्रपानाचे प्रमाण वाढले. झोपेच्या सवयी, व्यायाम न करणे यामुळे तरुणांमध्ये आहारासंदभार्तील आजारांचे प्रमाण वाढले असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले. त्यांनी कीटकनाशक विरहित हिरवा भाजीपाला, फळे, घाणीचे तेल, शुद्ध तूप आदींचा आहारात अधिक प्रमाणात वापर करण्याचा सल्लाही दिला.

‘मोबाईल ब्रेन क्लिनिक’ विषयावर डॉ. बिंदू मेनन (नेल्लोर) यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून ग्रामीण भागात जाऊन रुग्णांची तपासणी करणे, लसीकरण करणे, छोट्या-छोट्या आजारांवर उपचार करणे आदी उपक्रम राबविले जातात.