शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

शरीराला केवळ ३० टक्केच आहाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

नागपूर : माणसाला शरीर सुदृढ ठेवण्यासाठी केवळ ३० टक्के आहाराची गरज असते. पण अनेक जण दिवसातून चार ते सहा ...

नागपूर : माणसाला शरीर सुदृढ ठेवण्यासाठी केवळ ३० टक्के आहाराची गरज असते. पण अनेक जण दिवसातून चार ते सहा वेळा खातात. या अतिरिक्त आहारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, कोलेस्टेरॉलसारख्या रोगांना आमंत्रण मिळत आहे, असे मत प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे ‘राष्ट्रीय मेंदू सप्ताह’ आयोजित

करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राच्या सहाव्या दिवशी मनोविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी डॉ. मेश्राम यांची मुलाखत घेतली. ‘डाएट फॉर डिसीज प्रिव्हेंशन अ‍ॅण्ड वेट कंट्रोल’ हा विषय होता. ‘आयएएन’चे प्रेसिडेंट इलेक्टडॉ. निर्मल सूर्या यावेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी चंदीगढचे डॉ. मनीष मोदी आणि जयपूरच्या डॉ. भावना शर्मा होत्या.

मेंदूशी संबंधित आजारांवर उपचार करताना डॉ. मेश्राम यांनी आहारशास्त्राचाही अभ्यास केला आणि त्याचा रुग्णांना लाभ करून दिला आहे. माणसाने शरीराला आवश्यक असेल तितकेच खाल्ले पाहिजे. एका जेवणानंतर दुसरे जेवण भूक लागल्यानंतरच केले पाहिजे. दोन जेवणांमध्ये किमान आठ तासांचे अंतर असले पाहिजे. मधल्या काळात पाण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही पदार्थ खाणे टाळले पाहिजे, अशी माहिती त्यांनी दिली.

-रात्रीचे जेवण व सकाळच्या नाश्त्यात १२ तासांचे अंतर

रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या पहिल्या न्याहारीपर्यंत किमान १२ ते १४ तासांचे अंतर असले पाहिजे. उपवासाची प्राचीन परंपरा दैनंदिन जीवनात स्वीकारली तर सुदृढ आरोग्य राखता येईल, असेही ते म्हणाले. तरुण पिढी पाश्चात्य आहाराला प्राधान्य देत आहे. त्यांच्यामध्ये मद्यपान, धूम्रपानाचे प्रमाण वाढले. झोपेच्या सवयी, व्यायाम न करणे यामुळे तरुणांमध्ये आहारासंदभार्तील आजारांचे प्रमाण वाढले असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले. त्यांनी कीटकनाशक विरहित हिरवा भाजीपाला, फळे, घाणीचे तेल, शुद्ध तूप आदींचा आहारात अधिक प्रमाणात वापर करण्याचा सल्लाही दिला.

‘मोबाईल ब्रेन क्लिनिक’ विषयावर डॉ. बिंदू मेनन (नेल्लोर) यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून ग्रामीण भागात जाऊन रुग्णांची तपासणी करणे, लसीकरण करणे, छोट्या-छोट्या आजारांवर उपचार करणे आदी उपक्रम राबविले जातात.