शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

वाडीत तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:32 IST

तरुणाचा गळा तलवारीने कापून त्याचा खून करण्यात आल्याची घटना वाडी परिसरात मंगळवारी दुपारी ३ ते सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देतलवारीने कापला गळा : मित्राने घात केल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कवाडी : तरुणाचा गळा तलवारीने कापून त्याचा खून करण्यात आल्याची घटना वाडी परिसरात मंगळवारी दुपारी ३ ते सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली. मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत झालेल्या भांडणातून मित्रानेच त्याचा खून केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे.अजय ऊर्फ लांच्छा काशीनाथ रामटेके (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. आई-वडिलांचे बालपणीच निधन झाल्याने त्याला स्वत:चे घर नव्हते. अजय हा फुटाळा, नागपूर येथील खाद्यपदार्थाच्या ठेल्यावर काम करायचा आणि रात्री त्याचा मित्र राहुल किशोर वंजारी, रा. सुराबर्डी याच्या सुराबर्डी शिवारात हॉटेलमध्ये झोपायला जायचा. राहुल हा अजयचा मोठा भाऊ विजय रामटेके याचा मित्र असून, विजय हा कोंढाळी (ता. काटोल) येथे राहतो.सोमवारी राहुलच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्याने रात्री पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अजय व राहुलचे अज्ञात कारणावरून भांडण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, मंगळवारी दुपारी वाडी परिसरातील गोदामाजवळ असलेल्या झुडपात अजयचा मृतदेह आढळून आला. त्याचा गळा तलवारीने कापला असल्याचे निदर्शनास आले. त्यातच राहुलने विजयला ‘तेरे भाई को टपकाया’ असे फोनवरून सांगितले. त्यामुळे अजयचा खून राहुलने केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.