शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दु:खी चेहऱ्यावर फुलविले हास्य

By admin | Updated: February 20, 2017 02:04 IST

एखाद्या दु:खी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याइतके सत्कर्म दुसरे कोणतेही नाही. या सत्कर्मापासून जे समाधन मिळते ते अविस्मरणीय असते. ...

‘जीएमसी आरोग्यम’ने दिला ९१८ रुग्णांना आधार : मेडिकल ते मेळघाट ठरला संवेदनेचा सेतूनागपूर : एखाद्या दु:खी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याइतके सत्कर्म दुसरे कोणतेही नाही. या सत्कर्मापासून जे समाधन मिळते ते अविस्मरणीय असते. असेच समाधान दुर्गम भाग असलेल्या मेळघाट (चिलाठी) येथील ‘हतरु’ या गावात आयोजित केलेल्या ‘जीएमसी आरोग्यम’ या अभियानात परिश्रम घेतलेल्या डॉक्टरांपासून ते वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. तब्बल दोन महिन्यांचे नियोजन, दुर्गमभागातील १९ गावांशी संपर्क व ९१८ रुग्णांवर उपचार करून हे अभियान येथेच थांबले नाही तर गंभीर आजाराच्या ७२ रुग्णांना नागपुरात आणण्याची तयारी सुरू केली. या अभियानातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयाने समाजापुढे रुग्णसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे. जिथे रस्ते नाही, वीजही नीट पोहचलेली नाही, पाण्याची भीषण समस्या आहे त्या भागात रुग्णसेवा देण्याचा विचार मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांना बोलून दाखविला, तेव्हा त्यांनी त्यांची पाठ थोपटली. सहकार्याचे भक्कम पाठबळच उभे केले. त्यांच्या ध्यासाला कृतीची नवी ऊर्जा दिली. यामुळेच मेळघाटच्या हतरु गावात हे आरोग्यम शिबिर होऊ शकले. ९ आणि १० फेब्रुवारीला आयोजित या शिबिरात ९१८ लोकांची नागपुरातून आलेल्या विशेषज्ञांनी तपासणी केली. नि:शुल्क औषधे दिली. तर गंभीर आजाराच्या रुग्णांना नागपुरात आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे कार्य हाती घेतले. शिबिरापूर्वी विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन पथनाट्य सादर केले. यातून विविध आजारांची, स्वच्छतेची माहिती लोकांपर्यंत पोहचवली. या शिबिरात डॉ. श्रीगिरीवार, डॉ. शैलेश गहूकर, डॉ. शेलगावकर, डॉ. मानसी श्रीगिरीवार, डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. आशिष बदखल, डॉ. अमोल समर्थ, डॉ. ललित महाजन, डॉ. पराग मून, डॉ. महेश कुमार, डॉ. मिलिंद उल्लेवार, डॉ. परिमल तायडे, डॉ. भावेश पटेल, डॉ. अश्लेष तिवारी, डॉ. गीतेश सावरकर, डॉ. निखिल कांबळे, डॉ. प्राची थुल. डॉ. सुशील मानवटकर, डॉ. गोपाल सोळंके, डॉ. रवी यादव, डॉ. रमिज पंजवानी डॉ. मनोज गेडाम, डॉ. खत्री यांच्यासह ६० विद्यार्थ्यांनी सेवा दिली. माजी अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी आणि मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी अकोला विभागाचे उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते. विविध मान्यवरांनी दिलेल्या देणगीतून हे शक्य झाल्याचे डॉ. श्रीगिरीवार म्हणाले.(प्रतिनिधी)‘जीएमसी आरोग्यम’ आता थांबणार नाहीमेळघाटच्या हतरु गावापासून सुरू झालेले ‘जीएमसी आरोग्यम’ हे आता थांबणारे नाही. या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याचे कार्य निरंतर सुरू राहील. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात ‘जीएमसी आरोग्यम’चा ग्रुप तयार करण्याचाही प्रयत्न असणार आहे.-डॉ. मनीष श्रीगिरीवारविशेष कार्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय