शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दु:खी चेहऱ्यावर फुलविले हास्य

By admin | Updated: February 20, 2017 02:04 IST

एखाद्या दु:खी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याइतके सत्कर्म दुसरे कोणतेही नाही. या सत्कर्मापासून जे समाधन मिळते ते अविस्मरणीय असते. ...

‘जीएमसी आरोग्यम’ने दिला ९१८ रुग्णांना आधार : मेडिकल ते मेळघाट ठरला संवेदनेचा सेतूनागपूर : एखाद्या दु:खी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याइतके सत्कर्म दुसरे कोणतेही नाही. या सत्कर्मापासून जे समाधन मिळते ते अविस्मरणीय असते. असेच समाधान दुर्गम भाग असलेल्या मेळघाट (चिलाठी) येथील ‘हतरु’ या गावात आयोजित केलेल्या ‘जीएमसी आरोग्यम’ या अभियानात परिश्रम घेतलेल्या डॉक्टरांपासून ते वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. तब्बल दोन महिन्यांचे नियोजन, दुर्गमभागातील १९ गावांशी संपर्क व ९१८ रुग्णांवर उपचार करून हे अभियान येथेच थांबले नाही तर गंभीर आजाराच्या ७२ रुग्णांना नागपुरात आणण्याची तयारी सुरू केली. या अभियानातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयाने समाजापुढे रुग्णसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे. जिथे रस्ते नाही, वीजही नीट पोहचलेली नाही, पाण्याची भीषण समस्या आहे त्या भागात रुग्णसेवा देण्याचा विचार मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांना बोलून दाखविला, तेव्हा त्यांनी त्यांची पाठ थोपटली. सहकार्याचे भक्कम पाठबळच उभे केले. त्यांच्या ध्यासाला कृतीची नवी ऊर्जा दिली. यामुळेच मेळघाटच्या हतरु गावात हे आरोग्यम शिबिर होऊ शकले. ९ आणि १० फेब्रुवारीला आयोजित या शिबिरात ९१८ लोकांची नागपुरातून आलेल्या विशेषज्ञांनी तपासणी केली. नि:शुल्क औषधे दिली. तर गंभीर आजाराच्या रुग्णांना नागपुरात आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे कार्य हाती घेतले. शिबिरापूर्वी विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन पथनाट्य सादर केले. यातून विविध आजारांची, स्वच्छतेची माहिती लोकांपर्यंत पोहचवली. या शिबिरात डॉ. श्रीगिरीवार, डॉ. शैलेश गहूकर, डॉ. शेलगावकर, डॉ. मानसी श्रीगिरीवार, डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. आशिष बदखल, डॉ. अमोल समर्थ, डॉ. ललित महाजन, डॉ. पराग मून, डॉ. महेश कुमार, डॉ. मिलिंद उल्लेवार, डॉ. परिमल तायडे, डॉ. भावेश पटेल, डॉ. अश्लेष तिवारी, डॉ. गीतेश सावरकर, डॉ. निखिल कांबळे, डॉ. प्राची थुल. डॉ. सुशील मानवटकर, डॉ. गोपाल सोळंके, डॉ. रवी यादव, डॉ. रमिज पंजवानी डॉ. मनोज गेडाम, डॉ. खत्री यांच्यासह ६० विद्यार्थ्यांनी सेवा दिली. माजी अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी आणि मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी अकोला विभागाचे उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते. विविध मान्यवरांनी दिलेल्या देणगीतून हे शक्य झाल्याचे डॉ. श्रीगिरीवार म्हणाले.(प्रतिनिधी)‘जीएमसी आरोग्यम’ आता थांबणार नाहीमेळघाटच्या हतरु गावापासून सुरू झालेले ‘जीएमसी आरोग्यम’ हे आता थांबणारे नाही. या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याचे कार्य निरंतर सुरू राहील. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात ‘जीएमसी आरोग्यम’चा ग्रुप तयार करण्याचाही प्रयत्न असणार आहे.-डॉ. मनीष श्रीगिरीवारविशेष कार्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय