शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

काळा पैसा पांढरा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:43 IST

नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहशतवाद, नक्षलवादाला आळा बसेल. चोरांचा काळा पैसा बाहेर बाहेर येईल.

ठळक मुद्देशहर काँग्रेसतर्फे नोटाबंदी विरोधात जनआक्रोश आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहशतवाद, नक्षलवादाला आळा बसेल. चोरांचा काळा पैसा बाहेर बाहेर येईल. रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील. देशाची अर्थव्यवस्था भक्कम होईल, असा दावा केला होता. परंतु या आत्मघातकी निर्णयामुळे बँकांसमोरील रांगेत शेकडो लोकांचे बळी गेले. रोजगार हिरावला गेला. व्यापारी, शेतकरी व मजूर अशा सर्वांनाच या निर्णयाचा फटका बसला. भाजपा नेत्यांचा व बड्या उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, अशी घणाघाती टीका विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केली.८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र व राज्य सरकारचा निषेध म्हणून काँग्रेसने काळा दिवस पाळला. शहर काँग्रेसतर्फे टेलिफोन एक्सचेंज चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अ‍ॅड. अभिजित वंजारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, सेवादलाचे अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, माजी महापौर नरेश गावंडे, जयंत लुटे, युवा नेते विशाल मुत्तेमवार, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रशांत धवड, अशोक बांते, रमण पैगवार, गजराज हटेवार, नितीन साठवणे, राजेश कुंभलकर आदी मान्यवर उपस्थित होते.नोटाबंदीचा निर्णय रात्री १२ वाजता जाहीर करण्यात आला. जीएसटीचाही निर्णय रात्रीलाच जाहीर करण्यात आला. नोटाबंदीत पाचशे व हजारची नोट चलनातून बाद करतानाच दोन हजाराची नोट चलनात आणून काळा पैसा पांढरा करण्याची संधी उपलब्ध केली. जीएसटी, वाढलेली महागाई, शेतीमालाला भाव नाही. बेरोजगारांना रोजगार नाही. नुसता घोषणांचा बाजार आहे. राज्यकर्त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. प्रचंड रोष असलेली जनताच ही मस्ती उतरविणार आहे, अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.नोटाबंदीचा निर्णय झाल्याने आर्थिक चालना मिळेल असे वाटले परंतु असे काही घडले नाही उलट आर्थिक मंदीकडे देश वळला आहे. आज महागाई प्रचंड वाढली. शेतकरी, शेतमजूर उद्ध्वस्त झाले आहे. व्यापार मंदावला आहे, उद्योग बंद पडत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवण्याचे काम या निर्णयामुळे झाल्याचा आरोप शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला. यावेळी नोटाबंदीच्या काळात रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. विलास मुत्तेमवार यांनीही नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे अ‍ॅड. अभिजित वंजारी म्हणाले. उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, बंटी शेळके, रामगोविंद खोब्रागडे आदींनी सरकारच्या धोरणावर टीका केली.काळे झेडे, काळे दुपट्टे!काँग्रेस कार्यकर्त्यांनी गळ्यात काळे दुपट्टे व हाताला काळ्या पट्ट्या बांधून तसेच काळे झेंडे उंचावून नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. ‘वारे मोदी तेरा खेल , नोटबंदी हो गई फेल ’शेतीमाला भाव द्या, नोटाबंदी भारतीय काळा दिवस, मोदी सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.