शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्यावर बसली काळी धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 12:04 IST

जिल्ह्यात मालेवाडा-भिसी-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांची अक्षरश: वाट लागली आहे.

ठळक मुद्देअपेक्षित भाव मिळणार का? रस्ता चौपदरीकरण उठले शेतकऱ्यांच्या मालावरकपाशीसह मिरची, चणा पीक काळवंडले

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात मालेवाडा-भिसी-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांची अक्षरश: वाट लागली आहे. चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याची संपूर्ण धूळ शेतातील उभ्या पिकांवर जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखली जाणारी कपाशी पूर्णता काळवंडली आहे. सोयाबीन, मिरची, चणा आदी पिकांचीही या चौपदरीकरणामुळे गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे हा शेतमाल बाजारपेठेत घेणार कोण? अपेक्षित भाव मिळणार का? असा प्रश्न शेतक ऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.गत चार महिन्यांपासून या राष्ट्रीय मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याकरिता दोन कंत्राटदार कंपन्यांची निवड करण्यात आली असून यातील मालेवाडा ते चिमूरपर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट ‘एसएमएस’ कंपनीला मिळाले आहे. दरम्यान चौपदरीकरणाच्या कामादरम्यान प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांवर बसत आहे.त्यामुळे शेतातील पिके काळवंडली असून त्यांची गुणवत्ता ढासळली आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेली कपाशी आता हातात येण्याच्या मार्गावर असताना या कपाशीवर सुध्दा जणू काळे ‘ढग’ साचले आहे. सोयाबीन, मिरची, चणा व इतर पिकांची सुध्दा या चौपदरीकरणामुळे गुणवत्ता ढासळली आहे.रस्त्याचे चौपदरीकरण महत्त्वाचे व अत्यावश्यक असले तरी कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परिसरातील शंभरावर शेतकऱ्यांची शेते व त्यातील उभी पिके गुणवत्ताहीन झाली आहेत. रसरातील शंभरावर शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके संकटात आली आहे. बाजारपेठेत या शेतक ऱ्यांचा शेतमाल कोण घेणार? त्यांना चांगला भाव मिळण्याची आशाही धूसर झाली आहे.त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या सहभागात शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप निंबार्ते यांनी काल (दि.२३) कंत्राटदार कंपनीला निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली. शिवाय कंपनीला कानपिचक्या देत येत्या १५ दिवसात नुकसानभरपाई न मिळाल्यास चौपदरीकरणाचे काम बंद पाडण्याचा सेना स्टाईल इशाराही निंबार्ते यांनी दिला. यावेळी सरपंच प्रमोद लांजेवार, किशोर सयाम, गणेश फुलबांधे यांच्यासह पीडित शेतकरी संजय चांभारे, शंकर ढगे, रमेश वैद्य, निखील सवाई, तुकाराम सवाई, मनोज चौहान, राजू आवारी आदी उखळी, सालेभट्टी (चोर) या गावातील शेतकरी उपस्थित होते.

ते चालतात फुंकून..याबाबत कंत्राटदार कंपनीचे अभियंता बागडे यांच्याशी संपर्क साधत चौपदरीकरणाचा कालावधी, निधी, निर्मितीचे अंतराबाबत सदर प्रतिनिधीने माहिती विचारली असता याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे बागडे यांनी सांगितले. शिवाय दररोज कोणी ना कोणी येतात माहिती विचारतात... त्यामुळे ‘मी फुंकून चालतो’ असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा नंबरसुद्धा आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. या ‘फुंकून चालण्या’मुळे तर उभ्या पिकांवर धूळ साचली नाही ना? असा हास्यास्पद प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती