शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पांढऱ्या सोन्यावर बसली काळी धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 12:04 IST

जिल्ह्यात मालेवाडा-भिसी-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांची अक्षरश: वाट लागली आहे.

ठळक मुद्देअपेक्षित भाव मिळणार का? रस्ता चौपदरीकरण उठले शेतकऱ्यांच्या मालावरकपाशीसह मिरची, चणा पीक काळवंडले

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात मालेवाडा-भिसी-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांची अक्षरश: वाट लागली आहे. चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याची संपूर्ण धूळ शेतातील उभ्या पिकांवर जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखली जाणारी कपाशी पूर्णता काळवंडली आहे. सोयाबीन, मिरची, चणा आदी पिकांचीही या चौपदरीकरणामुळे गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे हा शेतमाल बाजारपेठेत घेणार कोण? अपेक्षित भाव मिळणार का? असा प्रश्न शेतक ऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.गत चार महिन्यांपासून या राष्ट्रीय मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याकरिता दोन कंत्राटदार कंपन्यांची निवड करण्यात आली असून यातील मालेवाडा ते चिमूरपर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट ‘एसएमएस’ कंपनीला मिळाले आहे. दरम्यान चौपदरीकरणाच्या कामादरम्यान प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील उभ्या पिकांवर बसत आहे.त्यामुळे शेतातील पिके काळवंडली असून त्यांची गुणवत्ता ढासळली आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेली कपाशी आता हातात येण्याच्या मार्गावर असताना या कपाशीवर सुध्दा जणू काळे ‘ढग’ साचले आहे. सोयाबीन, मिरची, चणा व इतर पिकांची सुध्दा या चौपदरीकरणामुळे गुणवत्ता ढासळली आहे.रस्त्याचे चौपदरीकरण महत्त्वाचे व अत्यावश्यक असले तरी कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परिसरातील शंभरावर शेतकऱ्यांची शेते व त्यातील उभी पिके गुणवत्ताहीन झाली आहेत. रसरातील शंभरावर शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके संकटात आली आहे. बाजारपेठेत या शेतक ऱ्यांचा शेतमाल कोण घेणार? त्यांना चांगला भाव मिळण्याची आशाही धूसर झाली आहे.त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या सहभागात शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप निंबार्ते यांनी काल (दि.२३) कंत्राटदार कंपनीला निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली. शिवाय कंपनीला कानपिचक्या देत येत्या १५ दिवसात नुकसानभरपाई न मिळाल्यास चौपदरीकरणाचे काम बंद पाडण्याचा सेना स्टाईल इशाराही निंबार्ते यांनी दिला. यावेळी सरपंच प्रमोद लांजेवार, किशोर सयाम, गणेश फुलबांधे यांच्यासह पीडित शेतकरी संजय चांभारे, शंकर ढगे, रमेश वैद्य, निखील सवाई, तुकाराम सवाई, मनोज चौहान, राजू आवारी आदी उखळी, सालेभट्टी (चोर) या गावातील शेतकरी उपस्थित होते.

ते चालतात फुंकून..याबाबत कंत्राटदार कंपनीचे अभियंता बागडे यांच्याशी संपर्क साधत चौपदरीकरणाचा कालावधी, निधी, निर्मितीचे अंतराबाबत सदर प्रतिनिधीने माहिती विचारली असता याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे बागडे यांनी सांगितले. शिवाय दररोज कोणी ना कोणी येतात माहिती विचारतात... त्यामुळे ‘मी फुंकून चालतो’ असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा नंबरसुद्धा आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. या ‘फुंकून चालण्या’मुळे तर उभ्या पिकांवर धूळ साचली नाही ना? असा हास्यास्पद प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती