शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

२०० एकरातील कोबीवर ‘काळे ढग’

By admin | Updated: November 18, 2016 03:12 IST

उमरेड महामार्गालगत असलेल्या पाचगाव येथील शेकडो एकर फुलकोबी, भाजीपाला आणि अन्य पिकांवर सध्या ‘केमिकल लोचा’चे संकट घोंगावत आहे.

पाचगावातील शेतकरी संकटात : कंपनीतील केमिकलचा साचतो थरअभय लांजेवार  उमरेडनागपूर - उमरेड महामार्गालगत असलेल्या पाचगाव येथील शेकडो एकर फुलकोबी, भाजीपाला आणि अन्य पिकांवर सध्या ‘केमिकल लोचा’चे संकट घोंगावत आहे. यामुळे असंख्य शेतकरी हतबल झाले असून तातडीने कडक पाऊल उचलण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. याप्रकरणी ४२ शेतकऱ्यांनी तक्रार केली असून पाचगाव, वडेगाव, आजनी, पिपरी परिसरातील सुमारे २०० एकर शेतीचा पट्टा एका कंपनीतून निघणाऱ्या घातक रसायनामुळे प्रभावित झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या पाचगावातील ही वस्तुस्थिती असून शेतकऱ्यांवरच आता संकट ओढवल्याने सर्वत्र असंतोष व्यक्त होत आहे.पाचगाव येथून केवळ एक किमी अंतरावर कुही तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक मॅगनीज कारखाना आहे. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर घातक रसायन धुराच्या माध्यमातून बाहेर पडत आहे. कारखान्याच्या चिमणीतून निघणारा धूर थेट शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर द्रवरूपात पडत आहे. या केमिकलमुळे पिके उद्ध्वस्त होत असून आतापर्यंत सुमारे ५० हेक्टर क्षेत्रातील फुलकोबीवर काळपट रंगाच्या रसायनाचा थर जमा झाला आहे. काळवंडलेल्या फुलकोबीवर पाण्याचा मारा केल्यानंतरही त्याच्यातील काळपटपणा निघत नसल्याने लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काळवंडलेली फुलकोबी व्यापारी बाजारपेठेत ठेवायला तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे.याशिवाय अनेकांच्या शेतात भाजीपाला, कापूस आदी पिकेही प्रभावित झाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, कुहीचे तहसीलदार मल्लिक वीरानी, कृषी अधिकारी आदींकडे निवेदन देत समस्या मांडली. दत्तक योजनेसाठी ‘खास’ गाव ठरलेल्या पाचगावात सुमारे ५० वर्षापासून फुलकोबीला अधिक पसंती आहे. अन्यथा आंदोलन!सदर मॅगनीज कारखान्याची चिमणी नियमानुसार बसविण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. कंपनीने तातडीने नुकसासभरपाई द्यावी, योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सरपंच पुण्यशीला मेश्राम, उपसरपंच रामाजी हटवार तसेच शेतकरी दिगांबर हटवार, शांताराम हटवार, रवींद्र हटवार, संदीप हटवार, राजेश हटवार, बळीराम माटे, बालू गाडेकर, चक्रधर गाडेकर आदींनी दिला आहे.