शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची वाड्यावर तर काँग्रेसची मुंबईत रस्सीखेच

By admin | Updated: February 3, 2017 02:25 IST

महापालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या.

दोन्ही पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर नाही : आज वेळेवर ए-बी फॉर्म देणारनागपूर : महापालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महालातील वाड्यावर भाजपच्या यादीवर अंतिम हात फिरवण्यात आला. मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसची यादी निश्चित करण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये वादावादी होऊन रस्सीखेच झाली. शेवटी रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्ष उमेदवार यादी जाहीर करू शकले नाहीत. आज, शुक्रवारी सकाळी दोन्ही पक्षांतर्फे थेट उमेदवारांना ‘ए-बी’ फॉर्म दिले जाणार आहेत. दुसरीकडे भाजप व काँग्रेसने आपली उमेदवारी यादी जाहीर न केल्यामुळे बंडखोरांवर नजर ठेवून असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाने आपली उमेदवार यादी जाहीर केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या यादीवरही बरेच मंथन झाले. तयार करण्यात आलेल्या यादीत वेळेवर काही बदल करण्यात आले. तिकीट कटल्याची माहिती मिळाल्यामुळे काही नगरसेवक व पदाधिकारी आपली बाजू मांडण्यासाठी रात्री उशिरा समर्थकांसह वाड्यावर पोहचले. मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समर्थकांना तिकीट मिळवून देण्यासाठी व विरोधी गटातील नगरसेवकांचे तिकीट कापण्यासाठी घमासान झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यात पूर्व नागपूरच्या जागांवरून वाद झाला. पूर्वच्या जागा अभिजित वंजारी यांच्या एकट्याच्या शिफारशीने का केल्या, आपल्याला विश्वासात का घेतले नाही, असे चतुर्वेदी यांचे म्हणणे होते. मात्र, चव्हाण यांनी चतुर्वेदी हे दक्षिणचे उमेदवार असल्याचे कारण देत पूर्व नागपूरवर चतुर्वेदी यांचा दावा मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे चतुर्वेदी यांनी दक्षिण मधील काही नगरसेवकांचे तिकीट कापण्याचा आग्रह धरला. यावेळी चव्हाण-चतुर्वेदी यांच्यात वाद झाला. प्रभाग ३८ मधील तिकिटासाठी विकास ठाकरे व प्रफुल्ल गुडधे या दोघांमध्येही रस्सीखेच झाली. शेवटी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दोघांनाही ३८ मधून लढू नका, असे सांगत दुसऱ्या प्रभागातून लढण्याची सूचना केली. यावर चतुर्वेदी यांनी गुडधे यांची बाजू घेतली व तसे झाले तर गुडधे अपक्ष लढतील, असा इशारा दिला. बैठकांचे सत्र लांबल्यामुळे रात्री उशिरापर्यंत काँग्रेसचे ‘ए-बी’ फॉर्म नागपुरात पोहचू शकले नाहीत. दरम्यान, रात्री उशिरा भाजपच्या काही उमेदवारांना तिकीट पक्के झाल्याचे निरोप देण्यात आले.