शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

भाजपची सत्ता पण निधीत कापला पत्ता !

By admin | Updated: February 19, 2015 02:03 IST

आघाडीचे सरकार जाऊन भाजपची सत्ता आली. नागपूरचे मुख्यमंत्री अन् विदर्भातील अर्थमंत्री झाले. जिल्ह्यातील ‘हेवीवेट’ नेते पालकमंत्री झाले.

कमलेश वानखेडे नागपूरआघाडीचे सरकार जाऊन भाजपची सत्ता आली. नागपूरचे मुख्यमंत्री अन् विदर्भातील अर्थमंत्री झाले. जिल्ह्यातील ‘हेवीवेट’ नेते पालकमंत्री झाले. या सर्वांचे कॅप्टन नितीन गडकरी केंद्रात मंत्री झाले. मात्र, एवढे सर्व होऊनही राज्य सरकारकडून नागपूरच्या वाट्याला हक्काचा भरीव निधी मिळालेला नाही. नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीत फक्त २५ कोटींची म्हणजे फक्त ११ टक्के वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत या निधीत अनुक्रमे ३७ व ३० टक्के वाढ केली होती. नागपूरच्या विकासासाठी आता भरीव निधी मिळेल, अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या उपराजधानीच्या पदरी निराशाच आली आहे.डीपीसीचा निधी हा जिल्ह्याचा हक्काचा निधी असतो. एकदा सरकारने निधी मंजूर केला की तो कसा व कुठे खर्च करायचा याचे संपूर्ण अधिकार डीपीसीला असतात. तो खर्च करण्यासाठी जिल्हा स्तरावरच मंजुरी लागते. राज्य शासनाची परवानगीची गरज भासत नाही. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या निधीत भरीव वाढ होण्याची गरज असते. मात्र, यावर्षी तसे झालेले नाही. २०११-१२ मध्ये नागपूर जिल्ह्याला डीपीसी अंतर्गत ११७ कोटी रुपये मंजूर झाले होते. २०१२-१३ मध्ये या निधीत भरीव वाढ करून १७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पुढे २०१३-१४ मध्ये १७५ कोटी व २०१४-१५ मध्ये २२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे त्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विदर्भाचे नव्हते. वित्तमंत्री अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील होते व विदर्भद्वेष्टा असे दोषारोप भाजपकडून व्हायचे. नागपूरशी काडीमात्र संबंध नसलेल्या या नेत्यांच्या कार्यकाळात नागपूरच्या पदरात भरीव निधी पाडून घेण्यात वित्त व नियोजन खात्याचे राज्यमंत्री म्हणून राजेंद्र मुळक यांना यश आले. सलग तीन वर्षे डीपीसीच्या निधीत भरीव वाढ झाली. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजप नेत्यांनी ही वाढ समाधानकारक नसल्याची टीकाही केली होती. पण आता प्रत्यक्षात भाजप सत्तेत असताना नागपूरच्या निधीत पूर्वीपेक्षा कमी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कमी वाटत असली तर राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधी दिला जाईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. मात्र, अर्थसंकल्पात निधी देण्याचे कारण देऊन हक्काच्या निधीत कमी वाढ करणे योग्य नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे.सत्तेवर आलेली भाजप उपराजधानीच्या विकासासाठी भरीव निधी का देत नाही, असा सवाल विरोधकांनी केला आहे.