शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने लक्ष्मीदर्शन करून निवडणुका जिंकल्या

By admin | Updated: December 29, 2016 02:35 IST

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रचार सभांमध्ये मोठमोठ्या घोषणा करतात तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

अशोक चव्हाण यांचा आरोप : काँग्रेसचा स्थापना दिवस उत्साहात नागपूर : एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रचार सभांमध्ये मोठमोठ्या घोषणा करतात तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे मतदारांना लक्ष्मीदर्शन करा, लक्ष्मी नाकारू नका, असे सांगत आहेत. भाजपने निवडणुका कामे करून, लोकांची मने जिंकून जिंकलेल्या नाहीत तर प्रलोभने दाखवून, लक्ष्मीदर्शन करून जिंकल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे १३१ वा स्थापना दिन सोहळा पश्चिम नागपुरातील पोलीस लॉन येथे बुधवारी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, पालक पदाधिकारी आ. विजय वडेट्टीवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी खा. गेव्ह आवारी, अनंतराव घारड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नोटाबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर तोफ डागली. चव्हाण म्हणाले, दोन-चार हजार रुपये मिळविण्यासाठी सामान्य जनतेला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे भाजप नेत्यांच्या गाडीत लाखो रुपयांच्या नव्या नोटा सापडत आहेत. नोटाबंदीनंतर व्यापार ठप्प व बाजारपेठा ओस पडल्या आहेत. ज्या व्यापाऱ्यांनी आशेने कमळावर शिक्के मारले तेच आता ‘हमारी भूल, कमल का फूल’ म्हणू लागले आहेत. एकीकडे विजय मल्ल्यासह उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली जात आहे. सरकारला संवेदना उरलेल्या नाहीत, अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेची अवस्था अडचणीची झाली असून, पंतप्रधानांच्या बाजूला आमच्या पक्षप्रमुखांना बसू द्या, अशी विनंती करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे, असा चिमटाही त्यांनी घेतला. विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात सुई देखील तयार होत नव्हती. मात्र, आता पंतप्रधान मोदी ज्या विमानांनी विदेशात फिरत आहेत, ती विमाने काँग्रेसच्या राजवटीतच देशात तयार झाली आहेत. काळा पैशाविरुद्धच्या लढाईचे सोंग घेऊन भाजप घोटाळेबाजांची फौज सोबत घेऊन सत्ता चाखत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नागपुरात काँग्रेसचा झेंडा फडकला तर पुढे देशही वाचेल, असे सांगत त्यांनी भाजपचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडण्याचे काँग्रेसजनांना आवाहन केले. विकास ठाकरे म्हणाले, लोकसभा व विधानसभेत काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, त्यानंतरही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन, हिंमत देऊन नागपुरात भाजपचे हेवीवेट नेते असतानाही भाजप विरोधात लढा उभा केला. भाजपने महापालिकेत जनतेच्या पैशाची लूट चालविली आहे. पाणीपुरवठा, स्टार बस आदीमध्ये घोटाळे करून पैशाची लूट करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे. १ ते १० जानेवारीदरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाविरोधात पोलखोल यात्रा काढणार असून, भाजपच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त केक कापण्यात आला. या वेळी माजी आ. अशोक धवड, प्रा. हरिभाऊ केदार, प्रदेश सरचिटणीस प्रफुल्ल गुडधे, सचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, सुरेश भोयर, अ‍ॅड. अभिजित वंजारी, रविंद्र दरेकर, झिया पटेल, गिरीश पांडव, प्रमोद सिंग ठाकूर, प्रशांत धवड, रामकिशन ओझा, अभिजित सपकाळ, मुजीब पठाण, संदेश सिंगलकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)