शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भाजपा महाराष्ट्रात निवडून येणार

By admin | Updated: February 22, 2017 02:48 IST

निरंतर विकास हा भाजपाचा ध्यास आहे. ५० वर्षांच्या तुलनेत भाजपाने अडीच वर्षांतच विकास करून दाखविला आहे.

नितीन गडकरी : मतदानाने लोकशाही मजबूत होणार नागपूर : निरंतर विकास हा भाजपाचा ध्यास आहे. ५० वर्षांच्या तुलनेत भाजपाने अडीच वर्षांतच विकास करून दाखविला आहे. विकास कामांमुळे भाजपा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात निवडून येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केला. गडकरी यांनी कुटुंबीयांसोबत महाल येथील मनपा टाऊन हॉल येथे सकाळी मतदान केले. मतदानानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपुरात भाजपा १०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी जात, पंथ, धर्म सोडून मतदान करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी) नवीन मतदारांची नोंद गडकरी म्हणाले, देशाच्या विकासासाठी मतदान करा. त्यामुळे देशात परिवर्तन येईल आणि लोकशाही मजबूत होईल. नागपुरात १.१० लाख नवीन मतदार जुळले आहेत. त्याआधारे प्रत्येक प्रभागात २.५० हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. युवा मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. नवीन मतदारांना शुभेच्छा असून त्यांनी विकासासाठी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. पराजय होईल तिथेही विकास करू नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत गेल्यावेळी ५२ टक्के मतदान झाले होते. यावर्षी ७० टक्के होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूरसह महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांमध्ये भाजपाचे उमेदवार निवडून येतील. निवडणुकीत विजय वा पराभव होत असतो. पण जिथे निवडून येणार नाही, तिथेही विकास कामे करीत राहू. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वात निरंतर विकासाची कामे सुरू आहेत. ही महाराष्ट्रासाठी जमेची बाजू आहे. केंद्र सरकारने विकास कामे करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सकाळीच भाजपा सर्वत्र निवडून येत असल्याचे सांगितले आहे. मतदारांचा कौल मान्य राहील, असे त्यांनी सांगितले.