शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

भाजपने स्वत:चे घर स्वच्छ ठेवावे

By admin | Updated: June 5, 2016 02:45 IST

भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला.

प्रफुल्ल पटेल : भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यानेच खडसे यांचा राजीनामानागपूर : भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. खडसे ही तर सुरुवात आहे. राज्यातील चिक्की घोटाळा व शाळांना आग सुरक्षा यंत्र पुरवठ्यात याहूनही मोठा घोटाळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा देत रस्त्यावरील कचरा साफ करण्यापूर्वी भाजपने स्वत: चे घर स्वच्छ ठेवावे, असा टोला राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी लावला.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हिस्लॉप कॉलेजच्या बाजूला असलेल्या चिटणवीस सेंटर येथे पटेल यांचा सत्कार सभारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यानेच खडसे यांनी राजीनामा दिला. कुणाच्या दबावात राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा सल्लाही पटेल यांनी दिला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळातही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यावेळीही राजीनामे घेतले होते. आमच्या पक्षातील काही नेते अग्निपरीक्षा देत आहेत. चौकशीतून सत्य पुढे येईल. कें द्र व राज्य सरकारकडून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. कापूस, सोयाबीन व धानाचे भाव पडले आहेत. दुसरीकडे सर्वशिक्षा अभियान, एनआरएचएम यासारख्या योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. एपीएल कार्डधारकांना देण्यात येणारे धान्य व केरोसीन बंद करण्यात आले आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक व रोजगार या सोबतच कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती समाधानी नाहीत. निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देण्यात आली. केंद्रात व राज्यात मोठ्या पदावर विदर्भातील नेते आहेत. भाजप नेत्यांकडून गाजावाजा केला जात असलेले नागपुरातील मिहान, आयआयएम, मेट्रो रेल्वे, आयआयटी अशा संस्थांना आघाडी सरकारच्या काळात मंजुरी देण्यात आली होती. भाजप सरकारने नागपूरसह विदर्भासाठी नवीन काहीही आणलेले नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी विदर्भ जेथे होता आजही तेथेच आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. विदर्भात उद्योग येत नसल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शहर राष्ट्रवादीतर्फे सत्कारप्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानिमित्त नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग व आमदार प्रकाश गजभिये यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विदर्भातील पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यात माजी मंत्री मनोहर नाईक, हर्षवर्धन देशमुख, चंद्रकांत ठाकरे, सुदर्शन निमकर,संतोष कोरपे, राजू तिमांडे, सुनील कोठारी, अनिल वऱ्हाडे, दीनानाथ पडोळे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, ग्रामीणचे राजाभाऊ टाकसाळे, अनिल अहिरकर, वेदप्रकाश आर्य यांच्यासह विदर्भातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आघाडीचा निर्णय योग्य वेळीकाँग्रेससोबत आघाडी करून लढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फारशी संधी मिळालेली नाही. नागपूर शहरात विधानसभेची एकही जागा आमच्या पक्षाला मिळत नाही. पुढील वर्षात होत असलेल्या जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुका डोळ्यापुुढे ठेवून पक्ष बळकट करण्यावर भर दिला जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबतचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.राष्ट्रवादीची बांधणीविदर्भातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी व बेरोजगार युवकांचे प्रश्न घेऊ न येत्या १५ दिवसात विदर्भातील सर्व जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेळावे, सभा आयोजित करून विदर्भातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या प्रयत्नसोबतच पक्षाची नव्याने बांधणी करण्याचा संकल्प सत्कार समारंभात व्यक्त करण्यात आला.