शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

भाजपने स्वत:चे घर स्वच्छ ठेवावे

By admin | Updated: June 5, 2016 02:45 IST

भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला.

प्रफुल्ल पटेल : भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यानेच खडसे यांचा राजीनामानागपूर : भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. खडसे ही तर सुरुवात आहे. राज्यातील चिक्की घोटाळा व शाळांना आग सुरक्षा यंत्र पुरवठ्यात याहूनही मोठा घोटाळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा देत रस्त्यावरील कचरा साफ करण्यापूर्वी भाजपने स्वत: चे घर स्वच्छ ठेवावे, असा टोला राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी लावला.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हिस्लॉप कॉलेजच्या बाजूला असलेल्या चिटणवीस सेंटर येथे पटेल यांचा सत्कार सभारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यानेच खडसे यांनी राजीनामा दिला. कुणाच्या दबावात राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा सल्लाही पटेल यांनी दिला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळातही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यावेळीही राजीनामे घेतले होते. आमच्या पक्षातील काही नेते अग्निपरीक्षा देत आहेत. चौकशीतून सत्य पुढे येईल. कें द्र व राज्य सरकारकडून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. कापूस, सोयाबीन व धानाचे भाव पडले आहेत. दुसरीकडे सर्वशिक्षा अभियान, एनआरएचएम यासारख्या योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. एपीएल कार्डधारकांना देण्यात येणारे धान्य व केरोसीन बंद करण्यात आले आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक व रोजगार या सोबतच कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती समाधानी नाहीत. निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देण्यात आली. केंद्रात व राज्यात मोठ्या पदावर विदर्भातील नेते आहेत. भाजप नेत्यांकडून गाजावाजा केला जात असलेले नागपुरातील मिहान, आयआयएम, मेट्रो रेल्वे, आयआयटी अशा संस्थांना आघाडी सरकारच्या काळात मंजुरी देण्यात आली होती. भाजप सरकारने नागपूरसह विदर्भासाठी नवीन काहीही आणलेले नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी विदर्भ जेथे होता आजही तेथेच आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. विदर्भात उद्योग येत नसल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शहर राष्ट्रवादीतर्फे सत्कारप्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानिमित्त नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग व आमदार प्रकाश गजभिये यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विदर्भातील पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यात माजी मंत्री मनोहर नाईक, हर्षवर्धन देशमुख, चंद्रकांत ठाकरे, सुदर्शन निमकर,संतोष कोरपे, राजू तिमांडे, सुनील कोठारी, अनिल वऱ्हाडे, दीनानाथ पडोळे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, ग्रामीणचे राजाभाऊ टाकसाळे, अनिल अहिरकर, वेदप्रकाश आर्य यांच्यासह विदर्भातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आघाडीचा निर्णय योग्य वेळीकाँग्रेससोबत आघाडी करून लढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फारशी संधी मिळालेली नाही. नागपूर शहरात विधानसभेची एकही जागा आमच्या पक्षाला मिळत नाही. पुढील वर्षात होत असलेल्या जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुका डोळ्यापुुढे ठेवून पक्ष बळकट करण्यावर भर दिला जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबतचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.राष्ट्रवादीची बांधणीविदर्भातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी व बेरोजगार युवकांचे प्रश्न घेऊ न येत्या १५ दिवसात विदर्भातील सर्व जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेळावे, सभा आयोजित करून विदर्भातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या प्रयत्नसोबतच पक्षाची नव्याने बांधणी करण्याचा संकल्प सत्कार समारंभात व्यक्त करण्यात आला.