शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

-तर भाजप नेत्यांनी १० मुले जन्माला घालावी

By admin | Updated: December 27, 2016 02:49 IST

महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदी ताप आहे तसाच आहे. बेरोजगारीचा ग्राफ वाढतो आहे.

स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद ही कोणती धर्म संस्कृती ? विविध क्षेत्रातील महिलांचा सवाल महिलांना मशीन समजू नका महागाई, गरिबीने सर्वसामान्य त्रस्त नागपूर : महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदी ताप आहे तसाच आहे. बेरोजगारीचा ग्राफ वाढतो आहे. देशात आजही अनेक नागरिक दोनवेळच्या जेवणापासून वंचित आहेत, असे असताना केवळ हिंदूची संख्या कमी होत आहे, असा तर्क लावत हिंदूनी किमान १० मुले जन्माला घालावी, असे फर्मान सोडणारे ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वक्तव्यावर उपराजधानीतील विविध क्षेत्रातील महिलांनी जोरदार टीका केली. धर्म आणि संस्कृतीच्या नावावर शंकराचार्यांनी केलेले वक्तव्य कोणत्या संस्कृतीत मोडणारे आहे, असा सवाल महिलांनी केला. धर्मसंस्कृती महाकुंभाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संघपरिवार आणि भाजप नेत्यांनी १० मुले जन्माला घालत शंकराचार्यांच्या उपदेशाची आधी स्वत: अंमलबजावणी करावी, अशी उपरोधिक टीका नागपूरकर महिलांनी केली आहे. महिलांना मुले तयार करणारी मशीन समजण्याचा हा संकुचित दृष्टिकोन असल्याचे मत काहींनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. अगोदर संघाच्या स्वयंसेवकांचे लग्न लावा महिलांना १० मुले जन्माला घाला म्हणण्यापूर्वी अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे लग्न लावा आणि त्यांच्यावरच हा प्रयोग करा. महिला म्हणजे मशीन वाटते का? एखाद्या शंकराचार्याने असे वक्तव्य करणे म्हणजे वयानुसार त्या शंकराचार्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, असे दिसून येते. असे आदेश देणारे हे होतात कोण? हा देश कुणी हिटलर चालवत नाही याची जाणीव असायला हवी. यानंतरही १० मुले जन्माला घालावी असे वाटत असेल तर त्याची सुरुवात स्वत:च्या घरातून करा. या युगात असे बोलणे म्हणजे महिलांचा अपमान करणे होय. ही धर्मांधता असून या धर्मांधतेने कळस गाठला आहे, त्यामुळे याचा आणि त्या शंकराचार्याचा निषेध असो. - रूपाताई कुळकर्णी, अध्यक्ष, विदर्भ मोलकरीण संघटना स्वत:च्या घरातून सुरुवात करा महिलांना वस्तू म्हणून समजणे हे चुकीचे आहे. घटनेने आम्हाला जे अधिकार दिले आहेत, त्यात मग लग्न करण्याचा किंवा न करण्याचा, मुले जन्माला घालण्याचा असो की न घालण्याचा असो ते मीच ठरवणार. धर्माच्या नावावर कुणी महिलांना मशीन समजण्याची गरज नाही. इतकेच मुले जन्माला घाला असा उपदेश देणे म्हणजे संकुचित दृष्टिकोन लक्षात घेता अशा लोकांना जी मंडळी गुरू समजतात त्यांचीही केविलवाणी स्थिती आहे लोकांना उपदेश द्यायचाच असेल तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वत:च्या घरातूनच झाली पाहिजे. त्यांनीसुद्धा आपल्या महिलांपासून याची सुरुवात करावी, आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्हाला काय हवे आहे ते आम्ही ठरवू. - अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, विश्लेषक, मानवी हक्क महागाईच्या काळात शक्यच नाही दहा मुले जन्माला घालणे हे आजच्या महागाईच्या काळात शक्य नाही आणि योग्यही होणार नाही. परंतु एकच मुलगा असावा, असा विचारही योग्य नाही. किमान दोन मुले असावी त्यापैकी एक देशासाठी देता येईल, या उद्देशातून शंकराचार्य यांनी कदाचित ते वक्तव्य केले असावे. - अर्चना डेहनकर, महासचिव, महाराष्ट्र महिला मोर्चा (भाजप)