शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

-तर भाजप नेत्यांनी १० मुले जन्माला घालावी

By admin | Updated: December 27, 2016 02:49 IST

महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदी ताप आहे तसाच आहे. बेरोजगारीचा ग्राफ वाढतो आहे.

स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद ही कोणती धर्म संस्कृती ? विविध क्षेत्रातील महिलांचा सवाल महिलांना मशीन समजू नका महागाई, गरिबीने सर्वसामान्य त्रस्त नागपूर : महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदी ताप आहे तसाच आहे. बेरोजगारीचा ग्राफ वाढतो आहे. देशात आजही अनेक नागरिक दोनवेळच्या जेवणापासून वंचित आहेत, असे असताना केवळ हिंदूची संख्या कमी होत आहे, असा तर्क लावत हिंदूनी किमान १० मुले जन्माला घालावी, असे फर्मान सोडणारे ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वक्तव्यावर उपराजधानीतील विविध क्षेत्रातील महिलांनी जोरदार टीका केली. धर्म आणि संस्कृतीच्या नावावर शंकराचार्यांनी केलेले वक्तव्य कोणत्या संस्कृतीत मोडणारे आहे, असा सवाल महिलांनी केला. धर्मसंस्कृती महाकुंभाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संघपरिवार आणि भाजप नेत्यांनी १० मुले जन्माला घालत शंकराचार्यांच्या उपदेशाची आधी स्वत: अंमलबजावणी करावी, अशी उपरोधिक टीका नागपूरकर महिलांनी केली आहे. महिलांना मुले तयार करणारी मशीन समजण्याचा हा संकुचित दृष्टिकोन असल्याचे मत काहींनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. अगोदर संघाच्या स्वयंसेवकांचे लग्न लावा महिलांना १० मुले जन्माला घाला म्हणण्यापूर्वी अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे लग्न लावा आणि त्यांच्यावरच हा प्रयोग करा. महिला म्हणजे मशीन वाटते का? एखाद्या शंकराचार्याने असे वक्तव्य करणे म्हणजे वयानुसार त्या शंकराचार्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, असे दिसून येते. असे आदेश देणारे हे होतात कोण? हा देश कुणी हिटलर चालवत नाही याची जाणीव असायला हवी. यानंतरही १० मुले जन्माला घालावी असे वाटत असेल तर त्याची सुरुवात स्वत:च्या घरातून करा. या युगात असे बोलणे म्हणजे महिलांचा अपमान करणे होय. ही धर्मांधता असून या धर्मांधतेने कळस गाठला आहे, त्यामुळे याचा आणि त्या शंकराचार्याचा निषेध असो. - रूपाताई कुळकर्णी, अध्यक्ष, विदर्भ मोलकरीण संघटना स्वत:च्या घरातून सुरुवात करा महिलांना वस्तू म्हणून समजणे हे चुकीचे आहे. घटनेने आम्हाला जे अधिकार दिले आहेत, त्यात मग लग्न करण्याचा किंवा न करण्याचा, मुले जन्माला घालण्याचा असो की न घालण्याचा असो ते मीच ठरवणार. धर्माच्या नावावर कुणी महिलांना मशीन समजण्याची गरज नाही. इतकेच मुले जन्माला घाला असा उपदेश देणे म्हणजे संकुचित दृष्टिकोन लक्षात घेता अशा लोकांना जी मंडळी गुरू समजतात त्यांचीही केविलवाणी स्थिती आहे लोकांना उपदेश द्यायचाच असेल तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वत:च्या घरातूनच झाली पाहिजे. त्यांनीसुद्धा आपल्या महिलांपासून याची सुरुवात करावी, आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्हाला काय हवे आहे ते आम्ही ठरवू. - अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, विश्लेषक, मानवी हक्क महागाईच्या काळात शक्यच नाही दहा मुले जन्माला घालणे हे आजच्या महागाईच्या काळात शक्य नाही आणि योग्यही होणार नाही. परंतु एकच मुलगा असावा, असा विचारही योग्य नाही. किमान दोन मुले असावी त्यापैकी एक देशासाठी देता येईल, या उद्देशातून शंकराचार्य यांनी कदाचित ते वक्तव्य केले असावे. - अर्चना डेहनकर, महासचिव, महाराष्ट्र महिला मोर्चा (भाजप)