शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भाजपाला काँग्रेसचीच साथ

By admin | Updated: March 24, 2017 01:46 IST

‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देऊन सोनिया गांधी व राहुल गांधींवर थेट टीका करणाऱ्या भाजपाला खुद्द काँग्रेसनेच केवळ

यवतमाळ : ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देऊन सोनिया गांधी व राहुल गांधींवर थेट टीका करणाऱ्या भाजपाला खुद्द काँग्रेसनेच केवळ सत्तेच्या लालसेपोटी साथ दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यवतमाळ, जळगावसह राज्यात अनेक ठिकाणी हे विसंगत चित्र पहायला मिळाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाने ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली. त्यासाठी काँग्रेस पक्षच नव्हे तर या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपाने टार्गेट केले. संपूर्ण निवडणूक प्रचारात ‘काँग्रेसमुक्त भारत’ हाच मुख्य अजेंडा ठेवण्यात आला होता. काँग्रेसला देशातून हाकलून लावू पाहणाऱ्या भाजपाला धडा शिकवणे, त्यांच्यापासून अंतर राखून रहाणे, शक्य असेल तेथे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे, त्यांच्या जातीयवादी विचारधारेला जनतेपुढे उघडे करणे आदी प्रयत्न काँग्रेसकडून होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी भाजपाला विरोध करण्याऐवजी केवळ सत्तेसाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला मुठमाती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका राज्यात पार पडल्या. या निवडणुकीत विरोधी बाकावर बसावे लागले तरी चालेल, मात्र जातीयवादी पक्षांशी युती करू नका, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली होती. परंतु त्यांच्या या भूमिकेला काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी छेद देऊन जातीयवादीय पक्षांना सत्तेत मदतीचा हात दिला. कुठे प्रत्यक्ष पाठिंबा देऊन तर कुठे सभागृहात अनुपस्थित राहून काँग्रेसने भाजपाला पाठबळ दिल्याचे चित्र आहे.यवतमाळात ठाकरे-मोघेंचा खेळ यवतमाळात भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले. सुरुवातीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा त्यासाठी आग्रह होता. अन्य काही नेते विरोधात होते. मात्र अध्यक्षपदाचा लालदिवा आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात येऊ शकतो याची जाणीव होताच माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे हेसुद्धा भाजपाचा पाठिंबा घेण्यासाठी तयार झाले. ठाकरे-मोघेंच्या मागे जिल्ह्यातील काँग्रेसचे अन्य नेतेही वाहवत गेले. जळगावातही भाजपा-काँग्रेसची सत्ता बसली. अन्य काही ठिकाणीसुद्धा अशी छुपी अ‍ॅडजेस्टमेंट करण्यात आल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)काँग्रेसला संपविणे हेच टार्गेट-काँग्रेसला संपविण्यासाठी विविध पर्याय भाजपाकडून अवलंबिले जात आहे. काँग्रेसमधील नाराज, दुखावलेल्या व असंतुष्ट कार्यकर्त्यांना उमेदवारी, लाभ, पदाचे आमिष देऊन मोठ्या प्रमाणात भाजपात आणले जात आहे. आता सत्तेत वाटेकरी करून काँग्रेसच्या नैतिकतेलाच भाजपाकडून सुरूंग लावला गेला आहे. सत्तेसाठी भाजपाची साथ घेतल्याने आता काँग्रेस नेते-पदाधिकाऱ्यांना भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणण्याची नैतिकताच उरलेली नाही. काँग्रेसचे तोंड बंद करण्याची भाजपाची ही खेळी यशस्वी झाल्याचे दिसते.अध्यक्ष काँग्रेसचा, रिमोट भाजपाकडे-यवतमाळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचा असला तरी सत्तेची सर्व सूत्रे व रिमोट भाजपाच्या हाती आहे. या माध्यमातूनही काँग्रेसला संपविण्याचा प्रयत्न होतो आहे. काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असली तरी जाहिरात फलकांवर केवळ भाजपा नेत्यांची छायाचित्रे झळकत असून काँग्रेस बरीच मागे पडली आहे.‘काँग्रेस का हाथ, मोदी के साथ’ -भाजपा-काँग्रेसच्या या सत्ता-समीकरणावर सोशल मीडियावरून काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. ‘काँग्रेस का हाथ, मोदी के साथ’ असा प्रचार करुन ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भाजपाच्या घोषणेला त्यांच्या पाठीराख्यांकडून आणखी सशक्त केले जात आहे. सत्तेसाठी काँग्रेस काय करू शकते, हे जनतेला दाखविण्याचा प्रयत्न या निमित्ताने भाजपा समर्थकांकडून होत आहे.