शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

भाजपाला काँग्रेसचीच साथ

By admin | Updated: March 24, 2017 01:46 IST

‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देऊन सोनिया गांधी व राहुल गांधींवर थेट टीका करणाऱ्या भाजपाला खुद्द काँग्रेसनेच केवळ

यवतमाळ : ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देऊन सोनिया गांधी व राहुल गांधींवर थेट टीका करणाऱ्या भाजपाला खुद्द काँग्रेसनेच केवळ सत्तेच्या लालसेपोटी साथ दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यवतमाळ, जळगावसह राज्यात अनेक ठिकाणी हे विसंगत चित्र पहायला मिळाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाने ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली. त्यासाठी काँग्रेस पक्षच नव्हे तर या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपाने टार्गेट केले. संपूर्ण निवडणूक प्रचारात ‘काँग्रेसमुक्त भारत’ हाच मुख्य अजेंडा ठेवण्यात आला होता. काँग्रेसला देशातून हाकलून लावू पाहणाऱ्या भाजपाला धडा शिकवणे, त्यांच्यापासून अंतर राखून रहाणे, शक्य असेल तेथे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे, त्यांच्या जातीयवादी विचारधारेला जनतेपुढे उघडे करणे आदी प्रयत्न काँग्रेसकडून होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी भाजपाला विरोध करण्याऐवजी केवळ सत्तेसाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला मुठमाती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका राज्यात पार पडल्या. या निवडणुकीत विरोधी बाकावर बसावे लागले तरी चालेल, मात्र जातीयवादी पक्षांशी युती करू नका, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली होती. परंतु त्यांच्या या भूमिकेला काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी छेद देऊन जातीयवादीय पक्षांना सत्तेत मदतीचा हात दिला. कुठे प्रत्यक्ष पाठिंबा देऊन तर कुठे सभागृहात अनुपस्थित राहून काँग्रेसने भाजपाला पाठबळ दिल्याचे चित्र आहे.यवतमाळात ठाकरे-मोघेंचा खेळ यवतमाळात भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले. सुरुवातीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा त्यासाठी आग्रह होता. अन्य काही नेते विरोधात होते. मात्र अध्यक्षपदाचा लालदिवा आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात येऊ शकतो याची जाणीव होताच माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे हेसुद्धा भाजपाचा पाठिंबा घेण्यासाठी तयार झाले. ठाकरे-मोघेंच्या मागे जिल्ह्यातील काँग्रेसचे अन्य नेतेही वाहवत गेले. जळगावातही भाजपा-काँग्रेसची सत्ता बसली. अन्य काही ठिकाणीसुद्धा अशी छुपी अ‍ॅडजेस्टमेंट करण्यात आल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)काँग्रेसला संपविणे हेच टार्गेट-काँग्रेसला संपविण्यासाठी विविध पर्याय भाजपाकडून अवलंबिले जात आहे. काँग्रेसमधील नाराज, दुखावलेल्या व असंतुष्ट कार्यकर्त्यांना उमेदवारी, लाभ, पदाचे आमिष देऊन मोठ्या प्रमाणात भाजपात आणले जात आहे. आता सत्तेत वाटेकरी करून काँग्रेसच्या नैतिकतेलाच भाजपाकडून सुरूंग लावला गेला आहे. सत्तेसाठी भाजपाची साथ घेतल्याने आता काँग्रेस नेते-पदाधिकाऱ्यांना भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणण्याची नैतिकताच उरलेली नाही. काँग्रेसचे तोंड बंद करण्याची भाजपाची ही खेळी यशस्वी झाल्याचे दिसते.अध्यक्ष काँग्रेसचा, रिमोट भाजपाकडे-यवतमाळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचा असला तरी सत्तेची सर्व सूत्रे व रिमोट भाजपाच्या हाती आहे. या माध्यमातूनही काँग्रेसला संपविण्याचा प्रयत्न होतो आहे. काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असली तरी जाहिरात फलकांवर केवळ भाजपा नेत्यांची छायाचित्रे झळकत असून काँग्रेस बरीच मागे पडली आहे.‘काँग्रेस का हाथ, मोदी के साथ’ -भाजपा-काँग्रेसच्या या सत्ता-समीकरणावर सोशल मीडियावरून काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. ‘काँग्रेस का हाथ, मोदी के साथ’ असा प्रचार करुन ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भाजपाच्या घोषणेला त्यांच्या पाठीराख्यांकडून आणखी सशक्त केले जात आहे. सत्तेसाठी काँग्रेस काय करू शकते, हे जनतेला दाखविण्याचा प्रयत्न या निमित्ताने भाजपा समर्थकांकडून होत आहे.