शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

ओबीसीलाच उमेदवारी दिल्याचा भाजप, काँग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेतील ओबीसीच्या सदस्यांचे आरक्षण नाकारले असले तरी, राजकीय पक्षांनी ओबीसींनाच प्रतिनिधित्व दिले आहे. निवडणूक ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेतील ओबीसीच्या सदस्यांचे आरक्षण नाकारले असले तरी, राजकीय पक्षांनी ओबीसींनाच प्रतिनिधित्व दिले आहे. निवडणूक आयोगाने ओबीसीच्या सर्व जागा निरस्त करून खुल्या प्रवर्गासाठी केल्या. त्यामुळे ओबीसी समाजातून नाराजी व्यक्त होत होती. निवडणुकीत ओबीसीची नाराजी अडचणीची ठरू नये म्हणून भाजप आणि काँग्रेस पक्षाने ओबीसी उमेदवारच रिंगणात उतरविले.

विशेष म्हणजे, भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेत ओबीसी उमेदवारांनाच प्रतिनिधित्व देणार, अशी घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार जिल्हा भाजपाच्या कार्यकारिणीने १६ ही जागेवर ओबीसी उमेदवार उतरविले. त्यामुळे काँग्रेस पक्षानेसुद्धा भाजपाच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या वाट्याला आलेल्या दहाही जागेवर ओबीसी उमेदवाराला रिंगणात उतरविले. काँग्रेसने गेल्या निवडणुकीत उमेदवारी दिलेल्यांपैकी केवळ एका विद्यमान उमेदवाराची तिकीट कापून दुसऱ्याला संधी दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण कारणीभूत ठरले होते. जिल्हा परिषदेतील एकूण आरक्षण ५० टक्क्यावर गेल्याने, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण रद्द ठरवीत, तीन महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेतील ओबीसींच्या सर्वच जागा रद्द करून खुल्या केल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीत ओबीसीचे अस्तित्वच एकप्रकारे नाकारल्या गेल्याने समाजात नाराजी पसरली होती. पण राजकीय पक्षाने खुल्या प्रवर्गातूनही ओबीसींनाच प्रतिनिधित्व दिले.

- () खरे तर या निवडणुकीला भाजप सरकारच जबाबदार आहे. राज्यात भाजपाची सत्ता असताना ओबीसीचा प्रश्न सोडवू शकली नाही. त्यामुळे निवडणुका लादल्या गेल्या. ओबीसीवर अन्याय झाला असला तरी, काँग्रेसने त्यांची साथ सोडली नाही. आमच्या वाट्याला आलेल्या सर्वच जागांवर आम्ही ओबीसींना प्रतिनिधित्व दिले.

राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

-() निवडणूक आयोगाने ओबीसीच्या १६ ही जागा खुल्या केल्या असल्या तरी, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ओबीसींनाच प्रतिनिधित्व देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आम्ही सर्व १६ जागेवर ओबीसींना प्रतिनिधित्व दिले.

अरविंद गजभिये, जिल्हाध्यक्ष, भाजपा