शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

हेविवेट नेते असूनही भाजप ‘चेकमेट’; वंजारींकडून नियोजन, नोंदणी अन् संपर्काची त्रिसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 07:00 IST

nagpur news दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील पदाधिकाऱ्यांपर्यंतची फौज आणि विशेष म्हणजे मागील ५८ वर्षांचा ‘नॉटआऊट’ इतिहास. इतक्या सर्व जमेच्या बाजू असतानादेखील भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला राखता आला नाही.

ठळक मुद्देसंघ मुख्यालयाच्या मतदारसंघात नेत्यांना अतिआत्मविश्वास भोवला

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी, दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील पदाधिकाऱ्यांपर्यंतची फौज आणि विशेष म्हणजे मागील ५८ वर्षांचा ‘नॉटआऊट’ इतिहास. इतक्या सर्व जमेच्या बाजू असतानादेखील भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला राखता आला नाही. तुलनेने नवखे व तरुण असलेल्या वंजारी यांनी आपले कौशल्य दाखवत भाजपच्या धुरिणांना त्यांच्याच कर्मभूमीत धूळ चारली. भाजपच्या पराभवामागे विविध कारणे असली तरी या जागेच्या विजयासंदर्भातील अतिआत्मविश्वास त्यांना भोवल्याचे चित्र आहे.

भाजपने मागील दीड वर्षापासूनच या मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याची एकूण हवा बनविली होती. मात्र प्रत्यक्षात माजी आमदार अनिल सोले व काही चेहरे वगळता इतरांचा मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क तुटला होता. गडकरी यांचे खंदे समर्थक असलेल्या सोले यांना अखेरपर्यंत उमेदवारी तुमचीच असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात ऐनवेळी संदीप जोशी यांना उमेदवारी दिल्याने पक्षातदेखील अंतर्गत नाराजीचा सूर होता. पदवीधरच्या मतदारांसाठी जोशी नवीन होते. वेळेवर उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांनादेखील प्रचाराला फारच थोडा कालावधी मिळाला. सोबतच मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाच्या कालावधीत जनसमर्थन लाभत असताना त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने जोशी वादात सापडले होते. मुंढे यांची बदली झाल्यानंतर याबाबतीतील रोष आणखी वाढला होता. सोशल मीडियावर तर जोशी यांच्याविरोधात मोहीमच चालविण्यात आली. मात्र भाजपच्या प्रचारयंत्रणेने या बाबीसह जातीय समीकरणांचा मुद्दा फारसा गंभीरतेने घेतला नाही. याचा फटका निश्चित मतदानादरम्यान बसला.

दुसरीकडे स्वच्छ प्रतिमा आणि कामातील प्रतिभा यांच्या जोरावर वंजारी मतदारांमध्ये गेले. मागील दीड ते दोन वर्षांपासून वंजारी यांचे वैयक्तिक प्रयत्न, नोंदणीवर देण्यात आलेला भर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तळागाळापर्यंत संपर्काचे नियोजन या त्रिसूत्रीमुळे त्यांना मैदान मारता आले. नागपूर विद्यापीठातील त्यांचे मागील १५ वर्षांचे कामदेखील मतदारांसमोर होते. आधी लगीन पदवीधरचे अशी भूमिका घेत ऐनवेळी गटबाजीला दूर सारत काँग्रेसचे नेते प्रचारात एकत्र आले व वंजारी यांनी अनोखा करिष्मा करून दाखविला. पदवीधरच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश भरला असून भविष्यात भाजपसमोरील आव्हाने वाढणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Abhijit Wanjariअभिजीत वंजारी