शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

हेविवेट नेते असूनही भाजप ‘चेकमेट’; वंजारींकडून नियोजन, नोंदणी अन् संपर्काची त्रिसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 07:00 IST

nagpur news दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील पदाधिकाऱ्यांपर्यंतची फौज आणि विशेष म्हणजे मागील ५८ वर्षांचा ‘नॉटआऊट’ इतिहास. इतक्या सर्व जमेच्या बाजू असतानादेखील भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला राखता आला नाही.

ठळक मुद्देसंघ मुख्यालयाच्या मतदारसंघात नेत्यांना अतिआत्मविश्वास भोवला

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी, दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील पदाधिकाऱ्यांपर्यंतची फौज आणि विशेष म्हणजे मागील ५८ वर्षांचा ‘नॉटआऊट’ इतिहास. इतक्या सर्व जमेच्या बाजू असतानादेखील भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला राखता आला नाही. तुलनेने नवखे व तरुण असलेल्या वंजारी यांनी आपले कौशल्य दाखवत भाजपच्या धुरिणांना त्यांच्याच कर्मभूमीत धूळ चारली. भाजपच्या पराभवामागे विविध कारणे असली तरी या जागेच्या विजयासंदर्भातील अतिआत्मविश्वास त्यांना भोवल्याचे चित्र आहे.

भाजपने मागील दीड वर्षापासूनच या मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याची एकूण हवा बनविली होती. मात्र प्रत्यक्षात माजी आमदार अनिल सोले व काही चेहरे वगळता इतरांचा मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क तुटला होता. गडकरी यांचे खंदे समर्थक असलेल्या सोले यांना अखेरपर्यंत उमेदवारी तुमचीच असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात ऐनवेळी संदीप जोशी यांना उमेदवारी दिल्याने पक्षातदेखील अंतर्गत नाराजीचा सूर होता. पदवीधरच्या मतदारांसाठी जोशी नवीन होते. वेळेवर उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांनादेखील प्रचाराला फारच थोडा कालावधी मिळाला. सोबतच मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाच्या कालावधीत जनसमर्थन लाभत असताना त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने जोशी वादात सापडले होते. मुंढे यांची बदली झाल्यानंतर याबाबतीतील रोष आणखी वाढला होता. सोशल मीडियावर तर जोशी यांच्याविरोधात मोहीमच चालविण्यात आली. मात्र भाजपच्या प्रचारयंत्रणेने या बाबीसह जातीय समीकरणांचा मुद्दा फारसा गंभीरतेने घेतला नाही. याचा फटका निश्चित मतदानादरम्यान बसला.

दुसरीकडे स्वच्छ प्रतिमा आणि कामातील प्रतिभा यांच्या जोरावर वंजारी मतदारांमध्ये गेले. मागील दीड ते दोन वर्षांपासून वंजारी यांचे वैयक्तिक प्रयत्न, नोंदणीवर देण्यात आलेला भर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तळागाळापर्यंत संपर्काचे नियोजन या त्रिसूत्रीमुळे त्यांना मैदान मारता आले. नागपूर विद्यापीठातील त्यांचे मागील १५ वर्षांचे कामदेखील मतदारांसमोर होते. आधी लगीन पदवीधरचे अशी भूमिका घेत ऐनवेळी गटबाजीला दूर सारत काँग्रेसचे नेते प्रचारात एकत्र आले व वंजारी यांनी अनोखा करिष्मा करून दाखविला. पदवीधरच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश भरला असून भविष्यात भाजपसमोरील आव्हाने वाढणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Abhijit Wanjariअभिजीत वंजारी