शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हेविवेट नेते असूनही भाजप ‘चेकमेट’; वंजारींकडून नियोजन, नोंदणी अन् संपर्काची त्रिसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 07:00 IST

nagpur news दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील पदाधिकाऱ्यांपर्यंतची फौज आणि विशेष म्हणजे मागील ५८ वर्षांचा ‘नॉटआऊट’ इतिहास. इतक्या सर्व जमेच्या बाजू असतानादेखील भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला राखता आला नाही.

ठळक मुद्देसंघ मुख्यालयाच्या मतदारसंघात नेत्यांना अतिआत्मविश्वास भोवला

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी, दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील पदाधिकाऱ्यांपर्यंतची फौज आणि विशेष म्हणजे मागील ५८ वर्षांचा ‘नॉटआऊट’ इतिहास. इतक्या सर्व जमेच्या बाजू असतानादेखील भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला राखता आला नाही. तुलनेने नवखे व तरुण असलेल्या वंजारी यांनी आपले कौशल्य दाखवत भाजपच्या धुरिणांना त्यांच्याच कर्मभूमीत धूळ चारली. भाजपच्या पराभवामागे विविध कारणे असली तरी या जागेच्या विजयासंदर्भातील अतिआत्मविश्वास त्यांना भोवल्याचे चित्र आहे.

भाजपने मागील दीड वर्षापासूनच या मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याची एकूण हवा बनविली होती. मात्र प्रत्यक्षात माजी आमदार अनिल सोले व काही चेहरे वगळता इतरांचा मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क तुटला होता. गडकरी यांचे खंदे समर्थक असलेल्या सोले यांना अखेरपर्यंत उमेदवारी तुमचीच असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात ऐनवेळी संदीप जोशी यांना उमेदवारी दिल्याने पक्षातदेखील अंतर्गत नाराजीचा सूर होता. पदवीधरच्या मतदारांसाठी जोशी नवीन होते. वेळेवर उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांनादेखील प्रचाराला फारच थोडा कालावधी मिळाला. सोबतच मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाच्या कालावधीत जनसमर्थन लाभत असताना त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने जोशी वादात सापडले होते. मुंढे यांची बदली झाल्यानंतर याबाबतीतील रोष आणखी वाढला होता. सोशल मीडियावर तर जोशी यांच्याविरोधात मोहीमच चालविण्यात आली. मात्र भाजपच्या प्रचारयंत्रणेने या बाबीसह जातीय समीकरणांचा मुद्दा फारसा गंभीरतेने घेतला नाही. याचा फटका निश्चित मतदानादरम्यान बसला.

दुसरीकडे स्वच्छ प्रतिमा आणि कामातील प्रतिभा यांच्या जोरावर वंजारी मतदारांमध्ये गेले. मागील दीड ते दोन वर्षांपासून वंजारी यांचे वैयक्तिक प्रयत्न, नोंदणीवर देण्यात आलेला भर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तळागाळापर्यंत संपर्काचे नियोजन या त्रिसूत्रीमुळे त्यांना मैदान मारता आले. नागपूर विद्यापीठातील त्यांचे मागील १५ वर्षांचे कामदेखील मतदारांसमोर होते. आधी लगीन पदवीधरचे अशी भूमिका घेत ऐनवेळी गटबाजीला दूर सारत काँग्रेसचे नेते प्रचारात एकत्र आले व वंजारी यांनी अनोखा करिष्मा करून दाखविला. पदवीधरच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश भरला असून भविष्यात भाजपसमोरील आव्हाने वाढणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Abhijit Wanjariअभिजीत वंजारी