शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

भाजपाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; गजानन किर्तीकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:39 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती मोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात केला.

ठळक मुद्देशिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात स्वबळावर निवडणुकीचा नारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसच्या दलदलीतून सुटका होण्यासाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे देश उभा राहिला. एनडीएची स्थापना करण्यात आली. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीतून सुटका व्हावी म्हणून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविले. पण अहंकारी भाजपाला एनडीएची गरज भासली नाही. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती मोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात केला.पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी किर्तीकर यांचे प्रयत्न आहेत. यातूनच नागपूर शहर शिवसेनेतर्फे उत्तर नागपुरातील गुरुनानक सभागृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव, माजी जिल्हाअध्यक्ष सतीश हरडे, माजी उपहमापौर किशोर कुमेरिया, माजी नगरसेवक बंडू तळवेकर, महिला संपर्क प्रमुख मंदाकिनी भावे, महिला आघाडीच्या शहर प्रमुख अलका दलाल, सूरज गोजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.किर्तीकर म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुकीतही भाजपाची लाट होती. मात्र आता लाट संपली आहे. नोटाबंदी देशासाठी घातक ठरली. देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली. अनके छोटया व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशात एकप्रकारची हुकूमशाही सुरू आहे. काही वर्षापूर्वी भाजपाकडे पैसा नव्हता, परंतु आता ज्या- ज्या ठिकाणी निवडणुका होतात. तेथे भाजपाकडून पैशाचा वापर केला जातो. असे असले तरी विदर्भामध्ये शिवसेनेला मजबूत पाठिंबा आहे. देशाची सूत्रे हलविणाऱ्या नागपूर शहरातही शिवसेना कमकुवत असून चालणार नाही. पक्ष बळकट करण्यासाठी बूथस्तरावर पक्ष मजबूत करा.२०१४ च्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढूनही शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. तर ७० ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. मतप्रवाह शिवसेनेच्या बाजूने आहे. तो पारड्यात पाडून घेण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन गजनान किर्तीकर यांनी केले.मंदिरांच्या संरक्षणासाठी शिवसेना मैदानात उतरणारन्यायालयाच्या निर्णयाला आमचा विरोध नाही. वाहतुकीला अडथळा होणारी धार्मिक स्थळे हटली पाहिजे. परंतु रहदारीला अडथळा नसलेली लोकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे हटविण्याचे काम सुरू आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही मंदिर वाचविण्यासाठी अध्यादेश काढला जात नाही. जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा-तेव्हा भाजपाला रामाची आठवण येते. आता त्यांच्याच राजवटीत मंदिरे तोडली जात आहे. भाजपाने नागपूर शहाराचे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. मंदिरांच्या संरक्षणासाठी आता शिवसेना मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार प्रकाश जाधव यांनी यावेळी आपल्या भाषणातून केली. गेल्या चार वर्षाच्या काळात बेरोजगार, शेतकरी, उद्योजक यांच्यासाठी सरकारने काहीच केले नाही असे असूनही कोट्यवधी बेरोजगारांना रोजगार दिल्याचे देशाचे पंतप्रधान खोटे बोलतात, असा आरोप जाधव यांनी केला.

 

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकर