शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

भाजपाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; गजानन किर्तीकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:39 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती मोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात केला.

ठळक मुद्देशिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात स्वबळावर निवडणुकीचा नारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसच्या दलदलीतून सुटका होण्यासाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे देश उभा राहिला. एनडीएची स्थापना करण्यात आली. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीतून सुटका व्हावी म्हणून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविले. पण अहंकारी भाजपाला एनडीएची गरज भासली नाही. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती मोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात केला.पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी किर्तीकर यांचे प्रयत्न आहेत. यातूनच नागपूर शहर शिवसेनेतर्फे उत्तर नागपुरातील गुरुनानक सभागृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव, माजी जिल्हाअध्यक्ष सतीश हरडे, माजी उपहमापौर किशोर कुमेरिया, माजी नगरसेवक बंडू तळवेकर, महिला संपर्क प्रमुख मंदाकिनी भावे, महिला आघाडीच्या शहर प्रमुख अलका दलाल, सूरज गोजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.किर्तीकर म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुकीतही भाजपाची लाट होती. मात्र आता लाट संपली आहे. नोटाबंदी देशासाठी घातक ठरली. देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली. अनके छोटया व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशात एकप्रकारची हुकूमशाही सुरू आहे. काही वर्षापूर्वी भाजपाकडे पैसा नव्हता, परंतु आता ज्या- ज्या ठिकाणी निवडणुका होतात. तेथे भाजपाकडून पैशाचा वापर केला जातो. असे असले तरी विदर्भामध्ये शिवसेनेला मजबूत पाठिंबा आहे. देशाची सूत्रे हलविणाऱ्या नागपूर शहरातही शिवसेना कमकुवत असून चालणार नाही. पक्ष बळकट करण्यासाठी बूथस्तरावर पक्ष मजबूत करा.२०१४ च्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढूनही शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. तर ७० ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. मतप्रवाह शिवसेनेच्या बाजूने आहे. तो पारड्यात पाडून घेण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन गजनान किर्तीकर यांनी केले.मंदिरांच्या संरक्षणासाठी शिवसेना मैदानात उतरणारन्यायालयाच्या निर्णयाला आमचा विरोध नाही. वाहतुकीला अडथळा होणारी धार्मिक स्थळे हटली पाहिजे. परंतु रहदारीला अडथळा नसलेली लोकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे हटविण्याचे काम सुरू आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही मंदिर वाचविण्यासाठी अध्यादेश काढला जात नाही. जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा-तेव्हा भाजपाला रामाची आठवण येते. आता त्यांच्याच राजवटीत मंदिरे तोडली जात आहे. भाजपाने नागपूर शहाराचे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. मंदिरांच्या संरक्षणासाठी आता शिवसेना मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार प्रकाश जाधव यांनी यावेळी आपल्या भाषणातून केली. गेल्या चार वर्षाच्या काळात बेरोजगार, शेतकरी, उद्योजक यांच्यासाठी सरकारने काहीच केले नाही असे असूनही कोट्यवधी बेरोजगारांना रोजगार दिल्याचे देशाचे पंतप्रधान खोटे बोलतात, असा आरोप जाधव यांनी केला.

 

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकर