शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

भाजपाला देश चालविता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST

नागपूर : भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. हा निर्णय योग्य असल्याचे ...

नागपूर : भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. हा निर्णय योग्य असल्याचे जनतेला कळून आले आहे. मुख्य म्हणजे भाजपाला देश चालविता येत नाही. त्यांच्या सरकारचे निर्णय देशहितासाठी घातक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिली.

एका खासगी कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता त्यांनी सदर प्रतिनिधीशी संवाद साधला. थोरात म्हणाले, महाविकास आघाडीतील मंत्री एकत्र बसून जनतेच्या हिताचे निर्णय घेतात. दर मंगळवारी तिन्ही पक्षांचे मंत्री अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेत असतात. सर्व निर्णय जनतेच्या हितासाठीच असतात. एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षात सोनिया गांधी जे निर्णय घेतात, ते सर्वांना मान्य असतात. राहुल गांधी उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष बनावे, अशी व्यक्तिगत इच्छा आहे. शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहे. महाविकास आघाडीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

थोरात म्हणाले, आरशात पहा, पुढच्या विरोधी पक्षाचा नेता दिसेल, असे मी कोल्हापूरच्या सभेत म्हणालो होतो. मी पुन्हा येईल, हे तर दूरच राज्यात भाजपा सत्तेत कधीही येणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. नाना पटोले यांच्यासंदर्भात ते म्हणाले, प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते. ते चांगले नेते आहे. कार्यकर्त्यांची बांधणी चांगली करतील, असा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस पक्ष नव्या उमेदीने काम करेल.

राज्यात चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणी त्यांनी उत्तर देण्यास टाळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंत थांबावे. त्यानंतरच काही ठोस निर्णय घेता येईल. या प्रकरणी आता कुठल्याही नेत्याचे नाव घेणे योग्य ठरणार नाही.