शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला देश चालविता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST

नागपूर : भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. हा निर्णय योग्य असल्याचे ...

नागपूर : भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. हा निर्णय योग्य असल्याचे जनतेला कळून आले आहे. मुख्य म्हणजे भाजपाला देश चालविता येत नाही. त्यांच्या सरकारचे निर्णय देशहितासाठी घातक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिली.

एका खासगी कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता त्यांनी सदर प्रतिनिधीशी संवाद साधला. थोरात म्हणाले, महाविकास आघाडीतील मंत्री एकत्र बसून जनतेच्या हिताचे निर्णय घेतात. दर मंगळवारी तिन्ही पक्षांचे मंत्री अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेत असतात. सर्व निर्णय जनतेच्या हितासाठीच असतात. एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षात सोनिया गांधी जे निर्णय घेतात, ते सर्वांना मान्य असतात. राहुल गांधी उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष बनावे, अशी व्यक्तिगत इच्छा आहे. शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहे. महाविकास आघाडीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

थोरात म्हणाले, आरशात पहा, पुढच्या विरोधी पक्षाचा नेता दिसेल, असे मी कोल्हापूरच्या सभेत म्हणालो होतो. मी पुन्हा येईल, हे तर दूरच राज्यात भाजपा सत्तेत कधीही येणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. नाना पटोले यांच्यासंदर्भात ते म्हणाले, प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते. ते चांगले नेते आहे. कार्यकर्त्यांची बांधणी चांगली करतील, असा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस पक्ष नव्या उमेदीने काम करेल.

राज्यात चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणी त्यांनी उत्तर देण्यास टाळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंत थांबावे. त्यानंतरच काही ठोस निर्णय घेता येईल. या प्रकरणी आता कुठल्याही नेत्याचे नाव घेणे योग्य ठरणार नाही.