शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्लूची लागण पक्ष्यांना, फटका पोल्ट्री फार्मला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST

नागपूर : ‘बर्ड फ्लू’ म्हणजे ‘पोल्ट्री फार्म’ असे समीकरण झाले आहे. देशात महाराष्ट्र वगळता सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका ...

नागपूर : ‘बर्ड फ्लू’ म्हणजे ‘पोल्ट्री फार्म’ असे समीकरण झाले आहे. देशात महाराष्ट्र वगळता सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका असल्याचे दिसून येत आहे. हा आजार कोंबड्यांना नव्हे तर पक्ष्यांमध्ये आढळून आला आहे. बर्ड फ्लूची लागण पक्ष्यांना झाली, फटका मात्र पोल्ट्री फर्मला बसत आहे.

या आजारामुळे पक्ष्यांचा मोठ्या संख्येने मृत्यू झाला आहे. पण हा आजार कोंबड्यांना झाल्याच्या अफवेमुळे सर्वाधिक फटका पोल्ट्री फार्म व्यवसायाला बसला आहे. कोरोना महामारीच्या संकटातून सावरत कर्जातून नव्याने उभ्या राहिलेल्या या व्यवसायाला पुन्हा नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात पशुसंवर्धन मंत्र्यांनीही महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे बयाण जारी केले आहे, हे विशेष.

हा आजार स्थलांतरित पक्षांमध्ये आढळून आला आहे. या पक्ष्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य पक्ष्यांचाही या आजाराने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात बर्ड फ्लूची अफवा पसरताच पोल्ट्री फार्मच्या संचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे गेल्या काही दिवसात मालाचे दर कमी झाले, पण त्या तुलनेत विक्री तेवढीच आहे. पोल्ट्री फार्मचे संचालक म्हणाले, बर्ड फ्यूची पोल्ट्री फार्ममध्ये काहीही भीती नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्व फार्म सुरू आहेत. टीव्हीवर बर्ड फ्लू संदर्भात प्रसारित होणाऱ्या बातम्यांमध्ये संदर्भ म्हणून पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दाखवितात. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरला असून चुकीच्या बातम्यांमुळे या व्यवसायावर पुन्हा संकट येऊ नये, अशी व्यावसायिकांना चिंता आहे.

विदर्भ पोल्ट्री फार्म असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजा दुधभडे म्हणाले, पोल्ट्री फार्म हा शेतीपूरक व्यवसाय आहे. विदर्भात लहानमोठे ७०० पेक्षा जास्त पोल्ट्री फार्म असून दररोज ८ ते १० कोटींची उलाढाल होते आणि जवळपास १० हजार लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या या व्यवसायाशी जुळले आहेत. कोरोनानंतर महामारीनंतर डिसेंबरपासून हा व्यवसाय रुळावर आला असून राज्य शासनाच्या मदतीविना अनेकांनी घरचे दागदागिने विकून नव्याने उभा केला आहे. सत्यस्थिती लोकांसमोर न आल्याने बर्ड फ्लूच्या धास्तीने या व्यवसायावर नव्याने संकट उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वी भाव काही प्रमाणात कमी झाले, पण विक्री पूर्वीप्रमाणेच होती. गेल्या आठवड्यापासून भाव पूर्ववत झाले आहेत. यासंदर्भात पशुसंवर्धन मंत्र्यांचे वक्तव्य सकारात्मक आहे.

या व्यवसायाला लागणारे खाद्य सोयाबीन केक आणि मक्याचे भाव कमी झाले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. येथील पोल्ट्री फार्ममधून संपूर्ण विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगाणा येथे मालाची विक्री होते. टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांमध्ये या व्यवसायाची सत्यस्थिती प्रकाशित करावी, अन्यथा हा व्यवसाय पुन्हा डबघाईस येण्यास वेळ लागणार नाही. आता तर पोल्ट्री फार्म संचालकांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असे डॉ. दुधभडे म्हणाले.