शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विषाणूने जातायेत जीव !

By admin | Updated: August 31, 2015 02:44 IST

राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू व स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे.

नागपूर विभागाचे वास्तव : पाच वर्षांत स्वाईन फ्लूने २२७ तर, डेंग्यूने १०९ रुग्णांचा मृत्यूनागपूर : राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू व स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. २०१० ते आतापर्यंत डेंग्यू लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३७४३ वर गेली आहे. यातील १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूमध्ये गेल्या पाच वर्षांत २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या मोठी आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे आहे. परंतु याबाबत पूर्वकाळजी घेतली जात नाही. परिणामी दरवर्षी या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येतात. अशीच स्थिती स्वाईन फ्लू बाबत आहे. आजार पसरू नयेत यासाठी शासनाच्यावतीने जी उपाययोजना आधीच करायला पाहिजे ती प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तज्ज्ञाच्या मते, महानगरपालिका व आरोग्य विभागाकडे या दोन्ही आजाराशी मुकाबला करण्याची विशेष यंत्रणाच नाही. यामुळे दरवर्षी या आजाराच्या रुग्णासह मृत्यूची संख्या वाढत आहे. सहा महिन्यात स्वाईन फ्लूच्या मृत्यूची संख्या १२६नागपूर विभागात २०१० मध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांत अचानक वाढ होऊन मृत्यूची संख्या ५४वर गेली. २०११ मध्ये मृत्यूची नोंदच झालेली नाही. परंतु नंतर ही संख्या वाढत गेली. २०१२ मध्ये ९, २०१३मध्ये २८, २०१४मध्ये १० तर ३० जून २०१५ पर्यंत मृत्यूची संख्या १२६वर पोहचली. गतवर्षी डेंग्यूने घेतले ४३ बळी२०१० मध्ये डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ होती. २०११ मध्ये ८३ रुग्ण व ४ बळी गेले होते. २०१२ मध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊन ४२२वर पोहचली तर मृत्यूची संख्या १७ होती. २०१३ मध्ये रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली. १०९६ रुग्णांची नोंद झाली तर मृत्यूची संख्या ३५वर पोहचली. २०१४ मध्ये रुग्णांची संख्या २०९६ तर मृत्यूची संख्या ४३ झाली. जून २०१५ पर्यंत डेंग्यूचे ३२ रुग्ण आढळून आले तर एकाही मृत्यूची नोंद नाही. स्वाईन फ्लूने १२७ महिलांचा मृत्यूस्वाईन फ्लूमध्ये गेल्या पाच वर्षांत पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांच्या मृत्यूची संख्या मोठी आहे. २०१० मध्ये २१ पुरुष तर ३३ महिला, २०१२मध्ये पाच पुरुष तर ५ महिला, २०१३ मध्ये १९ पुरुष तर ९ महिला, २०१४ मध्ये ४ पुरुष तर ६ महिला तर सर्वाधिक मृत्यू या चालू वर्षात झाले. पुरुषांच्या मृत्यूची संख्या १०० झाली असून महिलांची संख्या १२७ वर गेली आहे.