शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

विषाणूने जातायेत जीव !

By admin | Updated: August 31, 2015 02:44 IST

राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू व स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे.

नागपूर विभागाचे वास्तव : पाच वर्षांत स्वाईन फ्लूने २२७ तर, डेंग्यूने १०९ रुग्णांचा मृत्यूनागपूर : राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू व स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. २०१० ते आतापर्यंत डेंग्यू लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३७४३ वर गेली आहे. यातील १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूमध्ये गेल्या पाच वर्षांत २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या मोठी आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे आहे. परंतु याबाबत पूर्वकाळजी घेतली जात नाही. परिणामी दरवर्षी या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येतात. अशीच स्थिती स्वाईन फ्लू बाबत आहे. आजार पसरू नयेत यासाठी शासनाच्यावतीने जी उपाययोजना आधीच करायला पाहिजे ती प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तज्ज्ञाच्या मते, महानगरपालिका व आरोग्य विभागाकडे या दोन्ही आजाराशी मुकाबला करण्याची विशेष यंत्रणाच नाही. यामुळे दरवर्षी या आजाराच्या रुग्णासह मृत्यूची संख्या वाढत आहे. सहा महिन्यात स्वाईन फ्लूच्या मृत्यूची संख्या १२६नागपूर विभागात २०१० मध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांत अचानक वाढ होऊन मृत्यूची संख्या ५४वर गेली. २०११ मध्ये मृत्यूची नोंदच झालेली नाही. परंतु नंतर ही संख्या वाढत गेली. २०१२ मध्ये ९, २०१३मध्ये २८, २०१४मध्ये १० तर ३० जून २०१५ पर्यंत मृत्यूची संख्या १२६वर पोहचली. गतवर्षी डेंग्यूने घेतले ४३ बळी२०१० मध्ये डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ होती. २०११ मध्ये ८३ रुग्ण व ४ बळी गेले होते. २०१२ मध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊन ४२२वर पोहचली तर मृत्यूची संख्या १७ होती. २०१३ मध्ये रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली. १०९६ रुग्णांची नोंद झाली तर मृत्यूची संख्या ३५वर पोहचली. २०१४ मध्ये रुग्णांची संख्या २०९६ तर मृत्यूची संख्या ४३ झाली. जून २०१५ पर्यंत डेंग्यूचे ३२ रुग्ण आढळून आले तर एकाही मृत्यूची नोंद नाही. स्वाईन फ्लूने १२७ महिलांचा मृत्यूस्वाईन फ्लूमध्ये गेल्या पाच वर्षांत पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांच्या मृत्यूची संख्या मोठी आहे. २०१० मध्ये २१ पुरुष तर ३३ महिला, २०१२मध्ये पाच पुरुष तर ५ महिला, २०१३ मध्ये १९ पुरुष तर ९ महिला, २०१४ मध्ये ४ पुरुष तर ६ महिला तर सर्वाधिक मृत्यू या चालू वर्षात झाले. पुरुषांच्या मृत्यूची संख्या १०० झाली असून महिलांची संख्या १२७ वर गेली आहे.