शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

विषाणूने जातायेत जीव !

By admin | Updated: August 31, 2015 02:44 IST

राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू व स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे.

नागपूर विभागाचे वास्तव : पाच वर्षांत स्वाईन फ्लूने २२७ तर, डेंग्यूने १०९ रुग्णांचा मृत्यूनागपूर : राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू व स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. २०१० ते आतापर्यंत डेंग्यू लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३७४३ वर गेली आहे. यातील १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूमध्ये गेल्या पाच वर्षांत २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या मोठी आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे आहे. परंतु याबाबत पूर्वकाळजी घेतली जात नाही. परिणामी दरवर्षी या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येतात. अशीच स्थिती स्वाईन फ्लू बाबत आहे. आजार पसरू नयेत यासाठी शासनाच्यावतीने जी उपाययोजना आधीच करायला पाहिजे ती प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तज्ज्ञाच्या मते, महानगरपालिका व आरोग्य विभागाकडे या दोन्ही आजाराशी मुकाबला करण्याची विशेष यंत्रणाच नाही. यामुळे दरवर्षी या आजाराच्या रुग्णासह मृत्यूची संख्या वाढत आहे. सहा महिन्यात स्वाईन फ्लूच्या मृत्यूची संख्या १२६नागपूर विभागात २०१० मध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांत अचानक वाढ होऊन मृत्यूची संख्या ५४वर गेली. २०११ मध्ये मृत्यूची नोंदच झालेली नाही. परंतु नंतर ही संख्या वाढत गेली. २०१२ मध्ये ९, २०१३मध्ये २८, २०१४मध्ये १० तर ३० जून २०१५ पर्यंत मृत्यूची संख्या १२६वर पोहचली. गतवर्षी डेंग्यूने घेतले ४३ बळी२०१० मध्ये डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ होती. २०११ मध्ये ८३ रुग्ण व ४ बळी गेले होते. २०१२ मध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊन ४२२वर पोहचली तर मृत्यूची संख्या १७ होती. २०१३ मध्ये रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली. १०९६ रुग्णांची नोंद झाली तर मृत्यूची संख्या ३५वर पोहचली. २०१४ मध्ये रुग्णांची संख्या २०९६ तर मृत्यूची संख्या ४३ झाली. जून २०१५ पर्यंत डेंग्यूचे ३२ रुग्ण आढळून आले तर एकाही मृत्यूची नोंद नाही. स्वाईन फ्लूने १२७ महिलांचा मृत्यूस्वाईन फ्लूमध्ये गेल्या पाच वर्षांत पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांच्या मृत्यूची संख्या मोठी आहे. २०१० मध्ये २१ पुरुष तर ३३ महिला, २०१२मध्ये पाच पुरुष तर ५ महिला, २०१३ मध्ये १९ पुरुष तर ९ महिला, २०१४ मध्ये ४ पुरुष तर ६ महिला तर सर्वाधिक मृत्यू या चालू वर्षात झाले. पुरुषांच्या मृत्यूची संख्या १०० झाली असून महिलांची संख्या १२७ वर गेली आहे.