शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

जैवविविधता संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य

By admin | Updated: May 23, 2017 01:53 IST

जैवविविधता मानवाचे जीवन आहे. जैवविविधतेशिवाय काहीही शक्य नाही. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीत जैवविविधता आहे.

जागतिक जैवविविधता दिनानिमित्त कार्यक्रम : सुनील शुक्रे यांचे प्रतिपादन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जैवविविधता मानवाचे जीवन आहे. जैवविविधतेशिवाय काहीही शक्य नाही. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीत जैवविविधता आहे. अनेक प्रजाती एक दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपण पदावर असो किंवा नसो, जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ व पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी जागतिक जैवविविधता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. धरमपेठ येथील वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात (वनामती) हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याच्या महसूल व वन विभागाचे सचिव विकास खारगे होते. मंचावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) भगवान, भारती विद्यापीठाचे संचालक डॉ. इराच भरुचा व प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. विनय सिन्हा उपस्थित होते. यावेळी शुक्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर डॉ. विनय सिन्हा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती दिली. दरम्यान शुक्रे यांनी वन विभागाची मुक्तकंठाने स्तुती करीत वन विभाग केवळ गोष्टीच करीत नाही, तर प्रत्यक्ष कृती सुद्धा करीत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी जैवविविधता आणि पर्यावरणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या खटल्यांचा दाखला देत जैवविविधता संरक्षणाचे आवाहन केले. तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) भगवान यांनी जोपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेत गावांचा सहभाग राहणार नाही, तोपर्यंत जैवविविधता संरक्षण व संवर्धन शक्य नसल्याचे सांगितले. यासोबतच ईको-टुरिझममध्ये सुद्धा लोक सहभाग आवश्यक आहे. सध्या आपण स्वत:च वन्यप्राण्यांच्या घरात (जंगलात) शिरत आहो. त्यांना अडथळा निर्माण करीत आहो आणि मग त्यांनी आमच्यावर हल्ला केला की, आम्हीच त्यांना ठार मारण्याची मागणी करतो. याशिवाय आपण निसर्गात कोणतीही प्रजाती उत्पन्न करू शकत नाही, त्यामुळे ती नष्ट करण्याचा सुद्धा आपल्याला कोणताही अधिकार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन यांनी आभार मानले.जैवविविधता दुधारी शस्त्र यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी महाराष्ट्र हा जैवविविधतेने नटलेला प्रदेश असल्याचे सांगितले. ते म्हणाले, अशा प्रदेशात आपण राहतो, हे आमचे भाग्य आहे. जैवविविधतेमुळे विविध क्षेत्रात प्रचंड वाव आहे. मात्र तेवढीच बंधनेसुद्धा आहेत. जैवविविधता दुधारी शस्त्र असल्याचा यावेळी त्यांनी उल्लेख केला. या जैवविविधतेचा फायदाही होऊ शकतो, आणि तेवढाच धोकासुद्धा. त्यामुळे आपण त्याचा उपयोग कसा करतो, यावर ते अवलंबून आहे. पर्यटनामुळे जैवविविधता टिकेल, परंतु त्यासाठी शाश्वत पर्यटन असले पाहिजे. केवळ पैशाच्या मोहासाठी पर्यटन नको आणि याच उद्देशातून ईको-टुरिझम बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. जैवविविधतेला अनेक धोके आहेत. वातावरणातील बदल, प्रजाती नामशेष होणे, जंगलांचा ऱ्हास हे सर्व जैवविधितेपुढील आव्हाने आहेत, यामुळेच ती टिकविण्याची जबाबदारी वाढली आहे. केवळ कागदावर जैवविविधता व्यवस्थापन समित्या तयार करून चालणार नाही, तर त्यांचे सक्षमीकरणसुद्धा झाले पाहिजे. लोक सहभागाशिवाय जैवविविधतेचे जतन करणे शक्य नाही. त्यामुळेच लोक सहभागासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.