शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

जैवविविधता संवर्धन ईश्वरीय कार्य

By admin | Updated: March 29, 2015 02:32 IST

ईश्वराने ही सृष्टी बनविली आहे. सृष्टीतील प्रत्येक घटकाचे महत्व आहे. मानवीवृत्तीमुळे ही शृंखला तोडली जात आहे.

नागपूर : ईश्वराने ही सृष्टी बनविली आहे. सृष्टीतील प्रत्येक घटकाचे महत्व आहे. मानवीवृत्तीमुळे ही शृंखला तोडली जात आहे. त्याचा परिणाम सृष्टीवर जाणवायला लागला आहे. जैवविविधता म्हणजे सृष्टीतील जीव व वनस्पती आहेत. याच्या संवर्धनाची खरी गरज आहे. जैवविविधता नष्ट झाल्यास मानव नष्ट होईल. त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे, असे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सिव्हिल लाईन परिसरात जैवविविधता मंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) अनिलकुमार सक्सेना, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, विभागीय आयुक्त अनुपकुमार सिंग, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिलीप सिंह, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे के.के. नीलम, एएसके शर्मा आदी उपस्थित होते. नष्ट होत चाललेल्या, दुर्मिळ वनस्पती व जीवाच्या रक्षणासाठी जैवविविधता मंडळ कार्य करते. मंडळाची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली असून, २०१५ मध्ये मंडळाला स्वत:चे कार्यालय मिळाले आहे. याप्रसंगी जैवविविधता मंडळाने घेतलेल्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दोन घडी पत्रिकेचीही प्रकाशन यावेळी झाले. काम करण्याची भरपूर संधीमहाराष्ट्रात जैवविविधतेची जागरूकता फार उशिरा झाली. २००८ मध्ये कायदा पारित झाला. २०१२ मध्ये मंडळाची स्थापना झाली. या क्षेत्रात फार मोठे कार्य करण्यासारखे आहे. जैवविविधता ५० हजार वर्षांपासून जुळलेली आहे. त्यासाठी लोककला, लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांची गरज आहे. भरपूर काम आहे, मात्र मंडळाकडे संसाधने कमी आहे. मनुष्यबळ अपुरे आहे. निधीची तरतूद नसल्याचे प्रधान वनसंरक्षक अनिलकुमार सक्सेना यांनी वनमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. सरकारी कार्यक्रम होऊ देऊ नकाया विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास वनमंत्र्यांनी दिला. मात्र जैवविविधता पुस्तकाबाहेर काढून लोकांमध्ये रुजविण्याचे कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकसहभाग वाढवावा लागेल. मंडळाला आवश्यक असलेल्या १०८ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा, महिनाभरात मंडळाला अध्यक्ष देऊ. फक्त हा कार्यक्रम सरकारी होऊ देऊ नका. जैवविविधतेसाठी हे कार्यालय आदर्श ठरले पाहिजे, अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)