शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जैवविविधता संवर्धन ईश्वरीय कार्य

By admin | Updated: March 29, 2015 02:32 IST

ईश्वराने ही सृष्टी बनविली आहे. सृष्टीतील प्रत्येक घटकाचे महत्व आहे. मानवीवृत्तीमुळे ही शृंखला तोडली जात आहे.

नागपूर : ईश्वराने ही सृष्टी बनविली आहे. सृष्टीतील प्रत्येक घटकाचे महत्व आहे. मानवीवृत्तीमुळे ही शृंखला तोडली जात आहे. त्याचा परिणाम सृष्टीवर जाणवायला लागला आहे. जैवविविधता म्हणजे सृष्टीतील जीव व वनस्पती आहेत. याच्या संवर्धनाची खरी गरज आहे. जैवविविधता नष्ट झाल्यास मानव नष्ट होईल. त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे, असे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सिव्हिल लाईन परिसरात जैवविविधता मंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) अनिलकुमार सक्सेना, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, विभागीय आयुक्त अनुपकुमार सिंग, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिलीप सिंह, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे के.के. नीलम, एएसके शर्मा आदी उपस्थित होते. नष्ट होत चाललेल्या, दुर्मिळ वनस्पती व जीवाच्या रक्षणासाठी जैवविविधता मंडळ कार्य करते. मंडळाची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली असून, २०१५ मध्ये मंडळाला स्वत:चे कार्यालय मिळाले आहे. याप्रसंगी जैवविविधता मंडळाने घेतलेल्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दोन घडी पत्रिकेचीही प्रकाशन यावेळी झाले. काम करण्याची भरपूर संधीमहाराष्ट्रात जैवविविधतेची जागरूकता फार उशिरा झाली. २००८ मध्ये कायदा पारित झाला. २०१२ मध्ये मंडळाची स्थापना झाली. या क्षेत्रात फार मोठे कार्य करण्यासारखे आहे. जैवविविधता ५० हजार वर्षांपासून जुळलेली आहे. त्यासाठी लोककला, लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांची गरज आहे. भरपूर काम आहे, मात्र मंडळाकडे संसाधने कमी आहे. मनुष्यबळ अपुरे आहे. निधीची तरतूद नसल्याचे प्रधान वनसंरक्षक अनिलकुमार सक्सेना यांनी वनमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. सरकारी कार्यक्रम होऊ देऊ नकाया विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास वनमंत्र्यांनी दिला. मात्र जैवविविधता पुस्तकाबाहेर काढून लोकांमध्ये रुजविण्याचे कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकसहभाग वाढवावा लागेल. मंडळाला आवश्यक असलेल्या १०८ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा, महिनाभरात मंडळाला अध्यक्ष देऊ. फक्त हा कार्यक्रम सरकारी होऊ देऊ नका. जैवविविधतेसाठी हे कार्यालय आदर्श ठरले पाहिजे, अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)