शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

कोट्यवधीचा खर्च, तरीही वीज गळती सुरूच; नुकसानास जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 07:50 IST

Nagpur News महावितरणच्या आकडेवारीनुसार राज्यातील विजेच्या गळतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या माथ्यावर खापर

कमल शर्मा

नागपूर : वितरण प्रणाली अत्याधुनिक बनविण्यासाठी महावितरणने कोट्यवधीचा खर्च केला आहे. तरीही महावितरणच्या आकडेवारीनुसार राज्यातील विजेच्या गळतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेले कृषीपंपाचे कनेक्शन व गेल्यावर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे कारण देत महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या माथ्यावर खापर फोडत आहेत. तर उर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ मात्र यासाठी महावितरणच्या कार्यप्रणालीला दोषी ठरवत आहेत.

महावितरणच्या अहवालानुसार गेल्या सहा महिन्यात राज्यात वीज वितरण हानी ०.४९ टक्के वाढली. ती १८.४३ टक्के पोहचली आहे. २०१९-२० मध्ये १७.९४ टक्के होती. जी त्याच्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १.८१ टक्क्याने कमी होती. पण या आर्थिक वर्षात हानीत पुन्हा वाढ झाली आहे. महावितरणचे अधिकारी यावर फार बोलण्यास तयार नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या कनेक्शनचे खऱ्या अर्थाने ऑडिट होत आहे. त्यामुळेच आकड्यात वृद्धी झाल्याचे त्यांचे मत असून कोरोनाच्या संक्रमणामुळे मूलभूत विकासकार्यही प्रभावित झाल्याचे कारण ते दशरवित आहेत.

- जनतेच्या खिश्यावर परिणाम

वीज गळती वाढल्याने झालेल्या हानीचा थेट परिणाम जनतेच्या खिश्यावर होतो. महावितरणच्या वीज दरांमध्ये वितरण हानीचा सुद्धा समावेश असतो. हानी वाढली तर वीज दरामध्ये वृद्धी होते. परिणामत: वीज कंपन्यांच्या कार्यप्रणालीचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. महावितरण १८.४३ टक्के हानी जनतेच्या खिशातून भरून काढणार आहे.

- नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात सुधारणा

राज्यात विजेची हानी वाढली असली तरी नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात बरीच सुधारणा झाली आहे. येथे एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान १४.४० टक्के हानी होत होती. ती आता १३.९८ टक्क्यावर आली आहे. मात्र महाल डीव्हीजनमध्ये हानी १३.९४ वरुन १४ टक्के झाली आहे.

टॅग्स :electricityवीज