शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

कोट्यवधीचा खर्च, तरीही वीज गळती सुरूच; नुकसानास जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 07:50 IST

Nagpur News महावितरणच्या आकडेवारीनुसार राज्यातील विजेच्या गळतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या माथ्यावर खापर

कमल शर्मा

नागपूर : वितरण प्रणाली अत्याधुनिक बनविण्यासाठी महावितरणने कोट्यवधीचा खर्च केला आहे. तरीही महावितरणच्या आकडेवारीनुसार राज्यातील विजेच्या गळतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेले कृषीपंपाचे कनेक्शन व गेल्यावर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे कारण देत महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या माथ्यावर खापर फोडत आहेत. तर उर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ मात्र यासाठी महावितरणच्या कार्यप्रणालीला दोषी ठरवत आहेत.

महावितरणच्या अहवालानुसार गेल्या सहा महिन्यात राज्यात वीज वितरण हानी ०.४९ टक्के वाढली. ती १८.४३ टक्के पोहचली आहे. २०१९-२० मध्ये १७.९४ टक्के होती. जी त्याच्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १.८१ टक्क्याने कमी होती. पण या आर्थिक वर्षात हानीत पुन्हा वाढ झाली आहे. महावितरणचे अधिकारी यावर फार बोलण्यास तयार नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या कनेक्शनचे खऱ्या अर्थाने ऑडिट होत आहे. त्यामुळेच आकड्यात वृद्धी झाल्याचे त्यांचे मत असून कोरोनाच्या संक्रमणामुळे मूलभूत विकासकार्यही प्रभावित झाल्याचे कारण ते दशरवित आहेत.

- जनतेच्या खिश्यावर परिणाम

वीज गळती वाढल्याने झालेल्या हानीचा थेट परिणाम जनतेच्या खिश्यावर होतो. महावितरणच्या वीज दरांमध्ये वितरण हानीचा सुद्धा समावेश असतो. हानी वाढली तर वीज दरामध्ये वृद्धी होते. परिणामत: वीज कंपन्यांच्या कार्यप्रणालीचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. महावितरण १८.४३ टक्के हानी जनतेच्या खिशातून भरून काढणार आहे.

- नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात सुधारणा

राज्यात विजेची हानी वाढली असली तरी नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात बरीच सुधारणा झाली आहे. येथे एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान १४.४० टक्के हानी होत होती. ती आता १३.९८ टक्क्यावर आली आहे. मात्र महाल डीव्हीजनमध्ये हानी १३.९४ वरुन १४ टक्के झाली आहे.

टॅग्स :electricityवीज