शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

कोट्यवधीचा खर्च, तरीही वीज गळती सुरूच; नुकसानास जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 07:50 IST

Nagpur News महावितरणच्या आकडेवारीनुसार राज्यातील विजेच्या गळतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या माथ्यावर खापर

कमल शर्मा

नागपूर : वितरण प्रणाली अत्याधुनिक बनविण्यासाठी महावितरणने कोट्यवधीचा खर्च केला आहे. तरीही महावितरणच्या आकडेवारीनुसार राज्यातील विजेच्या गळतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेले कृषीपंपाचे कनेक्शन व गेल्यावर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे कारण देत महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या माथ्यावर खापर फोडत आहेत. तर उर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ मात्र यासाठी महावितरणच्या कार्यप्रणालीला दोषी ठरवत आहेत.

महावितरणच्या अहवालानुसार गेल्या सहा महिन्यात राज्यात वीज वितरण हानी ०.४९ टक्के वाढली. ती १८.४३ टक्के पोहचली आहे. २०१९-२० मध्ये १७.९४ टक्के होती. जी त्याच्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १.८१ टक्क्याने कमी होती. पण या आर्थिक वर्षात हानीत पुन्हा वाढ झाली आहे. महावितरणचे अधिकारी यावर फार बोलण्यास तयार नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या कनेक्शनचे खऱ्या अर्थाने ऑडिट होत आहे. त्यामुळेच आकड्यात वृद्धी झाल्याचे त्यांचे मत असून कोरोनाच्या संक्रमणामुळे मूलभूत विकासकार्यही प्रभावित झाल्याचे कारण ते दशरवित आहेत.

- जनतेच्या खिश्यावर परिणाम

वीज गळती वाढल्याने झालेल्या हानीचा थेट परिणाम जनतेच्या खिश्यावर होतो. महावितरणच्या वीज दरांमध्ये वितरण हानीचा सुद्धा समावेश असतो. हानी वाढली तर वीज दरामध्ये वृद्धी होते. परिणामत: वीज कंपन्यांच्या कार्यप्रणालीचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. महावितरण १८.४३ टक्के हानी जनतेच्या खिशातून भरून काढणार आहे.

- नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात सुधारणा

राज्यात विजेची हानी वाढली असली तरी नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात बरीच सुधारणा झाली आहे. येथे एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान १४.४० टक्के हानी होत होती. ती आता १३.९८ टक्क्यावर आली आहे. मात्र महाल डीव्हीजनमध्ये हानी १३.९४ वरुन १४ टक्के झाली आहे.

टॅग्स :electricityवीज