शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघात मोठी समस्या

By admin | Updated: January 2, 2017 02:40 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रस्ते अपघाताबाबत गंभीर चिंता व्यक्त करून देशात दरवर्षी पाच लाख अपघात

नितीन गडकरी यांची चिंता : वाहतूक नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रस्ते अपघाताबाबत गंभीर चिंता व्यक्त करून देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती दिली. पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अ‍ॅन्ड ह्युमन रिसोर्सेस नागपूरच्या जननी सेहत अभियानाचा गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गडकरी यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे व इन्स्टिट्यूटच्या जननी सेहत रथाचे लोकार्पणही गडकरी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. गडकरी पुढे म्हणाले, बहुतेक अपघात निष्काळजीपणामुळे होतात. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. कुणी दारू पिऊन वाहन चालवितो तर, कुणी वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असतो. याशिवाय बोगस परवाने मिळविणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवरील ३८ अपघातग्रस्त स्थळांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे काम सुरू झाले आहे. गडकरी यांनी स्वत:च्या अपघाताचा अनुभव सांगितला. कार अपघातात पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे दोन वर्षे निष्क्रिय पडून राहावे लागले. यात संपूर्ण कुटुंब भरडल्या गेले असे त्यांनी सांगून नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले. सध्या संपूर्ण आकाश फाटले आहे. ते शिवण्याची आपली क्षमता नाही. तरीपण दिव्याप्रमाणे तेवत राहून कार्य करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार विकास कुंभारे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, चित्रपट दिग्दर्शिका समृद्धी पोरे, आयटी तज्ज्ञ पल्लवी मोहन, उद्योजक रामाकृष्णन राममूर्ती, माजी महापौर अर्चना डेहनकर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, इन्स्टिट्युटचे डॉ. विरल कामदार, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी) गोरगरिबांमध्ये देव खायला अन्न, घालायला कपडे व राहायला घर नाही अशा गोरगरीब लोकांना देव माणून त्यांची सेवा केली पाहिजे अशी पं. दीनदयाल उपाध्याय यांची भूमिका होती. संत तुकाराम यांनीही हाच संदेश दिला होता. हा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून वाटचाल करीत आहे. काही दिवसांपूर्वी अनेक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवांसह आवश्यक साहित्यांचे वितरण केले. त्यावेळी झालेला आनंद हा निवडणूक जिंकल्यानंतर व मंत्रिपद वाट्याला आल्यानंतर झालेल्या आनंदापेक्षा मोठा होता असे गडकरी यांनी सांगितले. स्तन कर्करोगाविरुद्ध लढा स्तन कर्करोगाचे निदान वेळेत व्हावे यासाठी जननी सेहत अभियान सुरू करण्यात आले आहे. गडकरी यांनी याविषयावरही विचार व्यक्त केले. महिला स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक नाहीत. स्तनांमधील गाठींकडे दुर्लक्ष केले जाते. ही गाठ कर्करोगाची असल्यास वेळेवर निदान होणे आवश्यक असते. अन्यथा महिलेचे प्राण वाचू शकत नाही. महिलांनी स्तन कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे. येणाऱ्या काळात जिल्ह्यामध्ये एकाही महिलेचा मृत्यू स्तन कर्करोगाने व्हायला नको असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.