शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

सायकल रॅली नागपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाची अखंडता व एकतेचा संदेश देशभरात पोहोचविण्याच्या उद्देशाने सीआरपीएफच्यावतीने कन्याकुमारी ते राजघाट अशी सायकल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशाची अखंडता व एकतेचा संदेश देशभरात पोहोचविण्याच्या उद्देशाने सीआरपीएफच्यावतीने कन्याकुमारी ते राजघाट अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. कन्याकुमारीवरून २२ ऑगस्टला या सायकल रॅलीला सुरुवात झाली. ती बुधवारी सायंकाळी नागपुरात पोहोचली. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी रॅलीचे स्वागत केले.

यानिमित्त हिंगणा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)च्या परिसरात आयोजित कार्यक्रमात आरपीएफचे उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर, कमांडंट सुभाष चंद्र, संतोष मिश्रा, कमांडंट करूणा राय, जनसंपर्क अधिकारी प्रदीप द्विवेदी उपस्थित होते. हैदराबादवरून साधारणत ५८० किलोमीटरचे अंतर कापून ही ३० सायकलपटूंची रॅली सायंकाळी नागपुरात दाखल झाली. त्यात सहभागी अपंग व महिला सायकलपटूंचे कौतुक करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये स्वराज्य गर्जना ढोलपथकांच्यावतीने ढोलताशांचे सादरीकरण करण्यात आले तर नेहरू युवा केंद्राच्यावतीने देशभक्तिपर गीतावर आधारित नृत्य सादर करण्यात आले. केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीही नृत्य सादर केले.