शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

भय्याजी जोशी ठरले संघविस्ताराचे चाणक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 07:00 IST

Nagpur news संघकार्याच्या विस्ताराचे शिवधनुष्य पेलणे ही सोपी बाब नव्हती. मात्र संघसेवेसाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी मात्र केवळ संघकार्याचा विस्तारच केला नाही तर, देशात संघाचे वर्चस्व निर्माण करण्यात मौलिक भूमिका पार पाडली.

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वयाच्या ७४ व्या वर्षांपर्यंत जबाबदारी सांभाळलेल्या भय्याजी जोशी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदाचा एक तपाचा प्रवास शनिवारी संपला. मागील काही काळापासून संघाच्या कार्यविस्तारात जोशी यांचे नियोजन फार महत्त्वाचे ठरले. संघकार्याच्या विस्ताराचे शिवधनुष्य पेलणे ही सोपी बाब नव्हती. मात्र संघसेवेसाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी मात्र केवळ संघकार्याचा विस्तारच केला नाही तर, देशात संघाचे वर्चस्व निर्माण करण्यात मौलिक भूमिका पार पाडली. खऱ्या अर्थाने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनात ते संघासाठी ‘चाणक्य’च ठरले, असे संघधुरिणांचे मत आहे. जोशी यांनी पुढील कार्यकाळासाठी दत्तात्रेय होसबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मार्च २००९ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधीसभेत जोशी सरकार्यवाहपदी पहिल्यांदा निवड करण्यात आली. त्यानंतर सातत्याने त्यांची निवड झाली व १२ वर्षांत त्यांनी संघाला तरुणाईपर्यंत नेण्यात मौलिक भूमिका पार पाडली. प्रकृती ठीक नसतानादेखील त्यांनी कर्तव्य बजावत संघविस्ताराचे सखोल नियोजन केले होते.

 

कोरोनाकाळात देशभरात प्रवास

कोरोनामुळे २०२० साली संघाची अ.भा. प्रतिनिधीसभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरात सरसंघचालक व भय्याजी जोशी यांनी देशभराचा प्रवास केला. कोरोनामुळे संघ पदाधिकारी व स्वयंसेवकांच्या आरोग्याला अपाय होऊ नये, यासाठी जोशी यांनी स्वतः देशातील सर्व क्षेत्रात जाण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय लॉकडाऊनमध्ये देशपातळीवर झालेल्या मदतकार्यातदेखील त्यांच्या मार्गदर्शनात नियोजन झाले होते.

शेषाद्रीनंतर सर्वाधिक काळ सलग सरकार्यवाह

भय्याजी जोशी हे १२ वर्षे सलग सरकार्यवाह राहिले. तर हो.वे. शेषाद्री यांनी १३ वर्षे या पदाची सलग धुरा सांभाळली होती. शेषाद्री १९८७ साली सरकार्यवाह झाले होते व २००० सालापर्यंत ते त्या पदावर होते.

 

हे राहिले सरकार्यवाह

गोपाल मुकुंद हुद्दार - १९२९ ते १९३१

डी.आर. लिमये - १९३१ ते १९३४

एच.व्ही. कुलकर्णी - १९३४ ते १९३७

जी.एस. पाध्ये - १९३७ ते १९३९

गोळवलकर गुरुजी - १३ ऑगस्ट १९३९ ते ३ जुलै १९४०

भय्यासाहेब काळे - १९४० - १९४५

भय्याजी दाणी - १९४५ ते १९५६

एकनाथ रामकृष्ण रानडे - १९५६ ते १९६२

भय्याजी दाणी - १९६२ ते १९६५

बाळासाहेब देवरस - १९६५ ते १९७३

माधव मुळे - १९७३ ते १९७७

रज्जूभय्या - १९७७ ते १९८७

हो.वे. शेषाद्री - १९८७ ते २०००

डॉ. मोहन भागवत - २००० ते २००९

भय्याजी जोशी - २००९ ते २०२१

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ