शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भय्याजी जोशी ठरले संघविस्ताराचे चाणक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 07:00 IST

Nagpur news संघकार्याच्या विस्ताराचे शिवधनुष्य पेलणे ही सोपी बाब नव्हती. मात्र संघसेवेसाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी मात्र केवळ संघकार्याचा विस्तारच केला नाही तर, देशात संघाचे वर्चस्व निर्माण करण्यात मौलिक भूमिका पार पाडली.

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वयाच्या ७४ व्या वर्षांपर्यंत जबाबदारी सांभाळलेल्या भय्याजी जोशी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदाचा एक तपाचा प्रवास शनिवारी संपला. मागील काही काळापासून संघाच्या कार्यविस्तारात जोशी यांचे नियोजन फार महत्त्वाचे ठरले. संघकार्याच्या विस्ताराचे शिवधनुष्य पेलणे ही सोपी बाब नव्हती. मात्र संघसेवेसाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी मात्र केवळ संघकार्याचा विस्तारच केला नाही तर, देशात संघाचे वर्चस्व निर्माण करण्यात मौलिक भूमिका पार पाडली. खऱ्या अर्थाने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनात ते संघासाठी ‘चाणक्य’च ठरले, असे संघधुरिणांचे मत आहे. जोशी यांनी पुढील कार्यकाळासाठी दत्तात्रेय होसबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मार्च २००९ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधीसभेत जोशी सरकार्यवाहपदी पहिल्यांदा निवड करण्यात आली. त्यानंतर सातत्याने त्यांची निवड झाली व १२ वर्षांत त्यांनी संघाला तरुणाईपर्यंत नेण्यात मौलिक भूमिका पार पाडली. प्रकृती ठीक नसतानादेखील त्यांनी कर्तव्य बजावत संघविस्ताराचे सखोल नियोजन केले होते.

 

कोरोनाकाळात देशभरात प्रवास

कोरोनामुळे २०२० साली संघाची अ.भा. प्रतिनिधीसभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरात सरसंघचालक व भय्याजी जोशी यांनी देशभराचा प्रवास केला. कोरोनामुळे संघ पदाधिकारी व स्वयंसेवकांच्या आरोग्याला अपाय होऊ नये, यासाठी जोशी यांनी स्वतः देशातील सर्व क्षेत्रात जाण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय लॉकडाऊनमध्ये देशपातळीवर झालेल्या मदतकार्यातदेखील त्यांच्या मार्गदर्शनात नियोजन झाले होते.

शेषाद्रीनंतर सर्वाधिक काळ सलग सरकार्यवाह

भय्याजी जोशी हे १२ वर्षे सलग सरकार्यवाह राहिले. तर हो.वे. शेषाद्री यांनी १३ वर्षे या पदाची सलग धुरा सांभाळली होती. शेषाद्री १९८७ साली सरकार्यवाह झाले होते व २००० सालापर्यंत ते त्या पदावर होते.

 

हे राहिले सरकार्यवाह

गोपाल मुकुंद हुद्दार - १९२९ ते १९३१

डी.आर. लिमये - १९३१ ते १९३४

एच.व्ही. कुलकर्णी - १९३४ ते १९३७

जी.एस. पाध्ये - १९३७ ते १९३९

गोळवलकर गुरुजी - १३ ऑगस्ट १९३९ ते ३ जुलै १९४०

भय्यासाहेब काळे - १९४० - १९४५

भय्याजी दाणी - १९४५ ते १९५६

एकनाथ रामकृष्ण रानडे - १९५६ ते १९६२

भय्याजी दाणी - १९६२ ते १९६५

बाळासाहेब देवरस - १९६५ ते १९७३

माधव मुळे - १९७३ ते १९७७

रज्जूभय्या - १९७७ ते १९८७

हो.वे. शेषाद्री - १९८७ ते २०००

डॉ. मोहन भागवत - २००० ते २००९

भय्याजी जोशी - २००९ ते २०२१

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ