शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

रुग्णसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व भारती बत्रा

By admin | Updated: September 19, 2016 02:43 IST

डॉ. भारती सुरेशचंद्र बत्रा हे उपराजधानीतील असे नाव आहे ज्यांच्या नावावर एक-दोन नव्हे तर, अनेक बाबतीत प्रथम महिला होण्याचा मान आहे.

सेवानिवृत्त उप-प्राचार्या : अनेक बाबतीत प्रथम महिला होण्याचा मानउदय अंधारे  नागपूरडॉ. भारती सुरेशचंद्र बत्रा हे उपराजधानीतील असे नाव आहे ज्यांच्या नावावर एक-दोन नव्हे तर, अनेक बाबतीत प्रथम महिला होण्याचा मान आहे. सेवेप्रति समर्पणभाव, नम्रपणा व शैक्षणिक सर्वोत्कृष्टतेचा संगम असलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत कार्यरत ट्रेनिंग कॉलेज आॅफ नर्सिंगच्या उप-प्राचार्या म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक खासगी महाविद्यालयांच्या आकर्षक आॅफर्स नाकारून त्या रुग्णांसाठी कार्य करीत आहेत.डॉ. बत्रा नवी मुंबई येथील एमजीएम आरोग्य विज्ञान विद्यापीठातून नर्सिंगमध्ये आचार्य पदवी मिळविणाऱ्या प्रथम महिला आहेत. मालदीवची राजधानी माले येथे भारतीय शासनाच्यावतीने इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय उभारण्यासाठी देशभरातून २० महिलांची निवड करण्यात आली होती. या महिलांमध्ये डॉ. बत्रा महाराष्ट्रातून एकमेव होत्या. १९८०-८१ मध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट परिचारिका पुरस्कार मिळाला आहे. इंदोर येथील देवी अहल्या विद्यापीठात असताना त्यांनी एम.एससी. (नर्सिंग) अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले. एवढेच नाही तर, १९८२ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असताना जनरल नर्सिंग भाग-२ अभ्यासक्रमात तर, १९८३ मध्ये नोंदणीकृत परिचारिकांच्या प्रसुती विद्या अभ्यासक्रमात राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळविला. इयत्ता बारावीतही त्या पहिल्या आल्या होत्या. डॉ. बत्रा यांनी मेडिकलमध्ये स्टाफ नर्स तर, मुंबईतील कामा व अलब्लेस रुग्णालयात शिक्षक म्हणून कार्य केले आहे. जीवनात परिचारिकाच व्हायचे हे त्यांनी लहानपणीच ठरविले होते. तुमसर येथे शालेय शिक्षण घेत असताना त्या नेहमी सामान्य रुग्णालयापुढून जात होत्या. यामुळे त्यांना श्वेतवस्त्रातील परिचारिका दिसायच्या. तेव्हा त्यांनी परिचारिका होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय केला होता. त्यांच्या निर्णयाला वडील विश्वनाथ मुदलियार यांनी भक्कम पाठिंबा दिला. त्यांचे वडील पुरोगामी विचारांचे होते. महिलांनी चार भिंतीच्या बाहेर पडून विकास करावा अशी त्यांची भूमिका होती. यामुळे त्यांनी तिन्ही मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. डॉ. बत्रा या ज्येष्ठ कन्या होत. सध्या डॉ. बत्रा स्वत:चा पूर्ण वेळ आजारी लोकांची काळजी घेणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी देत आहेत. यासाठी त्यांनी शारीरिक व मानसिक आजारपणाचा आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या वागणुकीचा सखोल अभ्यास केला आहे.परिचारिका म्हणून ३५ वर्षे कार्य करताना त्यांना समाजात व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये अनेक गैरसमज असल्याचे आढळून आले आहे. हे गैरसमज नष्ट करण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. तसेच, रुग्ण आक्रमक झाल्यास काय करायला पाहिजे यावरही त्या मार्गदर्शन करीत आहेत. रुग्णांची योग्य काळजी घेतल्यास वेळ, ऊर्जा व रुग्णालयाचा खर्च वाचू शकतो. तसेच, गंभीर रुग्णांना हाताळण्याचा शासकीय रुग्णालयांवरील भार कमी होईल. निधीची बचत होईल, असे त्यांचे मत आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी त्यांनी पुस्तिकाही छापली आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे. यामुळे परिचारिका म्हणून कौशल्य वाढविता आले असे डॉ. बत्रा यांनी सांगितले. त्यांना १० पुरस्कार मिळाले असून त्यांनी चार संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले आहेत. त्यांनी स्वत:च्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. आनंद सावजी, पती डॉ. सुरेशचंद्र बत्रा व कुटुंबीयांना दिले आहे.