शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

‘भारतमाता की जय’ने वेधले लक्ष

By admin | Updated: April 19, 2016 06:53 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे सोमवारी सकाळी सक्करदरा चौक ते

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे सोमवारी सकाळी सक्करदरा चौक ते हेडगेवार भवन या मार्गावर रॅली काढण्यात आली. यावेळी मंचच्या मुस्लीम सदस्यांनी दिलेल्या ‘भारतमाता की जय’ व ‘वंदे मातरम्’ या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी सदस्यांच्या हातात विविध फलकदेखील होते. मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीचा सोमवारी समारोप झाला. सकाळच्या सुमारास मंचचे राष्ट्रीय संयोजक इंद्रेश कुमार यांच्या नेतृत्वात आमदार निवासकडून ताजबाग दर्ग्याकडे सुमारे २०० सदस्य निघाले. तेथे ताजबाग ट्रस्ट समितीने मंचच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर हे सदस्य हेडगेवार भवन, संघ मुख्यालय व दीक्षाभूमी येथेदेखील गेले. मदरशांमध्ये शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी पुढाकारमदरशांमध्ये शिक्षणाचे आधुनिकीकरणासंदर्भातील प्रस्ताव बैठकीच्या अखेरच्या दिवशी संमत करण्यात आला. मदरशांमधील शिक्षणासंदर्भात त्रिसूत्रीय कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मदरशांचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, धार्मिक शिक्षणासोबतच शालेय शिक्षणदेखील दिले गेले पाहिजे, विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित व व्यावहारिक शिक्षण दिले पाहिजे अशी मंचची भूमिका आहे. यासंदर्भात मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. मदरशांच्या संचालकांसाठी मंचातर्फे राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. यात सुमारे हजार संचालक सहभागी होतील, अशी माहिती इंद्रेश कुमार यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली. मुस्लिमांमध्ये शैक्षणिक जागृती यावी व महिला सशक्तीकरण व्हावे यासाठी ‘आधी रोटी खाएंगे, बच्चों को पढाएंगे’, ‘छोटा परिवार, सुखी परिवार’ इत्यादी घोषणांसोबत मोहीम चालविण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेमध्ये राजस्थान वक्फ बोर्डचे चेअरमन अबुबकर नकवी, मंचचे राष्ट्रीय संयोजक मो. अफजाल, गिरीश जोयाल, सेंट्रल वक्फ कौन्सिलचे सदस्य अब्बास अली बोहरा, ‘एएमयू’च्या न्यायालयाचे सदस्य डॉ. शाहीद अख्तर, उलेमा विभागाचे प्रमुख मौलाना मुजतबा, मंचचे राष्ट्रीय संघटन सहसचिव विराग पाचपोर व महाराष्ट्र प्रदेश संयोजक मो. फारुक शेख उपस्थित होते.(प्रतिनिधी)‘लव्ह जिहाद’, ‘घरवापसी’ हे उन्मादच४‘लव्ह जिहाद’ आणि ‘घरवापसी’ यासारख्या गोष्टी उन्मादातूनच निर्माण होतात. या विषयाला तापविणाऱ्या लोकांनी याऐवजी देशहितासाठी कार्य करायला हवे, असे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांचे मौनच योग्य उत्तर असते, असेदेखील इंद्रेश कुमार म्हणाले. मंचकडून मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासासंदर्भात कार्य करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु याच पार्श्वभूमीवर अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या अल्पसंख्यंक दर्जाबाबत मंचाची भूमिका काय आहे, याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. अल्पसंख्यकांच्या व्याख्येवरच त्यांनी प्रश्न उपस्थित केले.मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांनी सोमवारी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात जाऊन डॉ.हेडगेवार यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी भारतमाता की जयचे नारे दिले.