शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

‘भारतमाता की जय’ने वेधले लक्ष

By admin | Updated: April 19, 2016 06:53 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे सोमवारी सकाळी सक्करदरा चौक ते

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे सोमवारी सकाळी सक्करदरा चौक ते हेडगेवार भवन या मार्गावर रॅली काढण्यात आली. यावेळी मंचच्या मुस्लीम सदस्यांनी दिलेल्या ‘भारतमाता की जय’ व ‘वंदे मातरम्’ या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी सदस्यांच्या हातात विविध फलकदेखील होते. मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीचा सोमवारी समारोप झाला. सकाळच्या सुमारास मंचचे राष्ट्रीय संयोजक इंद्रेश कुमार यांच्या नेतृत्वात आमदार निवासकडून ताजबाग दर्ग्याकडे सुमारे २०० सदस्य निघाले. तेथे ताजबाग ट्रस्ट समितीने मंचच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर हे सदस्य हेडगेवार भवन, संघ मुख्यालय व दीक्षाभूमी येथेदेखील गेले. मदरशांमध्ये शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी पुढाकारमदरशांमध्ये शिक्षणाचे आधुनिकीकरणासंदर्भातील प्रस्ताव बैठकीच्या अखेरच्या दिवशी संमत करण्यात आला. मदरशांमधील शिक्षणासंदर्भात त्रिसूत्रीय कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मदरशांचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, धार्मिक शिक्षणासोबतच शालेय शिक्षणदेखील दिले गेले पाहिजे, विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित व व्यावहारिक शिक्षण दिले पाहिजे अशी मंचची भूमिका आहे. यासंदर्भात मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. मदरशांच्या संचालकांसाठी मंचातर्फे राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. यात सुमारे हजार संचालक सहभागी होतील, अशी माहिती इंद्रेश कुमार यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली. मुस्लिमांमध्ये शैक्षणिक जागृती यावी व महिला सशक्तीकरण व्हावे यासाठी ‘आधी रोटी खाएंगे, बच्चों को पढाएंगे’, ‘छोटा परिवार, सुखी परिवार’ इत्यादी घोषणांसोबत मोहीम चालविण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेमध्ये राजस्थान वक्फ बोर्डचे चेअरमन अबुबकर नकवी, मंचचे राष्ट्रीय संयोजक मो. अफजाल, गिरीश जोयाल, सेंट्रल वक्फ कौन्सिलचे सदस्य अब्बास अली बोहरा, ‘एएमयू’च्या न्यायालयाचे सदस्य डॉ. शाहीद अख्तर, उलेमा विभागाचे प्रमुख मौलाना मुजतबा, मंचचे राष्ट्रीय संघटन सहसचिव विराग पाचपोर व महाराष्ट्र प्रदेश संयोजक मो. फारुक शेख उपस्थित होते.(प्रतिनिधी)‘लव्ह जिहाद’, ‘घरवापसी’ हे उन्मादच४‘लव्ह जिहाद’ आणि ‘घरवापसी’ यासारख्या गोष्टी उन्मादातूनच निर्माण होतात. या विषयाला तापविणाऱ्या लोकांनी याऐवजी देशहितासाठी कार्य करायला हवे, असे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांचे मौनच योग्य उत्तर असते, असेदेखील इंद्रेश कुमार म्हणाले. मंचकडून मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासासंदर्भात कार्य करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु याच पार्श्वभूमीवर अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या अल्पसंख्यंक दर्जाबाबत मंचाची भूमिका काय आहे, याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. अल्पसंख्यकांच्या व्याख्येवरच त्यांनी प्रश्न उपस्थित केले.मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांनी सोमवारी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात जाऊन डॉ.हेडगेवार यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी भारतमाता की जयचे नारे दिले.