शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

भारसिंगीत ‘रास्ता रोको’ आंदोलन

By admin | Updated: June 10, 2016 03:03 IST

गारपीट, अवकाळी पाऊस व वादळ यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शासनाच्या धोरणांचा निषेध : काटोल - वरुड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्पनरखेड : गारपीट, अवकाळी पाऊस व वादळ यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु राज्य शासनाने या नुकसानीचे सर्वेक्षण केले नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही. नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सलील देशमुख यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी भारसिंगी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी टायर जाळून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काटोल-वरुड मार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती. सततच्या नापिकीमुळे नरखेड तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या खरीप हंगामातील पेरणीची वेळ तोंडावर आली असून, शेतकऱ्यांकडे बियाणे-खते खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. दुसरीकडे राज्य शासन शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत केल्याच्या वल्गना करीत असून, केवळ आकड्यांचा खेळ करीत आहे. वास्तवात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा करण्यात आला नाही, असा आरोप सलील देशमुख यांनी केला.दोन वर्षांपासून काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबीच्या बागा मोठ्या प्रमाणात वाळली आहेत. त्या बागांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र संबंधित बागायतदारांना कोणतीही आर्थिक मदत करण्यात आली नाही. गेल्या खरीप हंगामात सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटाव्हेटर चालविले. शासनाने सोयाबीन उत्पादकांनीही कोणतीच आर्थिक मदत केली नाही. शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण वाढत चालले आहे. त्यातच महाबीज या शासकीय बियाणे उत्पादक कंपनीने बियाण्यांच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, बियाणे उत्पादक इतर खासगी कंपन्यांनी त्यांच्या बियाण्यांच्या किमती वाढविल्या आहेत. रासायनिक खतांवर ‘व्हॅट’ लावण्यात आल्याने खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरीत्या लूट केली जात असल्याचा आरोप सलील देशमुख यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारसिंगी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी रोडवर टायर जाळून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. शिवाय, या आंदोलनामुळे काटोल - वरुड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य प्रवीण जोध, सतीश रेवतकर, पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे, वसंत चांडक, प्रकाश टेकाडे, अनुप खराडे, बाबा फिस्के, रायुकाँचे तालुका अध्यक्ष अतुल पेठे, सुधीर खडसे, मयुर उमरकर, चिंटू धोटे, गुलाम बानवा, सतीश पुंजे, नीलेश ढोरे, विनोद घोरमाडे, अक्षय ईरखेडे, प्रतीम पटोडे, निकेश धवराळ, बापू केणे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जलालखेडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)कार्यक र्त्यांना अटक व सुटकाआर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने भरीव आर्थिक मदत करावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना यावर्षी मोफत बियाणे व रासायनिक खतांचे वितरण करावे, संत्रा, मोसंबी व सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, जलालखेडा पोलिसांनी सलील देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांना अटक करून काटोल - वरुड मार्ग मोकळा केला. या सर्व कार्यकर्त्यांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली.