शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

भारसिंगीत ‘रास्ता रोको’ आंदोलन

By admin | Updated: June 10, 2016 03:03 IST

गारपीट, अवकाळी पाऊस व वादळ यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शासनाच्या धोरणांचा निषेध : काटोल - वरुड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्पनरखेड : गारपीट, अवकाळी पाऊस व वादळ यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु राज्य शासनाने या नुकसानीचे सर्वेक्षण केले नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही. नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सलील देशमुख यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी भारसिंगी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी टायर जाळून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काटोल-वरुड मार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती. सततच्या नापिकीमुळे नरखेड तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या खरीप हंगामातील पेरणीची वेळ तोंडावर आली असून, शेतकऱ्यांकडे बियाणे-खते खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. दुसरीकडे राज्य शासन शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत केल्याच्या वल्गना करीत असून, केवळ आकड्यांचा खेळ करीत आहे. वास्तवात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा करण्यात आला नाही, असा आरोप सलील देशमुख यांनी केला.दोन वर्षांपासून काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबीच्या बागा मोठ्या प्रमाणात वाळली आहेत. त्या बागांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र संबंधित बागायतदारांना कोणतीही आर्थिक मदत करण्यात आली नाही. गेल्या खरीप हंगामात सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटाव्हेटर चालविले. शासनाने सोयाबीन उत्पादकांनीही कोणतीच आर्थिक मदत केली नाही. शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण वाढत चालले आहे. त्यातच महाबीज या शासकीय बियाणे उत्पादक कंपनीने बियाण्यांच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, बियाणे उत्पादक इतर खासगी कंपन्यांनी त्यांच्या बियाण्यांच्या किमती वाढविल्या आहेत. रासायनिक खतांवर ‘व्हॅट’ लावण्यात आल्याने खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरीत्या लूट केली जात असल्याचा आरोप सलील देशमुख यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारसिंगी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी रोडवर टायर जाळून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. शिवाय, या आंदोलनामुळे काटोल - वरुड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य प्रवीण जोध, सतीश रेवतकर, पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे, वसंत चांडक, प्रकाश टेकाडे, अनुप खराडे, बाबा फिस्के, रायुकाँचे तालुका अध्यक्ष अतुल पेठे, सुधीर खडसे, मयुर उमरकर, चिंटू धोटे, गुलाम बानवा, सतीश पुंजे, नीलेश ढोरे, विनोद घोरमाडे, अक्षय ईरखेडे, प्रतीम पटोडे, निकेश धवराळ, बापू केणे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जलालखेडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)कार्यक र्त्यांना अटक व सुटकाआर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने भरीव आर्थिक मदत करावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना यावर्षी मोफत बियाणे व रासायनिक खतांचे वितरण करावे, संत्रा, मोसंबी व सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, जलालखेडा पोलिसांनी सलील देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांना अटक करून काटोल - वरुड मार्ग मोकळा केला. या सर्व कार्यकर्त्यांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली.