शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

भागवत संचालित मोदी सरकारने हिंसेचा मार्ग निवडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 19:50 IST

शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या निर्देशानुसार चालणाऱ्या मोदी सरकारने हिंसेचा मार्ग निवडला आहे, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी मंगळवारी नागपुरात केली.

ठळक मुद्देप्रियंका गांधी लढा देणारमोहन प्रकाश यांची टीका

नागपूर : देशातील शेतकरी गेल्या वर्षभरापासून अहिंसक मार्गाने आंदोलन करीत आहेत. जुलमी तीनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी लढा देत आहेत. आता हे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या निर्देशानुसार चालणाऱ्या मोदी सरकारने हिंसेचा मार्ग निवडला आहे, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी मंगळवारी नागपुरात केली. (The Bhagwat-led Modi government resorted to violence, Mohan Prakash)

मोहन प्रकाश म्हणाले, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमकी देतात. केंद्रीय गृहराज्यमत्री दोन मिनिटांत ठीकठाक करू म्हणतात. आता तर मंत्र्यांचा मुलगा शेतकऱ्यांना गाडीने चिरडत आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासोबत योगी सरकारच्या पोलिसांनी गैरवर्तणूक केली. खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्यावर हल्ला करण्यात आला. शाह व तानाशाह मिळून या देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भागवत राष्ट्रवादी, मग ऑर्डिनन्स फॅक्टरींचे खासगीकरण का?

- मोहन भागवत हे स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवतात. मग देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करणाऱ्या ऑर्डिनन्स फॅक्टरींचे खासगीकरण का करण्यात आले? त्यांच्यावरील अशोकचक्र का उतरविण्यात आले? असा थेट सवाल त्यांनी भागवत यांना केला. देशातील सैन्याला दारूगोळ्यासाठी आपण भविष्यात विदेशांवर अवलंबून रहावे लागेल, असा धोकाही त्यांनी वर्तविला.

 

अदानींच्या लुटीमध्ये मोदी सरकारचा हिस्सा

- देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाद्यतेलांचे दर दीडपट वाढले आहेत. साधारणत: महागाई वाढली तर महिना-दोन महिन्यांत ती खाली येते. मात्र, येथे तसे होताना दिसत नाही. त्यामुळे ही खरी महागाई नसून अदानीच्या लुटीमध्ये मोदी सरकारचा हिस्सा असल्याचा आरोप मोहन प्रकाश यांनी केला.

ॲमेझॉनने साडेआठ हजार कोटींची लाच दिली

- मोहन प्रकाश म्हणाले, आपण नागपुरात चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. केंद्राच्या धोरणांमुळे लहान व्यापारी धास्तावले आहेत. त्यांना संपविण्याचे काम सुरू आहे. विदेशी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने गेल्या दोन वर्षांत कायदेविषयक शुल्काच्या नावावर कायदे मंत्रालयाला ८ हजार ५४६ कोटी रुपये दिले आहेत. आपल्याला सोयीस्कर असे नियम व कायदे बदलण्यासाठी ही रक्कम लाच म्हणून देण्यात आली, असे आता समोर आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या मुद्द्यावर मौन का धारण केले आहे, असा सवाल करीत या घोटाळ्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Mohan Prakashमोहन प्रकाश