शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘फार्मा हब’ साठी नागपूर बेस्ट

By admin | Updated: January 11, 2016 02:49 IST

देशातील निर्यातीमध्ये औषधांचा फार मोठा वाटा आहे. पुढील काळात औषध उद्योगाला चालना देण्याची गरज आहे.

अजय संचेती : औषधविज्ञानशास्त्र विभागाच्या महामेळाव्याचा समारोपनागपूर : देशातील निर्यातीमध्ये औषधांचा फार मोठा वाटा आहे. पुढील काळात औषध उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. उद्योगाचा विचार करता नागपूर सर्व दिशांनी सोयीचे आहे. ‘फार्मा’कडे आजच्या घडीला देशातील सर्वात यशस्वी उद्योग म्हणून पाहण्यात येत आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्रात विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. फार्मा हबसाठी नागपूर बेस्ट असल्याचे मत राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधविज्ञानशास्त्र विभागातर्फे आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून संचेती उपस्थित होते. प्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे, निवृत्त आयुक्त डॉ. सत्यनारायण शर्मा, पुरुषोत्तम अग्रवाल, विनय ठाकूर, विभागप्रमुख डॉ.नरेश गायकवाड, आयोजन समितीचे समन्वयक लवलिन खुराणा उपस्थित होते. औषध कंपन्यांची नागपूरकडे नजर गेली आहे. येथे ‘फार्मा पार्क’, वैद्यकीय उपकरणे, ‘फार्मा क्लस्टर’ व संशोधन केंद्र उभे राहिले पाहिजे. यासाठी खासगी क्षेत्राकडूनदेखील पुढाकार अपेक्षित आहे. सरकारही मदत देण्यास तयार आहे. परंतु मागताना अति करू नये. जे संभव आहे तेच मागावे. असे मेळावे, इंडस्ट्री मीट घेऊन हब होणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारकडे अभ्यासपुर्ण मांडणी करावी लागेल. स्थानिक इंडस्ट्री असोसिएशनला यात सहभागी करावे लागेल. डॉ.गायकवाड यांनी या परिषदेच्या आयोजनामागील प्रास्ताविक मांडले. माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ तसेच नागपूरच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन सत्यनारायण शर्मा यांनी केले. (प्रतिनिधी)